ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील मुंबई जवळचा जिल्हा आहे. हा जिल्हा कोकण विभागामध्ये येत असून औद्योगिक दृष्ट्या भारतातील सर्व विकसित जिल्ह्यांमध्ये एक आहे. ठाणे शहर ही या ठाणे जिल्ह्याची राजधानी आहे. ठाणे शहर हे एक प्राचीन शहर असून ताम्रपट आणि मध्ययुगातील शिलालेखामध्ये या शहराचा उल्लेख आढळतो.Top 21 places visit to in thane district
सध्याच्या काळामध्ये ठाणे शहर हे औद्योगिक दृष्ट्या खूप मोठे विकसित शहर झाले आहे.
मुंबईसारख्या महानगराला लागून असल्यामुळे ठाणे जिल्ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. ठाणे जिल्ह्याचा कारभार ठाणे महानगरपालिका चालवत असून ठाणे हे हार्बर व मुंबईच्या मध्य रेल्वेचे स्थानक आहे. ठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र असून उत्तरेला गुजरात साईटला घनदाट जंगलाचा भाग आहे. तर भारताची राजधानी मुंबई हे मोठे शहर आहे. 7642 हेक्टर क्षेत्र या जिल्ह्याला मासेमारीसाठी लाभले आहे. असे वाटते विक्रीसाठी येथे मुंबईसारखी मोठी बाजारपेठ असून आखाती देशांमध्ये ही येथील माशांना खूप मागणी आहे.
औद्योगिक दृष्ट्या सधन जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो. जिल्ह्याला मिळालेली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तसेच दळणवळणाच्या जलद गतीने होणाऱ्या सोयी त्यामुळे या जिल्ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. या जिल्ह्यामध्ये अनेक औद्योगिक कारखाने कंपनी आहेत.Top 21 places visit to in thane district.
Top 21 places visit to in thane district
ठाणे जिल्ह्यातील प्रमुख प्रेक्षणीय ठिकाणे
1)एल्विस बटरफ्लाय गार्डन-

Alvis butterfly garden ठाणे जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण पर्यटन ठिकाण आहे.या ठिकाणी आपल्याला 132 पेक्षा जास्त फुलपाखरांच्या जाती दिसतात. विशेष म्हणजे हे फुलपाखराचे उद्यान मोकळ्या हवेत आहे. त्या ठिकाणी पर्यटकांना फुलपाखरांची सर्व प्रकारची माहिती दिली जाते.एल्विस बटरफ्लाय गार्डन एक सुंदर पिकनिक स्पॉट आहे.
2)सरगम वॉटर पार्क-

शहरातील हे Sargam water park ठिकाण नैसर्गिक आंब्याच्या बागांमध्ये वसलेले ठिकाण आहे. या ठिकाणी रिसॉर्ट असल्यामुळे या पर्यटकांना वॉटर राइट्स,स्विमिंग पूल आणि आंब्याच्या बागेमध्ये मजा घेता येते. ठाण्याच्या पूर्व वसई मध्ये हे ठिकाण आहे. उद्यानाच्या सभोवतालचा परिसर निसर्गरम्य असून काही पर्यटक येथे आपले वाढदिवस हे साजरे करतात.
3 )उपवन तलाव-

Upvan lake हा ठाणे महानगरपालिकेने 1880 मध्ये बांधला.हा तलाव कृत्रिम असून जेके सिंघानिया यांनी रेमंड कंपनीला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधला होता.
वर्षभर या ठिकाणी कला महोत्सव आयोजित केले जातात. देशातील सर्व निसर्गरम्य तलावांपैकी हा एक तलाव आहे. तलावाला प्रेमिकांचे नंदनवन म्हणूनही ओळखले जाते.
4)तुंगारेश्वर धबधबा-

ठाणे जिल्ह्यातील वसई आणि विरार च्या डोंगर रांगात तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य मध्ये असलेला Tungareshwar waterfall हा धबधबा सुंदर व प्रेक्षणीय आहे. येथे असणारा अभयारण्याचा निसर्गरम्य परिसर,वन्यजीव प्राणी आणि पक्षी यामुळे पर्यटक इकडे आकर्षिले जातात. पावसाळ्यात येथे मुंबई आणि परिसरातून भेट देणाऱ्या पर्यटकांची खूप गर्दी असते. या ठिकाणाला मान्सून स्पॉट देखील म्हटले जाते.
5)माहुली किल्ला-

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील 2815 फूट उंचीवर वसलेलाMahuli fort हा एक महत्वपूर्ण किल्ला आहे.
1661 शिवाजी महाराजांनी हा किल्ला मोघलांकडून जिंकून घेतला होता. हा किल्ला आसनगाव रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. ट्रेकिंग साठी हा किल्लाअत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये असलेला हा किल्ला अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे. किल्ल्याजवळून भारंगी नदी वाहते.
6)वज्रेश्वरी देवी मंदिर-

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असलेले Vajreshwary devi temple हे एक धार्मिक स्थळ आहे. तानसा नदीजवळ हे गाव आहे.या ठिकाणी असलेले वज्रेश्वरी मातेचे मंदिर जागृत देवस्थान आहे. नैसर्गिक रित्या असलेले येथील गरम पाण्याचे झरे हे इथले प्रमुख आकर्षण आहे.या ठिकाणाला वज्रेश्वरी किंवा वज्रबाई म्हणून ओळखले जाते. ठाणे शहरापासून हे ठिकाण 30 किलोमीटर अंतरावर आहे.
7) तानसा वन्यजीव अभयारण्य-

Tansa vanyajiv sanctuary हे अभयारण्य ठाणे जिल्ह्यातील आणि शहापूर तालुक्यात पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये आहे. मोडक सागर, वैतरणा आणि तानसा या तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हे अभयारण्य पसरलेले आहे. या तलावातील पाणी मुंबई ठाणे आणि भिवंडी शहराला पुरवले जाते.
हे अभयारण्य घनदाट जंगलाने व्यापलेले असून डोंगराळ आहे. 320 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे अभयारण्य विस्तारलेले आहे. या अभयारण्यात परिसरात सुमारे 60 गावे आहेत. या अभयारण्यात विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती आणि पक्षी आढळतात. ठाणे शहरापासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे
8) मदर ऑफ व्हिक्टरी चर्च-

ठाणे शहरातील टिकुचीनी वाडी इथे असलेले ‘Mother of victory church’ हे भारत देशातील ऐतिहासिक कॅथोलिक चर्च आहे. मदर मेरी चा दुसऱ्या नावावरून ‘लेडी ऑफ व्हिक्टरी’ असे नाव देण्यात आले आहे.येथील मदर मेरीचा प्रसिद्ध पुतळा जर्मनीतील विग्रात्झबाद येथून आनला आहे.
9) गोरखगड किल्ला-

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील Gorakhgadh fort हा किल्ला डोंगरी किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ल्या शेजारीच मच्छिंद्रगड किल्ला आहे. त्यामुळे या दोन्ही किल्ल्यांना जुळे किल्ले म्हणतात. घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी 2135 फूट उंच असणाऱ्या या किल्ल्याची निर्मिती केली होती. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथ यांच्या नावावरून या किल्ल्याला गोरखनाथ हे नाव देण्यात आले आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक राहण्यायोग्य गुहा आहेत.ठाणे शहरापासून हा किल्ला 58 किलोमीटर अंतरावर आहे.
10)सूरज वॉटर पार्क-

Suraj water park हे ठाणे शहरापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. 17 एकर मध्ये पसरलेले हे एक थीम पार्क आहे. वॉटर पार्क मध्ये 16 स्लाइट्स आहेत ज्या की
खूप मजेदार आणि आव्हानात्मक आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या पार्कचा सहा वेळा उल्लेख केला आहे. बारमाही येथे पर्यटकांची खूप गर्दी असते.
11) टिटवाळा गणेश मंदिर-

Titwala ganesh temple हे ठाण्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर सिद्धिविनायक महागणपती मंदिर म्हणून ही ओळखले जाते. भगवान श्री गणेशाच्या या मंदिराला हजारो भाविक दररोज भेट देत असतात. हे ठिकाण ठाणे शहरापासून 27 किलोमीटर अंतरावर आहे.
12)कालीबारी मंदिर –

Kalibari temple हे हिंदू धर्मातील काली देवीचे मुंबई येथील ठाणे मध्ये आहे. या मंदिराची रचना ही ओरिसातील प्राचीन मंदिरांसारखी आहे. बंगाली लोकांच्या समुदायाने या मंदिराची स्थापना केली आहे. या देवीचे मंदिर ठाण्यातील वर्तक नगर मध्ये आहे. देवीची मूर्ती रंगबिरंगी फुलांनी सजवलेली असते.
13)भिवंडी-

ठाण्याच्या ईशान्य दिशेला 15 कि मी अंतरावर महाराष्ट्राच्या कोकण भागात Bhivandi हे छोटे शहर आहे
‘भारताचे मँचेस्टर’ म्हणून या शहराची ओळख आहे. इचलकरंजी नंतर भिवंडी मध्ये यंत्रमागावर कापड तयार करण्याचे उद्योग आहेत. भिवंडी हा ठाणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. भिवंडीला विणकारांच्या शहर म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणी अनेक गोदामे व धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे आहेत.
14)केल्वा बीच –

Kelva beach हा अरबी समुद्राच्या 7 किलोमीटरवर भव्य किनाऱ्यावर पसरलेला आहे. हा बीच म्हणजे पर्यटकांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरूचे वृक्ष आहेत. आणि बीचवरची सोनेरी वाळू पर्यटकांना आकर्षित करते. तसेच या ठिकाणी भोजनालय आहेत. तुम्ही या ठिकाणी एटीव्ही राइड, कॅमल सवारी, घोडे सवारी करू शकता. या रोमॅण्टिक बीचवर तुम्ही सूर्य स्नान करू शकता. विकेंड मध्ये तुम्ही त्या ठिकाणी पिकनिकचा आनंद घेऊ शकता.
Please visit our website:Allindiajourney.com
15)घोडबंदर किल्ला-

Ghodbandar fort हा ठाण्यातील उल्हास नदीच्या दक्षिण दिशेला घोडबंदर गावा जवळ आहे. सोळाव्या शतकात बांधलेला हा किल्ला सर्वात जुना व प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे. घोडबंदर किल्ला हा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे.या ठिकाणी एक पोर्तुगीज चर्च आहे. सध्या ते थोडे जीर्ण अवस्थेत आहे.
या ठिकाणी मराठा राजवटीतील अनेक वाडे व खोल्या आणि भव्य बुरुज आहेत. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे मोठे खांब असलेले हॉल स्लाइडिंग द्वारे उघडता येणारे दरवाजे आहेत. तसेच बीजागरी आणि कुलूप नसलेले दरवाजे हे या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे.
16)ओवळेकर वाडी फुलपाखरू उद्यान-

Ovalekar Wadi Butterfly Garden हे ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर रोडवर ओवळे गावातअसून राजेंद्र ओवळेकर यांनी 2008 मध्ये या उद्यानाची निर्मिती केली आहे. या उद्यानामध्ये 80 पेक्षा जास्त प्रकारच्या वनस्पती आणि 500 हून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. हे उद्यान फुलपाखरांनी भरलेले अत्यंत मोहक व अद्वितीय आहे. हे उद्यान अडीच एकर वर पसरलेले असून या उद्यानात एक नर्सरी देखील आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी फुलपाखरांची प्रजनन प्रयोगशाळा आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये येथे भेट देण्याचा चांगला काळ समजला जातो.
17) ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य-

Thane Creek Flamingo Sanctuary
Thane Creek Flamingo Sanctuary हे पक्षी निरीक्षकांसाठी स्वर्ग समजले जाते. या अभयारण्याच्या निसर्गरम्य परिसर मंत्रमुग्ध करणारा आहे.येथे असणारे घनदाट खारफुटीचे जंगल खूप मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. ज्या मध्ये हजारो पक्षांची घरटी आहेत. प्रत्येक वर्षी वसंत ऋतू मध्ये ऑक्टोबर -नोव्हेंबर महिन्या दरम्यान या ठिकाणी रोहित म्हणजेच फ्लेमिंगो पक्षी येथे स्थलांतरित होतात.या पक्षांना पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. ठाण्यापासून हे ठिकाण दहा किलोमीटर अंतरावर आहे.
18) वर्धमान फॅन्टसी अॅम्युझमेंट पार्क-

vardhaman fantasy amusement park हे शिव नगर या ठिकाणी आहे. याची निर्मिती वर्धमान कल्पनारम्य मनोरंजनथर्माकोल वापरून केली आहे.जगातील सात लघु मॉडल्स आश्चर्यामध्ये हे एक आश्चर्य आहे.लेक व्हेनेशिया,व्हिवा लास वेगास,ग्रीक व्हिलेज,कोलो थिएटरम, आणि टेक्सास काउबॉय अशा अनेक थीम या पार्कमध्ये आहेत.या ठिकाणी स्पॅनिश फूड पदार्थ मिळतात.ठाणे जिल्ह्यापासून 14 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
19) तानसाधरण-

ठाणे जिल्ह्यातील Tansa damहे 1925 मध्ये बांधण्यात आले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी हे एक धरण आहे. हे धरण गुरुत्वाकर्षण धरण आहे. येथील वातावरण शांततापूर्ण असून नवीन रम्य आहे त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. संध्याकाळच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी असते. ठाणे शहर केंद्रापासून हे ठिकाण 49 किमी अंतरावर आहे.
20) तलाव पाली-

Talav pali या तलावाला मासूंदा तलाव म्हणूनओळखले जाते. मुंबईतील अनेक लोकप्रिय ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे. तलावाच्या मध्यभागी एक बेट आहे. ज्याचाकडे पाहून मनाला शांतता मिळते. तलावाजवळ अनेक प्रसिद्ध पाहण्यासारखे ठिकाणी आहेत.सेंट जॉन चर्च,गडकरी रंगायतन,कोपिनेश्वर मंदिर इ. ठाणे शहरापासून हे दोन ठिकाण दोन किलोमीटर अंतरावर आहे.
21)कोपिनेश्वर मंदिर-

ठाणे शहरातील Kopineshwar temple हे महाराष्ट्रातील तीर्थस्थळांपैकी प्रमुख तीर्थस्थळ आहे. भगवान शिवाचे हे मंदिर ठाण्याच्या मासूंदा तलावाजवळ आहे.या तलावामध्येच हे शिवलिंग सापडले होते. या मंदिराला ठाण्याचा संरक्षक देव असे मानले जाते. ठाण्यापासून हे मंदिर तीन किलोमीटर अंतरावर आहे.

1)ओवळेकर वाडी फुलपाखरू उद्द्यानाची निर्मिती कोणी केली ?
ओवळेकर वाडी फुलपाखरू उद्द्यानाची निर्मिती राजेंद्र ओवळेकर यांनी २००८ मध्ये केली .
2)कोपिनेश्वर मंदिर कोणत्या तलावाजवळ आहे ?
कोपिनेश्वर मंदिर मासुंदा तलावाजवळ आहे .
3)तानसा धरण किती साली बांधले ?
तानसा धरण १९२५ साली बांधले .