मंडळी भारत भ्रमंती मध्ये आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे
नाशिक जिल्हा हा महाराष्ट्राच्या उत्तर पूर्व भागात असून समुद्रसपाटीपासून 565 मीटर उंचीवर आहे. संस्कृत मध्ये नाकाला नाशिक म्हटले जाते त्यावरून या शहराला नाशिक हे नाव पडले. तसेच मुघल साम्राज्याच्या काळात हे शहर ‘गुलाबांचे शहर’ गुलशनाबाद म्हणून ओळखले जायचे. तसेच हे शहर नवशिखरांचे शहर म्हणून नाशिक म्हणून ओळखले जाते.Top 24 places visit to in Nashik District
याशिवाय जनस्थान, त्रिकंटक या नावाने देखील नाशिक जिल्हा ओळखला जातो. पौराणिक कथेनुसार राम लक्ष्मण आणि सीता पंचवटी या ठिकाणी वास्तव्यास होते. आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यात आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठी पवित्र नदी गोदावरी चे उगमस्थान ब्रह्मगिरी पर्वतावरवरून त्र्यंबकेश्वर येथून वाहते. तसेच कश्यपी, वैतरणा, भीमा, गिरणा, दारणा, या महत्त्वाच्या नद्या वाहतात.अगस्ती ऋषी तपस्येसाठी नाशिक मध्ये राहिल्याचे सांगितले जाते.
नाशिकला अनेक थोर व्यक्तींचा सहवास लाभलेला आहे त्यामध्ये वसंत कानेटकर,बाबूभाई राठी, व्ही.व्ही. शिरवाडकर,वीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य टिळक, आणि दादासाहेब पोतनीस यांचा समावेश आहे.नाशिक हेभारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक समजले जाते.सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहराचा औद्योगिक विकास महाराष्ट्रात चौथ्या नंबर वर आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. तसेच निफाड आणि लासलगाव ही ठिकाणी येथील कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. आणि या जिल्ह्यात द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या जिल्ह्याला ‘द्राक्षांचा जिल्हा’ म्हणून ही ओळखले जाते.
येथील द्राक्षांपासून वाईन मोठ्या प्रमाणात बनवली जाते. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. तसेच या जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, तिकिटे छापण्याचा कारखाना, ओझर येथे मीग विमानाचा कारखाना, इगतपुरी या ठिकाणी निलगिरी पासून कागद कारखाना, तर देवळाली येथे सैन्य प्रशिक्षण केंद्र ही ठिकाणी आहेत. नाशिक शहर हे गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यात बसलेले दख्खनचे शहर आहे. या जिल्ह्यातील सर्व नद्या येथूनच उगम पावतात.
Top 24 places visit to in Nashik District
नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे –
1) त्र्यंबकेश्वर मंदिर-

Tryanbakeshwar Temple हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पवित्र,प्राचीन आणि धार्मिक ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराचे बांधकाम काळ्या दगडात केलेले असून मंदिराची शिल्पकला नागरशैलित केलेली आहे. दक्षिण भारतातील पवित्र नदी गोदावरी विषय उगमस्थान त्र्यंबकेश्वर मधून झालेले आहे. या ज्योतिर्लिंगावर चांदीचा मुखवटा असून दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. श्रावण महीना आणि महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला भेटते.
2) पांडवलेणी गुफा –

Pandavleni Cave हे नाशिक जिल्ह्यातील प्राचीन व धार्मिक स्थळ आहे. या लेण्या त्या ठिकाणी पाली लिपीत कोरलेल्या असून दोन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. या ठिकाणी 24 लेण्यांचा समूह व दगडात कोरलेले 29 शिलालेख असून प्राचीन काळी या लेण्यांना त्रिरेशमी या नावाने ओळखले जायचे.
महाभारतातील पांडवांनी एका रात्रीत या लेण्या तयार केल्या आहेत असे सांगितले जाते. त्यामुळे या लेण्या पांडवलेल्या म्हणून ओळखल्या जातात. या ठिकाणी बुद्धांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. येथील लेणी परिसरात दादासाहेब फाळके स्मारक, बुद्ध स्मारक पाहायला भेटते.
3) दूध सागर धबधबा-

Dhudsagar Waterfall हा नाशिक जिल्ह्यातील सोमेश्वर या ठिकाणी आहे. या नयनरम्य धबधब्याला सोमेश्वर धबधबा म्हणून ही ओळखले जाते. सोमेश्वर मंदिर या धबधब्यापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे.नाशिक जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.नाशिक बस स्थानकापासून हे ठिकाण नऊ किलोमीटर अंतरावर आहे.
4) कुंभमेळा-

Kumbhamela हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील दर बारा वर्षांनी भरणारा हिंदू सिंहस्थ किंवा धार्मिक मेळावा आहे. गोदावरी नदीच्या काठावर भरणाऱ्या या मेळाव्याला नाशिक त्र्यंबक कुंभमेळा म्हणून ओळखले जाते. या कुंभमेळ्यामध्ये नाशिक मधील शिव त्रंबकेश्वर मंदिर आणि रामकुंड या ठिकाणी विधीवत स्नान केले जाते. संपूर्ण भारतातून भाविक या कुंभमेळ्याला येत असतात.
5) काळाराम मंदिर-

Kalaram Temple हे नाशिक जिल्ह्यातील पंचवटी या ठिकाणी काळा दगडात बांधलेले धार्मिक व प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे मंदिर 1778 ते 1790 मध्ये गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशावरून रंगराव ओढेकर यांनी बांधले. मंदिराचे संपूर्ण बांधकाम काळ्या पाषाणात बांधलेले असून नागर स्थापत्यशैलीत बांधलेले आहे.
मंदिरातील श्रीरामाची मूर्ती काळ्या दगडात आहे म्हणून या मंदिराला काळाराम हे नाव पडले आहे. तसेच मंदिरात सीता आणि लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत. गोदावरी नदी काठावरून हे मंदिर पायी चालत थोड्या अंतरावर आहे. मंदिरावरील कोरीव काम आणि सभा मंडप पाहण्यासारखे आहे. या मंदिर परिसरात गणपती, विठ्ठल आणि हनुमान मंदिरे आहेत.
Visit our website: allindiajourney.com
6) भगुर-

Bhagur हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचे क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर या स्वातंत्र्य सैनिकाचे जन्मस्थान असलेले अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या ठिकाणी भगूरदेवी मंदिर देखील आहे. नाशिक पासून हे ठिकाण 22 किलोमीटर अंतरावर आहे.
7) मुक्तिधाम मंदिर-

Mukthidham Temple हे नाशिक जिल्ह्यातील नाशिक रोड गावात असलेले संगमरवरी मंदिर आहे.श्री. जे. डी. चौहान-बिटको यांनी दिलेल्या देणगीतून 1971 मध्ये हे मंदिर बांधले. या ठिकाणी राम लक्ष्मण सीता व इतर देवी देवतांच्या मूर्ती आहेत. तसेच या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती पण आहेत. या मंदिरातील भिंतीवर कृष्णाची चित्रे आणि महाभारतातील विविध प्रसंगाचे चित्रे रंगवण्यात आले आहेत. तसेच या मंदिरात गीते मधील 18 अध्याय लिहिलेले आहेत. राम नवमी, दिवाळी,दसरा या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
8) सुला व्हाइनयार्ड्स-

Sula Vineyards ही नाशिक जिल्ह्यातील एक वाइनरी आणि व्हाइनयार्ड आहे. 1999 मध्ये राजीव सामंत यांनी या व्हाइनयार्डची स्थापना केली. ही भारतातील वाइन उद्योगातील आघाडीची कंपनी असून या कंपनीने भारतात चेनिन ब्लँक , सॉव्हिग्नॉन ब्लँक , रिसलिंग आणि झिनफँडेल सारख्या द्राक्षांच्या जाती सादर केल्या आहेत.सुला व्हाइनयार्ड ही भारतातील आघाडीच्या वाईनरींपैकी एक आहे. पर्यटकांना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वाईन चाखायला दिली जाते.
9) शांती कृष्णा मुद्रा संग्रहालय-

Shanti-Krishna Museum हे नाशिक जिल्ह्यामध्ये अंजनेरी डोंगराजवळ आहे. भारताचा नानक वारसा आणि इतिहास या गोष्टीचे सामान्य जनतेला माहिती होण्यासाठी सरकारने 1980 मध्ये या संग्रहालयाची स्थापना केली. या संग्रहालयात वेगवेगळ्या सेक्शन मध्ये वेगवेगळ्या गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये अश्मयुगीन वस्तू, जुन्या काळातील भांडी आणि नाण्यांची जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासूनचे दगडाची नाणी देखील येथे ठेवण्यात आली आहेत.या संग्रहालयात प्राचीन नाणी, नोटा असून हे आशिया खंडातील एकमेव संग्रहालय आहे. नाशिक पासून हे ठिकाण 20 किलोमीटर अंतरावर आहे.
10) हरिहर किल्ला-

Harihar Fort हा महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेला गिरिदुर्ग प्रकारातील 3676 फूट उंच किल्ला आहे. या किल्ल्याला हर्षगड म्हणून ओळखले जाते. या किल्ल्यावर चढण्यासाठी कातळ पायऱ्या असून किल्ल्यावर वेताळाचे मंदिर आहे.व किल्ल्यावर हनुमानाचे मंदिर, महादेवाची पिंड व नंदी आणि आजूबाजूला चार-पाच पाण्याने भरलेल्या कातळ टाक्या आहेत. 1636 मध्ये शहाजीराजांनी हा किल्ला निजामा कडून जिंकून घेतला होता.
11)पंचवटी-

Panchavati हे ठिकाण नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावरील धार्मिक स्थळ आहे. हे ठिकाण काळाराम मंदिराजवळ वटवृक्षांचा समूह असून येथे पाच वटवृक्षांचा समूहापासून तयार झाला आहे त्यामुळे या परिसरात ‘पंचवटी’ असे म्हटले जाते. या ठिकाणी भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासाचा काळ घालवला होता. या परिसरात काळाराम मंदिर आणि सीता गुफा ही पाहण्यासारखे ठिकाणी आहेत.
12)मांगी तुंगी-

Mangi Tungi हे नाशिक जिल्ह्यातील जुळ्या शिखरांचे शिखर आणि जैन धर्मियांचे धार्मिक स्थळ आहे. हे ठिकाण सटाणा तालुक्यातील सह्याद्री डोंगररांगातील भीलवड गावाजवळील गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. या ठिकाणी जैन धर्मियांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची मूर्ती आहे.
या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे दोन हजार पायऱ्या चढून जावे लागते.मांगी-तुंगी हे जैन धर्मियांचे जागतिक धार्मिक स्थळ आहे.हा पुतळा मांगी डोंगरावर सुमारे ४५०० फूट उंचीवर साकारण्यात आलेला असून या कामासाठी 19 वर्षाचा कालावधी लागला आहे.
13)सर्वधर्म मंदीर तपोवन-

Sarvadharma Temple Tapovan हे नाशिक जिल्ह्यातील पंचवटीतील तपोवन परिसरातील प्रभू श्रीरामचंद्र यांच्यापदस्पर्शाने पावन झालेले धार्मिक स्थळ आहे. गोदावरी किनारी तपोवन या ठिकाणी राम, सीता आणि लक्ष्मण यांचा वनवासाचा बराचसा काळ गेलेला आहे. सर्वधर्म मंदिरातील धार्मिक चिन्ह बघता असे लक्षात येते की हिंदू, मुस्लिम,शीख,इसाई,पारशी असण्यापेक्षा आपण सर्व मानव आहोत.
आणि मानवता हाच आपला खरा धर्म आहे. या मंदिरात अनेक देवदेवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात. पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणावर भेट देतात.
14)सप्तश्रृंगी गड-

Saptashrungi Temple हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील नांदुरी गावाजवळ एक धार्मिक व ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात येत असून याची समुद्रसपाटीपासून उंची चार हजार 4569 एवढी आहे. सह्याद्रीच्या या डोंगरांमध्ये सात शिखरे असल्यामुळे या गडाला सप्तशृंगी गड असे नाव पडले आहे.या डोंगरावरील वनी या ठिकाणी अनेकांचे आराध्य असलेले देवी सप्तशृंगी मातेचे तीर्थक्षेत्र आहे.
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी सप्तशृंगी देवीचे अर्धपीठ आहे. येथील देवीची मूर्ती अष्टभुजा स्वरूपात असून स्वयंभू आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार या तीन दरवाजातून देवीचे दर्शन घडते. नाशिक पासून हे ठिकाण 60 किलोमीटर अंतरावर आहे.
15)अण्णा गणपती नवग्रह सिध्दपिठम मंदिर –

Anna Ganpati Temple हे नाशिक जिल्ह्यातील विहितगाव या ठिकाणचे दाक्षिणात्य पध्दतीने बांधलेले वालदेवी नदीजवळील धार्मिक स्थळ आहे.अण्णा गुरुजी हे दाक्षिणात्य होते.यांना स्वप्नात दृष्टांत झालानंतर त्यांनी गणेशाची स्थापना करण्याचे ठरवले. या विशाल गणेशाची मुर्ती 42 फूट उंच असून चार दिशांना चार मुखे आहेत.
ही चार मुखे सुख, शांती, आयुष्य आणि आरोग्य यांची प्रतिके आहेत. गणपतीची मुर्ती विराट असल्याने ती मंदिरात नसून मोकळ्या जागेत आहे.सभोवर मात्र नवग्रहांची नऊ मंदिरे,भगवान दत्तत्रेयांचे, अक्कलकोट स्वामींचे मंदिर आहे.
16)श्री स्वामीनारायण मंदिर-

Shree Swaminarayan Temple हे नाशिक जिल्ह्यातील पंचवटी भागातील भव्य धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर दगडी कोरीव नक्षीकामात बांधलेले असून मंदिराच्या भिंतीवर आणि स्तंभावर शिल्पकाम केलेले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री स्वामीनारायणाची मूर्ती आहे तर इतर अन्य संतांच्या मूर्ती आहेत.बीएपीएस स्वामीनारायण संस्था ही एक आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक संस्था असून ही संस्था जगभरात अनेक ठिकाणी भव्य मंदिरांची निर्मिती करते आणि अध्यात्मिक व सामाजिक उपक्रम राबवते.
नाशिकच्या पंचवटी भागात वसलेले हे मंदिर भक्तांसाठी शांतता,निष्ठा, भक्ती, सेवा प्रदान करते. या मंदिरातून गरजू लोकांसाठी शैक्षणिक मदत, आरोग्य सेवा, अन्नदान इ सेवा दिल्या जातात. या मंदिरात स्वामीनारायण जयंती, जन्माष्टमी, दिवाळी, रामनवमी आणि गुरुपूर्णिमा यावेळी उत्सव साजरे केले जातात. या मंदिर परिसराचा अनेक पर्यटन स्थळे आहेत.
17) गंगापूर धरण-

Gangapur Dam हे नाशिक जिल्ह्यातील व नाशिक तालुक्यातील गंगापूर गावामध्ये गोदावरी नदीवर मातीच्या भरावाने बांधलेले धरण आहे.या धरणाचे बांधकाम 1965 मध्ये पूर्ण झाले. या धरणाची उंची 44.20 मीटर असून लांबी 3800 मीटर एवढी आहे. हे धरण नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरातील सिंचनासाठी वापरले जाते. गंगापूर धरण हे नाशिककरांचे जीवनगंगा समजले जाते. नाशिक शहरापासून हे धरण 16 किलोमीटर अंतरावर आहे.
18) सोमेश्वर महादेव मंदिर-

Someshwar Mahadev Temple हे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर रस्त्याजवळ गोदावरी नदीच्या काठी असलेले भगवान महादेवाचे पवित्र तीर्थस्थळ आहे. हे सोमेश्वराचे मंदिर स्वयंभू असून या ठिकाणी जवळ असलेल्या झाडाखालून प्रकट झालेली गुप्त गंगा मंदिराखालून अव्याहत वाहत असते.
मंदिर परिसर अतिशय निसर्गरम्य व नयनरम्य असून सोमेश्वर दर्शनानंतर गोदावरी नदीत बोटिंगचा आनंद घेता येतो. तसेच या मंदिर परिसराच्या आजूबाजूला सोमेश्वर धबधबा,शंकराचार्य डॉ. कुर्तकोटींचा आश्रम, गंगापूरचा धबधबा आणि बालाजी मंदिर ही पर्यटन स्थळे आहेत.
19)चामर लेणी-

Chamar Leni हे नाशिक जिल्ह्यातील जैन बांधवांचे पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.या लेण्यांची निर्मिती राजा चामराजने केली होती म्हणून या लेण्यांना चामर नेहमी असे नाव पडले आहे. या लेण्यांमध्ये एक मंदिर व तीन गुफा आहेत. तसेच लेण्यांच्या पायथ्याशी एक संग्रहालय ज्यामध्ये जैन मूर्तींचा संग्रह आहे.
पूर्वी या लेण्यांना ‘चांभार लेणी’ म्हणून ओळखले जायचे. या लेण्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत.या लेण्यांवरून नाशिक शहराचे सुंदर दृश्य पाहायला मिळते.
20) कालिका माता मंदिर-

Kalikamata Temple हे नाशिक जिल्ह्यातील जुन्याआग्रारोडजवळ असलेले नाशिकचे ग्रामदैवत आहे. या महाकाली मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. हे जागृत देवस्थान असून नवसाला पावणारी देवी अशी या मातेची ख्याती आहे. नवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा असते त्यावेळी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात.
21)कुशावर्त तिर्थ-

Kushavart Tirth हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी असलेले धार्मिक पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण गोदावरी नदीच्या उगमाजवळ असून या तीर्थाच्या ठिकाणी गंगामंदिर, इंद्रेश्वर, गायत्री ही ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. दर बारा वर्षांनी नाशिक मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये कुशावर्त या ठिकाणी केलेल्या स्नानाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरापासून हे ठिकाण अंदाजे तीनशे मीटर अंतरावर आहे.
22) रामकुंड-

Ramkund हे नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदी पात्रात असलेले धार्मिक व पवित्र कुंड आहे. वनवासाच्या वेळी प्रभूराम या ठिकाणी स्नान करत असे सांगितले जाते. रामकुंडा जवळच “अस्थिविलय तीर्थ” आहे.समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलशातुन अमृताचे काही थेंब येथे पडले आणि राम कुंड पवित्र झाले अशी अख्यायिका सांगितली जाते. हिंदू धर्मीय या ठिकाणी अस्थि विसर्जन करतात.या ठिकाणी अस्थी विसर्जन केल्यानंतर मृतत्म्यास मोक्षमिळतो अशी लोकांची धारणा आहे.
दर बारा वर्षांनी या ठिकाणी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा मध्ये लाखो हिंदू भाविक स्नान करतात. या रामकुंडाचा उल्लेख रामायण मध्ये असून या ठिकाणी सीता कुंड व लक्ष्मण कुंडही आहे. या रामकुंडात स्नान केल्याने सर्व पापे नष्ट होतात अशी लोकांची धारणा आहे.
23)रामशेज किल्ला-

Ramshej Fort हा नाशिक जिल्ह्यातील गिरीदुर्ग प्रकारातील ऐतिहासिक व धार्मिक किल्ला आहे. श्रीराम श्री लंकेला जात असताना या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले होते तिथे त्यांची एक शेज आहे त्यामुळे या किल्ल्याला रामशेज हे नाव पडले. हा किल्ला डोंगरदऱ्यांमध्ये नसून मोकळ्या व सपाट मैदानावर आहे.
किल्ल्यावर पाण्याची टाकी आणि अनेक देवदेवतांची पडझड झालेली मंदिरे आहेत. मराठ्यांनी हा किल्ला मुघलांना कधीही जिंकू दिला नाही. नाशिक पासून रामशेज किल्ला 14 किलोमीटर अंतरावर आहे.
24) अंजनेरी-

Anjaneri Fort हे नाशिक जिल्ह्यातील गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.पवनपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला असे सांगितले जाते. त्यामुळे या ठिकाणाला अंजनेरी हे नाव देण्यात आले. तसेच येथील डोंगर परिसरात ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या 108 जैनधर्मीय लेण्या आहेत.
येथील बालेकिल्ल्यावर अंजनी मातेचे प्रशस्त मंदिर आहे. शिवनेरी डोंगरावर 300 पेक्षा जास्त वनस्पती आढळून आले आहेत त्यामध्ये‘सेरोपेजिया अंजनेरिका’ ही या ठिकाणी सापडलेली 1दुर्मीळ वनस्पती मात्र जगाच्या पाठीवर कुठेही नाही. नाशिक पासून अंजनेरी फाटा वीस किलोमीटर अंतरावर आहे.
Visit the travel bloghttps://theworldtravelguy.com/
1)नाशिक जिल्ह्यातील पवनपुत्र हनुमानाचा जन्म कोणत्या डोंगरावर झाला आहे?
नाशिक जिल्ह्यातील पवनपुत्र हनुमानाचा जन्म अंजनेरी डोंगरावर झाला आहे.
2)चामर लेणी पूर्वी कोणत्या नावाने ओळखली जायची?
चामर लेणी पूर्वी चांभार लेणी या नावाने ओळखली जायची?
3)श्री स्वामीनारायण मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील कोणत्या भागातील धार्मिक स्थळ आहे?
श्री स्वामीनारायण मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील पंचवटी भागातील भव्य धार्मिक स्थळ आहे.