रत्नागिरी जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 29 places to visit in Ratnagiri District

मंडळी भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातील कोकण विभागातील सदाहरित निसर्ग संपन्न जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र व खाड्या असून जिल्ह्यामध्ये नऊ तालुके आहेत. सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला हा जिल्हा आहे. तसेच या जिल्ह्यातून सावित्री, जगबुडी, वशिष्टी, बाव, जैतापूर,मुचकुंदी,शास्त्री या नद्या वाहतात. तसेच या जिल्ह्यामध्ये इल्मेनाईट, जांभा चिरा,बॉक्साईट, रांगोळीचा दगड ही खनिजे सापडतात. शेतकी उत्पादनामध्ये या जिल्ह्यात तांदूळ, नाचणी नारळ, काजू,सुपारी,फणस, आंबा, मत्स्य उत्पादन हे उत्पादन घेतले जाते.Top 29 places to visit in Ratnagiri District

या जिल्ह्यातील हापूस आंबा जगभर प्रसिद्ध आहे. तसेच या जिल्ह्यात मत्स्य उद्योग प्रशिक्षण केंद्र आहे. या जिल्ह्याला कोल्हापूर, सातारा, सांगली,सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्याच्या सीमा लाभलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हे साने गुरुजींचे जन्मस्थान आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक,ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन स्थळे आहेत.

Table of Contents

Top 29 places to visit in Ratnagiri District


रत्नागिरी जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे

1) गणपतीपुळे-

Top 29 places to visit in Ratnagiri District

Ganpatipule हे रत्नागिरी जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागांमध्ये व पश्चिम बाजूला असलेल्या अरबी समुद्राच्या ठिकाणी स्वयंभू मूर्ती असलेले गणपतीचे प्रसिद्ध धार्मिक मंदिर आहे. गणपतीपुळे मंदिराला सुंदर समुद्रकिनारा, वाळूचा किनारा, नारळी पोफळीची झाडे लाभल्यामुळे येथील वातावरण आल्हाददायक आहे. पर्यटकांची नेहमी या ठिकाणी मोठी गर्दी असते. हे गणपती मंदिर डोंगराच्या बाजूला असल्याने मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी डोंगराला एक किलोमीटरची प्रदक्षिणा घालावी लागते. या मंदिर परिसरात अनेक पर्यटन ठिकाणे असून मालगुंड ह्या गावात कवी केशवसुत ह्यांचे स्मारक आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या नेवरे गावामध्ये सुरूचे बन व वाळूचा किनारा पाहायला मिळतो. मुंबईपासून हे ठिकाण 375 किलोमीटर अंतरावर आहे.

2) गुहागर बीच –

Guhagar Beach हे रत्नागिरी जिल्ह्यातील शांत व सुंदर समुद्रकिनारा असलेले पर्यटकांचे लोकप्रिय ठिकाण आहे. या ठिकाणची स्वच्छ पांढरी वाळू,समुद्राच्या शांत लाटा व येथील दुर्गादेवी आणि व्याडेश्वर मंदिर पर्यटकांना आकर्षित करते. तसेच हे ठिकाण नारळ, सुपारी आणि हापूस आंबा यासाठी प्रसिद्ध आहे. या गुहागर बीचच्या जवळपास हेदवीचे दशभुज गणेश मंदिर,वेळणेश्वर बीच, बामन घर हे ठिकाणे पाहायला मिळतात. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण पासून हे ठिकाण 40 किलोमीटर अंतरावर आहे.

3) गोपाळगड किल्ला / अंजनवेल किल्ला-

Gopalgad Fort/Anjanvel Fort हा रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रातील टेकडीवर असलेला महत्त्वाचा किल्ला आहे. या किल्ल्याला अंजनवेल नावानेही ओळखले जाते.हा किल्ला चिपळूणजवळील गोवळकोट या ठिकाणी असून मध्ययुगीन काळातील आहे. त्या काळामध्ये हा किल्ला वशिष्ठी नदीच्या काठावरील व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी कमांडिंग पॉईंटवर आहे . रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण पासून हा किल्ला 51 किलोमीटर अंतरावर आहे.

4) बामणघळ-


Bamanghal हे रत्नागिरी जिल्ह्यातील हेदवी गावाजवळील एक नैसर्गिक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी नैसर्गिकरित्या समुद्राच्या बाजूला असलेल्या खडकाळ भागात एक गुहा (घळ)तयार झालेली असून या ठिकाणी समुद्राचे पाणी जेव्हा वेगाने घळीमध्ये जाते आणि 20 फुटापर्यंत वरती उसळते तेव्हा ते विलोभनीय दृश्य पाहण्यासारखे असते. तसेच भरतीच्या वेळी या ठिकाणच्या लाटांचे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या ठिकाणी जवळच हेदवी गणेश मंदिर आणि हेदवी बीच आहे.

Visit our website: allindiajourney.com

5) श्री देव व्याडेश्वर मंदिर-


Shree Dev Vyadeshwar Temple हे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर या ठिकाणी असलेले पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर शिवाचे असून कोकणातील अनेक चित्पावन कुटुंबाचे कुलदैवत आहे. हे मंदिर ‘पंचायतन’ स्थापत्यशालीत बांधलेले आहे. या ठिकाणी शिवाचे व्याडेश्वर मंदिर मध्यवर्ती ठिकाणी असून मंदिराच्या चार कोपऱ्यात गौण मंदिरे आहेत. ज्यामध्ये सूर्य , गणेश , अंबा आणि विष्णू त्यांच्या पत्नी लक्ष्मीसह अनुक्रमे आग्नेय, नैऋत्य, वायव्य, वायव्य आणि ईशान्य दिशेला ही मंदिरे आहेत.

व मंदिरासमोर नंदी आहे. या मंदिराला तीन प्रवेशद्वार असून या मंदिराच्या जवळपास श्री चंडिकाई कलकाई मंदिर , गरमठ, वेळणेश्वर , तारकेश्वर, तळदेव, कर्हाटेश्वर, कुटकेश्वर,कार्तिकेय, सोमेश्वर, सप्तेश्वर, कर्णेश्वर,सप्तरवेश्वर रामेश्वर हृदकेश्वर, सप्तरवेश्वर, हृदकेश्वर, च्यवनेश्वर, उर्फाटा गणेश हे मंदिरे पाहायला मिळतात.

6) जयगड लाईट हाऊस-


Jaygadh Light House हे रत्नागिरी जिल्ह्यातील अरबी समुद्राच्या दिशेने व जयगड किल्ल्याच्या जवळ असलेले एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. हे लाईट हाऊस ब्रिटिशानी 1932 मध्ये पूर्णपणे कास्ट आयर्नपासून बनवले आहे. अरबी समुद्रातील बोटींना या लाईट हाऊस मधून मार्ग दाखवले जातात.हे ठिकाण निसर्गरम्य आणि शांत वातावरणात असून येथून समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. या लाईट हाऊस च्या जवळपास थर्मल एनर्जी प्लांट व जयगड किल्ला ही ठिकाणी आहेत. रत्नागिरी बस स्थानकापासून हे ठिकाण 42 किलोमीटर अंतरावर आहे.

7) रत्नागिरी फिश मरीन म्युझियम-


Ratnagiri Marine Fish Museum हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक पाहण्यासारखे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या संग्रहालयात व्हेल माशाचा मूळ 55 फुट लांब व 5 जार किलोग्रॅम वजनाचा मौल्यवान आणि जुना सांगाडा आहे.
याशिवाय सी काकडी, स्टार फिश,लायन फिश, ट्रिगर फिश,ईल्स, सी हॉर्स फिश,सी टर्टल्स असे दुर्मिळ आणि सुंदर नमुने पाहायला मिळतात. यामुळे म्युझियमच्या जवळपास भगवती मंदिर आणि मांडवी बीच ही ठिकाणी आहेत. रत्नागिरी बसस्थानकापासून हे ठिकाण अडीच किलोमीटर अंतरावर आहे.

8) जयगड किल्ला-


Jaygadh Fort हा रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदीच्या खाडीत बांधण्यात आलेला जलदुर्ग प्रकारातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या जयगड गावाच्या टेकडीवर हा किल्ला सागरी सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आला होता. हा किल्ला विजापूरकरांनी बांधला. बारा एकर वर पसरलेल्या या किल्ल्याची मजबूत तटबंदी जांभा दगडातून बनवलेले असून किल्ल्याची रचना बालेकिल्ला आणि परकोट या दोन भागात केलेली आहे.

हा किल्ला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून या किल्ल्यात विहिर, गुहा, गणपती मंदिर, कान्होजी आंग्रे राजवाडा व 28 बुरुज आहेत.या किल्ल्यापासून पाच किलोमीटर अंतरावर समुद्रकिनाराच्या खडकावर बांधलेले कऱ्हाटेश्वर मंदिर आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे वरून हा किल्ला 46 किलोमीटर अंतरावर आहे.

9) लोकमान्य टिळक संग्रहालय-

Lokmanya Tilak Museum हे रत्नागिरी जिल्ह्यातील भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील थोर सुपुत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मरणार्थ 1 मे 1972 रोजी बांधलेले एक ऐतिहासिक संग्रहालय आहे. या संग्रहालयाला टिळक अली संग्रहालय म्हणून ही ओळखले जाते.हे संग्रहालय लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान असलेल्या पारंपारिक घरामध्ये आहे. या संग्रहालयामध्ये त्यांचे जीवन आणि भारतीय लोकांच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानांचे सुंदर चित्रण करण्यात आली आहे.

या ऐतिहासिक संग्रहालयामध्ये त्यांच्या जीवनातील योगदानाचे फोटो आहेत. या संग्रहालयाचे देखरेख ही भारतीय पुरातत्व विभागाकडून केली जाते. पर्यटकाचे हे संग्रहालय प्रमुख आकर्षण आहे.

10) थिबा पॅलेस –


Thiba Palace हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. हा राजवाडा म्यानमार ( ब्रह्मदेश)चा राजा थिबा मिन यांना कैदेत ठेवण्यासाठी 1910 मध्ये ब्रिटिशांनी बांधला होता. या राजवाड्यात थिबा राजा व त्यांची पत्नी 1910 ते 1916 पर्यंत वास्तव्यास होते.थिबा राजाने वापरलेल्या गोष्टी या राजवाड्यात जतन करून ठेवण्यात आले आहेत. हे ठिकाण हिरवाईने नटलेले असून पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. रत्नागिरी बस स्थानकापासून हे ठिकाण दोन किलोमीटर अंतरावर आहे.

11) रत्नदुर्ग किल्ला-


Ratnadurg Fort हा रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आलेला गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. हा किल्ला बहामणी सुलतानाच्या काळात बांधला गेल्याचा सांगितले जाते.हा अवाढव्य किल्ला 120 एकर मध्ये पसरलेला असून किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा आहे. रत्नदुर्ग किल्ल्याच्या तिन्ही बाजूला पाणी व एका बाजूला जमीन असून किल्ल्याच्या पायथ्याला मिरकरवाडा हे बंदर आहे.

1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला होता. या किल्ल्यावर श्री भगवती देवीचे मंदिर, तीन तोंडाचा भुयारी मार्ग,29 बुरुज असून हा किल्ला पेठ, बालेकिल्ला आणि दीपगृह अशा तीन भागांत विभागला आहे. पर्यटक या किल्ल्याला मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

12) परशुराम मंदिर-


Parshuram Temple हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण जवळ असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. परशुराम मंदिराच्या मागे त्यांच्या आई रेणुका मातेचे मंदिर असून जवळच वशिष्ठ नदी व महेंद्र पर्वत आहे. परशुराम मंदिर म्हणजे हिंदू धर्मातील विष्णूचा सहावा अवतार असून परशुराम हे चिरंजीवी (अमर )आहेत.हे मंदिर स्वामी परमहंस ब्रह्मेंद्र यांनी बांधले. या मंदिरातील गाभाऱ्यामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. ज्या की ब्रह्मा विष्णू महेश समजले जाते.

तसेच या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले हनुमान मंदिर असून मंदिराच्या आवारात पर्वतावर पाणी राहावं म्हणून परशुरामाने बाण मारून केलेलं बानगंगा नावाचं पाण्याचा कुंड आहे. वर्षभर या ठिकाणी प्रत्येक महिन्याला काही ना काही उत्सव साजरे केले जातात. अक्षय तृतीयेला या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो.चिपळूणपासून हे ठिकाण अर्धा किलोमीटर अंतरावर आहे.

13) मार्लेश्वर मंदिर-


Marleshwar Temple हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मारळ या ठिकाणी असलेले प्राचीन, धार्मिक व जागृत देवस्थान आहे. शिवशंकराचे हे मंदिर एका गुहेमध्ये असून मंदिरापर्यंत जाण्यासाठी 450 पायऱ्या चढून जावे लागते. मंदिरामध्ये मार्लेश्वर आणि त्यांचे भाऊ मल्लिकार्जुन अशा दोन पिंडी आहेत त्यांचे दररोज पूजन केले जाते. या मंदिरातील गुहांमध्ये सापांचे अस्तित्व आहे परंतु आजपर्यंत कोणालाही या सापांनी विचार केलेली नाही.

या मंदिरात कोजागिरी पौर्णिमा, महाशिवरात्र, श्रावणी सोमवारी यावेळी यात्रा भरते तर मकर संक्रातीला मार्लेश्वरचा विवाह संपन्न केला जातो. हे शिव शंकराचे पुरातन मंदिर सह्याद्रीच्या कुशीत चहुबाजूने घनदाट झाडी आणि डोंगरांनी वेढलेले आहे. तसेच मंदिराच्या उजव्या बाजूला धारेश्वर नावाचा धबधबा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यापासून हे ठिकाण 35 किलोमीटर अंतरावर आहे.

14) स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर-

Swami swarupanand Samadhi Temple हे रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या निसर्गरम्य ठिकाणी असलेले धार्मिक व अध्यात्मिक तीर्थस्थळ आहे. या सुंदर मंदिर परिसरात ध्यानगुंफा, एमिलियाचे झाड आणि स्वामींचे घर असलेले “अनंत निवास” हे मंदिर ट्रस्टने उत्तम राखले आहे.विश्वस्तस्वामी स्वरूपानंद ऊर्फ रामचंद्र विष्णू गोडबोले, “आप्पा” किंवा “रामभाऊ” या नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1903 रोजी पावस या ठिकाणी झाला.

ते वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. स्वामी स्वरूपानंद हे त्यांच्याअलौकिक बुद्धिमत्तेमुळे विविध विषयांत पारंगत होते. पारतंत्र्याच्या काळात गांधीजींच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध असहकार आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता त्यासाठी त्यांना येरवडा जेलमध्ये जावे लागले होते.भारतातील सर्व भागातील अनुयायी स्वामींच्या शिकवणींवर विश्वास ठेवतात. रत्नागिरी पासून हे ठिकाण 15 किलोमीटर अंतरावर आहे.

15) भाट्ये बीच,झरीविनायक मंदिर-


Bhatye Beach/Zarivinayak Temple हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनारी सुरूच्या झाडांचे वन असून येथे पांढरे वाळू आढळते. तसेच या समुद्रकिनाऱ्याजवळ पर्वताच्या शिळेत उमटलेली जागृत गणेशची प्रतिमा आहे.झरी विनायकाचे मंदिर सुंदर असून येथील मंदिराच्या गाभाऱ्यासमोर एक तळे आहे. आश्चर्य म्हणजे गाभाऱ्याच्या जवळच्या गोमुखातून या तळ्यात पाणी साठते ते वर्षभर तळ्यात पाणी असते आणि हे पाणी पिण्यायोग्य असून जवळ समुद्र असून हे गोड्या पाण्याचे तळे आहे.

या झऱ्यामुळेच हे मंदिर झरीविनायक म्हणून ओळखले जाते. तसेच या समुद्राला काजळी नदी मिळते तिथेच भाट्येची खाडी निर्माण झाली आहे. देशातून आणि राज्यातून या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

16) राजापूरची गंगा-


Rajapurchi Ganga ही रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुरी तालुक्यात उन्हाळे गावामध्ये घडणारी नैसर्गिक घटना आहे. दर तीन वर्षांनी या ठिकाणी असलेल्या उंच टेकडीवरील जमिनीला लागून असलेल्या 14 टाक्या पाण्याने अचानक ओसंडून वाहू लागतात. या वाहणाऱ्या पाण्याला ‘राजापूरची गंगा’ असे म्हटले जाते. एप्रिल मे च्या दरम्यान मूळ गंगा एका वृक्षाच्या मुळापासून उगम पावून येथे 25 पावलावर असलेल्या कुंडात वाहते. आश्चर्य म्हणजे ‘उन्हाळे’ या निसर्गरम्य गावांमध्ये बारमाही वाहणारे गरम पाण्याचे झरे आणि महालक्ष्मी मंदिर आहे.

या गरम पाण्यामध्ये अंघोळ केल्यानंतर त्वचेचे रोग बरे होतात अशी येथील लोकांची धारणा आहे.ही गंगा तीन महिने राहते त्यामुळे या ठिकाणाला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. निसर्गाचा हा एक चमत्कारच आहे. भूवैज्ञानिकांनी यावर खूप मोठे संशोधन केलेले आहे. गंगा अवतरल्यानंतर देशभरातून अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. राजापूर पासून हे ठिकाण 3 किलोमीटर अंतरावर आहे.

17) कर्णेश्वर मंदिर-


Karneshwar Temple हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या ठिकाणी असलेले प्राचीन हेमाडपंथी महादेवाचे प्रसिद्ध भूमीज नागर शैलीतील मंदिर आहे. 2012 मध्ये पुरातत्व विभागाने या मंदिराला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.कर्णेश्वर या महादेवाच्या मंदिरात 5 पालथी ताटे कोरलेली आहेत. आख्यायिकेनुसार पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण राजाच्या सांगण्यानुसार एका रात्रीत एका दगडातून हे मंदिर कोरल्याचे सांगितले जाते.

या मंदिरात पांडवकालीन लिपीत कोरलेले लेख असून कर्णेश्वराच्या मंदिराजवळ एक सूर्य मंदिर आहे. या मंदिराचे आश्चर्य म्हणजे या ठिकाणी गणपती, लक्ष्मी, महिषासूरमर्दिणी, विष्णू या देवदेवतांच्या मूर्तीअतिशय आखीव रेखीव कोरीव काम केलेल्या पाहायला मिळतात. हे मंदिर कोल्हापुरातील खिद्रापूरच्या मंदिराच्या स्थापत्यशैलीशी मिळते-जुळते आहे. रत्नागिरी पासून हे ठिकाण 44 किलोमीटर अंतरावर आहे.

18) कातळकडा धबधबा-


Katalkada Waterfall हा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील हर्डी या निसर्गरम्य ठिकाणी असलेला अत्यंत सुंदर धबधबा आहे. पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. धबधबा ओसंडून वाहताना दुधासारखा भासतो. येथे आजूबाजूला हिरवळ व निसर्ग रम्य वातावरण आहे. या धबधब्यावर पोहण्याचा आनंद घेता येतो. रत्नागिरी शहरातील राजापूर पासून हे ठिकाण तीन किलोमीटर अंतरावर आहे.

19) कड्यावरचा गणपती मंदिर-


Kadyavarcha Ganpati Temple हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले गावामध्ये असलेले धार्मिक व प्रसिद्ध गणेश मंदिर आहे. हे मंदिर निसर्गरम्य डोंगरावर व समुद्राजवळच्या रमणीय ठिकाणी असल्यामुळे या मंदिराला ‘कड्यावरचा गणपती’ नावाने ओळखले जाते. हा गणपती उजव्या सोंडेचा असून नवसाला पावणारा आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे मंदिर बाराव्या शतकात समुद्राजवळ बांधले असल्याचे स्थानिक लोक सांगतात परंतु पाण्याचे पातळी वाढल्यानंतर ते दुसरीकडे हलवण्यात आले. दापोली तालुक्यापासून हे गणपती मंदिर 20 किलोमीटर अंतरावर आहे.

20) श्री वेळणेश्वर मंदिर-


Shree Velneshwar Temple हे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर या ठिकाणी रम्य समुद्रकिनाऱ्याजवळ असलेले एक भव्य शिवालय आहे.श्री वेळणेश्वर क्षेत्र हे दोन हजार वर्ष प्राचीन असल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या आवारात गणपती, लक्ष्मीनारायण, कालभैरव, महाविष्णू, ग्रामदेवता, रामेश्वर ही मंदिरे आहेत. तसेच या ठिकाणी श्रावण महिन्याच्या कोणत्याही एका दिवशी अभिषेकाची संततधार सुरु ठेवण्याची प्रथा आहे. येथील गाभाऱ्यातील शिवलिंग चार घागरी पाणी घालून बुडवले जाते त्यामुळे लगेच पाऊस येतो अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला या ठिकाणी तीन दिवस चालणारा मोठा उत्सव असतो. रत्नागिरी पासून हे ठिकाण 70 किलोमीटर अंतरावर आहे.

21) पूर्णगड किल्ला-


Purnagad Fort हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक ऐतिहासिक व महत्त्वाचा किल्ला आहे. हा किल्ला 22 एकर मध्ये पसरलेला असून मुचकुंडी नदीच्या उत्तरेकडील टेकडीवर व मलबार हिलच्या काही भागात येणारा समुद्री किल्ला आहे. हा किल्ला खूपच लहान असून कान्होजी आंग्रे यांच्या नौदलासाठी व युरोपीय लोकांशी व्यापार करण्यासाठी वापरण्यात येणारा महत्त्वाचा किल्ला होता.हा किल्ला काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेला असून आयताकृती आकाराचा आहे.

या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मारुतीची मूर्ती असून प्रवेशद्वारावर सूर्य चंद्र आणि गणपती कोरलेले आहेत. किल्ल्यामध्ये तुळस स्टॅन्ड आणि इमारतीचे अवशेष पाहायला मिळतात. या किल्ल्यावरून समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. रत्नागिरी पासून हे ठिकाण 25 किलोमीटर अंतरावर आहे.

22) चंडिका देवी मंदिर-


Chandikadevi Temple हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ या हिरव्यागार निसर्गरम्य ठिकाणी व दाभोळ बंदराजवळ वाशिस्ठी नदीच्या तीरावर चंडीका देवीचे स्वयंभू मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर एकाच कातळात तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये आहे व येथील चंडिका देवीची साडेतीन फूट उंचीची काळ्या पाषाणातली स्वयंभू,शेंदूर लावलेली मूर्ती आहे. श्री चंडिका देवीचे रुप सुंदर आहे आणि तेवढेच ते रौद्रही भासते. देवीच्या भुवया मोठ्या असून ती आपल्या नयनांनी संपूर्ण दाभोळवर कृपेची सावली ठेवते असे येथील ग्रामस्थ सांगतात.

चंडिका देवीच्या मूर्तीजवळ एक इतिहासकालीन तलवार आहे. येथे असलेल्या गुहेचे तोंड चांदीच्या पत्र्याने मढवलेले असून ते लहान असल्यामुळे गुहेमध्ये वाकून जावे लागते. नवरात्रीत या ठिकाणी मुख्याध्याद्वारावर घटस्थापना केली जाते. त्यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येतात. नवसाला पावणारी म्हणून या देवीची ख्याती आहे. दापोली शहरापासून हे ठिकाण 20 किलोमीटर अंतरावर आहे.

23) पन्हाळेकाजी लेणी-


Panhalkaji Cave या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील ऐतिहासिक पुरातन लेणी आहेत. या लेण्या प्रणालक दुर्गाच्या दक्षिण भागात गौर लेणे असा एक भाग आहे. या लेण्यांमध्ये सरस्वती,गणपती,त्रिपुरसुंदरी यांच्या मूर्ती कोरलेल्या असून अक्षोभयाची डोके नसलेले मूर्ती येथे पाहायला मिळते. तसेच या लेण्यांमध्ये शिवलिंग, रामायण महाभारतातील विविध प्रसंग कोरलेले पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी मानुषी बुद्ध, भैरव, हनुमान यांची शिल्पेही पहायला मिळतात.

या लेणी संकुलात 30 बौद्ध व हिंदू लेण्या असून त्या हीनयान पंथाने 8 ते 11 व्या शतकात कोरल्या असल्याचे सांगितले जाते. तसेच या लेण्यांवर ब्राह्मी आणि देवनागरी लिपीत शिलालेख आहेत. मुंबईपासून हे ठिकाण 160 किलोमीटर अंतरावर आहे.

24) कनकादित्य मंदिर-


Kankaditya Temple हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी या गावातील प्रसिद्ध, ऐतिहासिक व महाराष्ट्रातील एकमेव सूर्य मंदिर आहे. या मंदिरातील कनकादित्याची काळ्या पाषाणातील मूर्ती सुबक व देखणी आहे. हे मंदिर कोकणी कौलारू स्थापत्य शैलीत बांधलेले असून मंदिराच्या भिंतीवर आणि छतावर विविध देव-देवता कोरलेल्या आहेत. तसेच या मंदिरामध्ये प्रमुख देव आणि पौराणिक प्रसंग यांचे चित्रण केलेले आहे. रथसप्तमीला या मंदिरात पाच दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो.रत्नागिरी शहरापासून हे मंदिर 40 किलोमीटर अंतरावर आहे.

25) अर्जुना धरण-


Arjuna Dam हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक मध्यम धरण आहे. या धरणातील पाणीपुरवठा करक आणि पांगरी खुर्द या गावांना सिंचनासाठी केला जातो. अर्जुना धरणाच्या बांधकामामुळे करक आणि पांगरी खुर्द गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच या धरणा जवळ असलेल्या अनुस्कुरा घाटातून धरणाचे बॅक वॉटर चे पाणी दिसते. हे धरण रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण आहे.

26) दशभुजा गणपती मंदिर-


Dashbhuja Ganpati Temple हे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील हेदवी गावाच्या डोंगरावर असलेले पेशवेकालीन प्राचीन मंदिर आहे.श्री केळकर स्वामी यांनी पेशव्यांच्या मदतीने हे मंदिर बांधले आहे. या मंदिरामध्ये गणपतीची दहा हात असलेली व पांढऱ्या दगडात कोरलेली तीन फूट उंचीची मूर्ती असून भारतातील ती एकमेव मूर्ती आहे. यामुळे या गणपतीला दशभूजा गणपती नावाने ओळखले जाते. या मंदिरासमोर एक दीपमाळ आहे.गुहागर बस स्थानकापासून हे मंदिर 22 किलोमीटर अंतरावर आहे. तर हेदवी समुद्रकिनाऱ्यापासून २ किमी अंतरावर आहे.

27) पतित पावन मंदिर-


Patitpavan Temple हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे हिंदू मंदिर आहे. या मंदिरात लक्ष्मीनारायणाची सुंदर मूर्ती असून हे मंदिर श्री भागोजी शेठ कीर यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर यांच्या प्रेरणेतून 1931 मध्ये बांधले आहे.पतितपावन’ या शब्दाचा अर्थ ‘पतितांना पवित्र करणारे’ असा होतो. हे मंदिर बांधण्या मागचा उद्देश हा होता की त्या काळात अस्पृश्यांना खूप हीन वागणूक दिली जात होती ते मंदिरात जाऊन पूजा अर्चा करू शकत नव्हते.

म्हणून सावरकरांच्या पुढाकाराने हे मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर म्हणजे सामाजिक समतेचे आणि जातीभेद निर्मूलनाचे प्रतीक आहे.पतित पावन मंदिर बांधल्यानंतर समाजातील अनेक कर्मठ लोकांकडून सावरकरांना विरोध सहन करावा लागला होता. रत्नागिरी बसस्थानकापासून हे मंदिर तीन किलोमीटर अंतरावर आहे.

28) मांडवी बीच-


Mandvi Beach हा रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहराच्या पश्चिमेकडे अरबी समुद्राला लागून, शांत व सुंदर वातावरण असलेला समुद्रकिनारा आहे. या समुद्रातकाठची वाळू ही काळी आहे त्यामुळे या समुद्राला ‘ब्लॅक सी’ म्हणून ही ओळखले जाते. हा बीच पाहण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा चांगला काळ समजला जातो. सूर्यास्ताच्या वेळी या ठिकाणी नयनरम्य दृश्य पाहायला मिळते. या बीचला ‘गेटवे ऑफ रत्नागिरी’ म्हणूनही ओळखले जाते.

पर्यटकांसाठी या ठिकाणी अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत. या बीचच्या जवळपास थीबा पॅलेस, भगवती मंदिर,रत्नदुर्ग किल्ला ही ठिकाणी आहेत. मांडवी बीच हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

29) शिवसृष्टी डेरवण-


Shivshruti Dervan हे रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे पासून चार किलोमीटर अंतरावर डेरवण या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. शिवसृष्टी म्हणजे शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारित चित्रांचे किंवा शिल्पांचे कायमस्वरूपी प्रदर्शन होय. भारत देशातील डेरवण येथे उभारलेली ही पहिली शिवसृष्टी असून श्री सितारामपंत वालावलकर या सत्पुरुषाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही शिवसृष्टी उभारण्यात आली आहे.

या शिवसृष्टी मध्ये टेहळणी करणारे शिपाई,घोडेस्वार, बुरूज,पायदळातील शिपाई,पहारेकरी,नेताजी पालकर यांचा इतिहास, सुरतेवरची स्वारी अशा अनेक विविध गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात. हे सर्व पाहताना शिवरायांचा तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो. चिपळूण शहरापासून हे ठिकाण चार किलोमीटर अंतरावर आहे.

Visit the travel blog

1) रत्नागिरी जिल्ह्यातील पतितपावन मंदिर कोणत्या साली बांधले आहे?

रत्नागिरी जिल्ह्यातील पतितपावन मंदिर 1931 मध्ये बांधले आहे.

2)
रत्नागिरी जिल्ह्यातील कनकादित्य मंदिर कोणत्या गावात आहे?

रत्नागिरी जिल्ह्यातील कनकादित्य मंदिर राजापूर तालुक्यातील कशेळी या गावात महाराष्ट्रातील एकमेव सूर्य मंदिर आहे.

3) रत्नागिरी जिल्ह्यातील दशभुजा गणपती मंदिर कोणत्या डोंगरावर आहे?

रत्नागिरी जिल्ह्यातील दशभुजा गणपती मंदिर गुहागर तालुक्यातील हेदवी गावाच्या डोंगरावर आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top