मंडळी भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे कोल्हापूर हा महाराष्ट्र राज्यातील एक ऐतिहासिक, सुजलाम, सुफलाम आणि करवीरनगरी म्हणून ओळखला जाणारा सांस्कृतिक दृष्ट्या महत्वपूर्ण जिल्हा आहे. या जिल्ह्यात श्री महालक्ष्मी देवीचे शक्ती पीठ असल्यामुळे आणि हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले असल्यामुळे या जिल्ह्याला ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते.Top 21 places visit to in Kolhapur District
या जिल्ह्यातील पिकांमध्ये ऊस, तूर, सोयाबीन, तंबाखू, तांदूळ, ज्वारी, कापूस आणि काजू ही पिके घेतली जातात.शेतीतील दरडोई उत्पन्नामध्ये हा जिल्हा आघाडीवर असतो. या जिल्ह्यात पंचगंगा, भोगवती, वर्धा, कासारी, वेजगंगा, कृष्णा,कुम्भी या नद्या वाहतात.कोल्हापूर जिल्ह्यात मराठी चित्रपट सृष्टीची निर्मिती झाल्यामुळे या जिल्ह्याला ‘चित्रनगरी’ म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्यात यादव, राष्ट्रकूट आणि चालुक्य यांसारख्या राजवटी होत्या.
शाहू महाराजांच्या काळात या जिल्ह्याचा औद्योगिक आणि सामाजिक विकास झपाट्याने झाला. तसेच या जिल्ह्यातील इचलकरंजी शहरला ‘महाराष्ट्रातील मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाते. कारण या ठिकाणी 5000 सूत गिरण्या आहेत. तसेच कोल्हापूर मध्ये साखर कारखाने, कापड गिरण्या, अभियांत्रिक वस्तू, पोल्ट्री, फाउंड्री, रासायनिक उद्योग आहेत. तसेच येथील कोल्हापुरी चप्पल उद्योग प्रसिद्ध आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठे स्थान आहे.
या जिल्ह्यात 12 तालुके असून अनेक धार्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिक, सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत. शिक्षण क्षेत्रातील हा जिल्हा आघाडीवर आहे. हा जिल्हा खाद्य संस्कृतीमध्ये भारतभर प्रसिद्ध आहे. येथील तांबडा आणि पांढरा रस्सा खूप प्रसिद्ध आहे.खिद्रापूर कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण, मसालेदार पाककृती, कोल्हापुरी गूळ आणि तिखटपणा या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. तसेच या जिल्ह्यात कोल्हापूरी तांब्याची वाण, कोल्हापूरी मिसळ प्रसिद्ध आहे.
Top 21 places visit to in Kolhapur District
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे-
1) महालक्ष्मी मंदिर-

Mahalaxmi Temple हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तिपीठ असलेले मंदिर आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आlणि जागृत देवस्थान आहे.या मंदिराची स्थापना सातव्या शतकातील कर्णदेव यांनी केली होती.
कोल्हापूर शहरातील हे एक शक्तीपीठ असून या मंदिराला ‘अंबाबाई मंदिर’ या नावाने ही ओळखले जाते. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून मंदिरात काळा दगडात कोरलेली देवीची मूर्ती तीन फूट उंच व 40 किलो वजनाची आहे. विशेष म्हणजे दरवर्षी 31 जानेवारी आणि 9 नोव्हेंबरला देवीच्या मूर्तीवर थेट सूर्य किरणे पडतात. हे अद्वितीय दृश्य पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात.
2) ज्योतिबा मंदिर-

Jyotiba Temple हे सोलापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी या ठिकाणी असलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे एक जागृत देवस्थान असून कोल्हापूर शहरापासून हे मंदिर 3124 फुट उंचीवर डोंगरावर आहे. जोतिबा देवस्थान हे ब्रम्हा विष्णू आणि महेश यांचे संयुक्त रूप मानले जाते. 1730 मध्ये राणोजी शिंदे यांनी हे मंदिर बांधले. तसेच मंदिर परिसरात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. चैत्र पौर्णिमेला लाखो भाविक सासन काठी घेऊन येतात व गुलाल खोबऱ्याची देवावर उधळण करतात. नवसाला पावणारा देव म्हणून ज्योतिबा देवाची ख्याती आहे.
Please visit our website: allindiajourney.com
3) पन्हाळा किल्ला-

Panhala Fort कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. मराठा साम्राज्याच्या दृष्टीने हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. समुद्रसपाटीपासून हा किल्ला 3177 फूट उंचीवर असून छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये अफजल खानाचा पराभव करून जिंकला होता.
या किल्ल्यावरील तीन दरवाजा विहीर, हनुमान मंदिर, अंधारबाव, पारसदार दरवाजा ही ठिकाणे शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी उपयोगी पडत होती. 1760 मध्ये सिद्धी जोहार ने पन्हाळ्याला वेढा दिला होता तेव्हा शिवाजी महाराज कोंडाजी फर्जत आणि इतर मावळ्या सह रात्रीच्या वेळी पन्हाळगडाहून विशाळगडाला गेले होते. या घटनेला “पळशीरची रात्र” म्हणून आजही ओळखले जाते. पासून हा किल्ला 20 किलोमीटर अंतरावर आहे.
4) राधानगरी अभयारण्य-

Radhanagri Senctuary हे कोल्हापूर जिल्ह्यातील जैवविविधतेने बहरलेले एक अभयारण्य आहे. हे अभयारण्य बायसन ( गवा ) साठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या अभयारण्याला बायसन अभयारण्य म्हणतात. या अभयारण्यात भालू, सांबर, चितळ, माकड, गवा, माऊस, वाघ हे वन्यजीव प्राणी आढळतात. तसेच या अभयारण्यात 270 पक्ष्यांच्या जाती व 66 फुलपाखरांच्या जाती आढळून आले आहेत.
हे अभयारण्य 351.16 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्याचे पूर्वीचे नाव दाजीपूर अभयारण्य होते परंतु 1985 मध्ये राधानगरी अभयारण्य म्हणून घोषित केले. तसेच या अभयारण्यातुन भागवती, तुळशी, काळम्मा या नद्या वाहतात. आणि राधानगरी धरण याच परिसरात आहे. कोल्हापूर पासून हे ठिकाण 55 किलोमीटर अंतरावर आहे.
5) रांगणा किल्ला-

Rangna Fort हा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याला ‘प्रसिद्धगड’ म्हणून ही ओळखले जाते. हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असून 800 मीटर उंचीवर आहे. सध्या या किल्ल्याच्या तिन्ही बाजू तुटलेल्या अवस्थेत आहेत. 1666 मध्ये सावंतवाडीच्या सावंताकडून शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. या किल्ल्यावर एक तलाव आणि दोन विहिरी आहेत. तसेच किल्ल्यावर रांगणाई देवी, महादेव आणि मारुती यांची मंदिरे आहेत. रांगणा किल्ला हा कोल्हापूर पासून 105 किलोमीटर अंतरावर आहे.
6) छत्रपती शाहू संग्रहालय-

Chatrapati Shahu Museum हे कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारशाचे ठिकाण आहे. या संग्रहालयाला न्यू पॅलेस म्युझियम म्हणूनही ओळखले जाते. हा पॅलेस अष्टकोनी असून मध्यभागी भव्य घड्याळ मिनार आहे. त्यात पॅलेस चा दरबार हॉलमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांचे चित्रीकरण केले आहे.
तसेच राजवाडा परिसरात छोटे प्राणी संग्रहालय आहे. त्यामध्ये मोर, शहामृग, हरिण, चितळ, सांबर हे प्राणी पाहायला भेटतात. तसेच या संग्रहालयामध्ये वस्त्र, दागिने, नाणी, शस्त्रे, चांदीचे हत्तीचे saddles या वस्तू ठेवल्या आहेत.आणि काळा पँथर, रानडुक्कर, हिमालयन काळा अस्वल, वाघाचे डोके अशा प्रकारचे शिकारीचे नमुने आणि विविध प्रकारच्या शिल्पकलेतल्या वस्तू ठेवण्यात आले आहेत.
7) कणेरी मठ-

Kaneri Math हे कोल्हापूर जिल्ह्यातील कनेरी गावातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या मठाला सिद्धगिरी मठ म्हणून ही ओळखले जाते. हा मठ 7व्या शतकात स्थापन झाला असून 7 एकर जागेमध्ये पसरलेला आहे. हा मठ मोकळ्या आकाशाखाली असून त्यामध्ये 80 पेक्षा अधिक जीवनदृष्ये आणि 300 हून अधिक जीवनमापी शिल्पे साकारली आहेत, ज्यामध्ये 12 बलुतेदार आणि त्यांच्या विविध पारंपरिक व्यवसायांचे चित्रण करण्यात आले आहे. हे सर्व शिल्पे पाहून त्या वेळच्या ग्रामीण जीवनाचे माहिती मिळते. या मठाच्या परिसरात लखपती शेती, आणि कड सिद्धेश्वर मंदिर पहावयास मिळते. कोल्हापूर पासून हे ठिकाण 12 किलोमीटर अंतरावर आहे.
8) रंकाळा तलाव-

Rankala Lake कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि नैसर्गिक तलाव आहे. कोल्हापूर शहराच्या मध्यभागी असलेला हा तलाव महालक्ष्मी मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. ‘कोल्हापूरची चौपाटी’ म्हणूनही या तलावाला ओळखले जाते. पूर्वी या ठिकाणी दगडाची खाण होती परंतु आठव्या शतकात झालेल्या भूकंपामुळे या ठिकाणी पाणी वाहू लागले आणि या तलावाची निर्मिती झाली.हा तलाव 202 हेक्टर मध्ये पसरलेला आहे. या तलाव परिसरात संध्यामठ, शालिनी पॅलेस, पद्मराजे उद्यान, रंग भैरव मंदिर की ठिकाणे पाहायला मिळतात. संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.
9) गगनबावडा-

Gaganbavda हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी बरेच पर्यटन स्थळे आहेत त्यामध्ये पडझड झालेला गगनगड किल्ला असून किल्ल्यामध्ये असलेले भवानी मातेचे मंदिर आणि लहान मशीद पाहायला मिळते. तसेच गगनगिरी आश्रम, मोरजाई पठार आणि मंदिर, पाळसंबे गुहा,पंत अमात्य वाडा, लाखनपूर धरण, डी वाय पाटील साखर कारखाना इत्यादी ठिकाणी पाहायला मिळतात. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात.
10) विशालगड किल्ला-

Vishalgag Fort हा कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे किल्ल्याचे पूर्वीचे नाव ‘खिलगड’होते परंतु 1659 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचे विशाळगड हे नामकरण केले. सह्याद्री पर्वत रांगेतील हा किल्ला 3500 मीटर उंचीवर आहे. सध्या या किल्ल्याचे बांधकाम काही ठिकाणी ढासळले आहे. तसेच पावनखिंड हे ऐतिहासिक ठिकाण या किल्ल्याच्या मार्गावर आहे. कोल्हापूर मधील अंबा गावापासून 20 मिनिटाच्या अंतरावर हे ठिकाण आहे.
11) कोपेश्वर मंदिर खिद्रापूर-

Kopeshwar Temple हे कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर असलेले खिद्रापूर गावातील निसर्गरम्य परिसरातील मंदिर आहे. हे मंदिर शिलाहार राजे गंधरादित्य यांनी12 व्या शतकात बांधले असल्याचे सांगितले जाते. या मंदिराची वास्तुकला अद्भुत असून हे मंदिर चार भागात विभागले आहे. यामध्ये स्वर्गमंडप, सभा मंडप, अंतराळ कक्ष आणि गर्भगृह हे पाहता येतात. मंदिरातील खांबांवर, छतांवर आणि खांबांवर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम कोरलेले आहे. कोल्हापूर पासून हे ठिकाण 60 किलोमीटर अंतरावर आहे.
12) आंबा घाट-

Amba Ghat हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण घनदाट जंगलांनी बहरलेले असून या ठिकाणी वर्षभर आल्हादायक आणि थंड वातावरण असते. आंबा घाट हा 2100 फूट उंच उंचीवर असून हे ठिकाण साह्याद्री टायगर रिझर्व्ह आणि दाजीपूर बायसन अभयारण्याच्या बफर झोनमध्ये येते त्या मुळे या ठिकाणी भरपूर प्रमाणात जैवविविधता पाहायला भेटते. या ठिकाणी विविध प्रकारचे वन्य जीव प्राणी आणि पक्षी आढळतात. सध्याच्या काळात या ठिकाणी पॅराग्लायडिंग आणि जंगल सफारीची पर्यटकांसाठी सोय करण्यात आली आहे.
13) शालिनी पॅलेस-

Shalini Palace हे कोल्हापूर मधील ऐतिहासिक ठिकाण आहे. हा पॅलेस रंकाळा तलावाच्या किनाऱ्यावर असून
कोल्हापूरची राजकुमारी शालिनी राजे यांच्या नावावरून शालिनी पॅलेस असे नाव देण्यात आले. हा पॅलेस1931 ते 1934 दरम्यान बांधला गेला. हा पॅलेस अत्यंत सुंदर असून काळा दगड आणि इटालियन मार्बल मध्ये बांधलेला आहे. हा पॅलेस बाहेरून पाहण्यासाठी सर्वांसाठी खुला आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण चार किलोमीटर अंतरावर आहे.
14) भवानी मंडप-

Bhavani Mandap हे ठिकाण कोल्हापूर मधील सर्वात जुनी वास्तू आहे. पूर्वी या राजवाड्यात शाहू महाराजांचा दरबार भरत असे. या ठिकाणी शाहू महाराजांचा पूर्णा कृती पुतळा आहे. तसेच या ठिकाणी शिवाजी महाराजांनी वापरलेले एक लाकडी सिंहासन देखील आहे. हे सांगितले जाते की भवानी मंडपापासून पन्हाळगडापर्यंत भुयारी बोगदा आहे. या राजवाड्यात पुतळे, शाहू महाराजांची शिल्पे, जंगली प्राण्यांचे मुखवटे इ. गोष्टी पाहायला मिळतात. कोल्हापूर पासून हे ठिकाण तीन किलोमीटर अंतरावर आहे.
15) खासबाग मैदान-

Khasbag Maidan हे कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व असलेले कुस्तीचे मैदान आहे. छत्रपती शाहू महाराजांनी 1907 मध्ये वेगवेगळ्या देशातील कुस्तीच्या आखाड्याची पाहणी करून या मैदानाचे बांधकाम सुरू केले आणि 1912 मध्ये ते पूर्ण झाले.हे मैदान गोलाकार असून मध्यभागी कुस्तीचा आखाडा आहे. आखाड्याभोवती 30,000 लोक बसतील अशी व्यवस्था केलेली आहे. आज पर्यंत सर्व जाती-धर्माच्या अनेक पैलवानांनी या आखाड्यात कुस्तीचे प्रशिक्षण घेतले आहे. आजही या मैदानात कुस्ती स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात. हे ठिकाण कोल्हापूरच्या मध्यभागी असून महालक्ष्मी मंदिरापासून पाच मिनिट अंतरावर आहे.
16) श्री संत बाळूमामा देवस्थान आदमापूर-

Shree Sant Baiumama Temple देवस्थान हे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील आदमापूर या गावामधील पवित्र तीर्थस्थानआहे. या ठिकाणी बाळूमामांची समाधी आहे. आणि मंदिराच्या गाभाऱ्यात बाळुमामाची सुंदर मूर्ती आहे. तसेच मंदिरात धातूपासून बनवलेला मेंढ्यांचा पुतळा आहे. 1892 मध्ये बेळगाव जिल्ह्यातील अकोळ गावामध्ये संत बाळूमामा यांचा जन्म मायाप्पा आणि सत्तू बाई या धनगर जोडप्याच्या पोटी झाला. त्यांनी जन्मभर मेंढ्या राखून भक्तांच्या कल्याणासाठी काम केले आणि त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. त्यांनी केलेल्या चमत्कारी गोष्टी आजही आपल्याला सांगितल्या जातात. भक्तांच्या कल्याणासाठी संत बाळूमामानी खूप मोठे कार्य केलेले आहे.
17) श्री नृसिंहवाडी दत्त मंदिर-

Shree Nrusinhavadi Datta Mandir हे कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले अत्यंत पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणाला नरसोबावाडी म्हणून ही ओळखले जाते. श्री दत्तगुरूंचे तिसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी या ठिकाणी 12 वर्षे वास्तव्य केले होते.या मंदिरात श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या पादुकांचे पूजन केले जाते. पोर्णिमा शनिवार आणि दत्त जयंतीला मंदिरात जास्त प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. कृष्णा नदीत भाविक स्नानाचा आनंद घेतात.
18) रामलिंग गुफा मंदिर-

Ramling Cave Temple हे कोल्हापूर जिल्ह्यामधील गगनबावडा तालुक्यातील पळसंबे गावातील नैसर्गिक ठिकाणी असलेले ऐतिहासिक व धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी रामाने वनवासाच्या काळात स्थापन केलेले प्राचीन शिवलिंग आहे त्यामुळे हे ठिकाण ‘रामलिंग’ म्हणून ही ओळखले जाते. हे मंदिर खडका मध्ये कोरलेले असून त्यामध्ये बारा फूट लांबीची गुफा आहे. गुफेमध्ये मोठे शिवलिंग असून बारमाही या शिवलिंगावर पाणी पडत असते. हे पाणी कुठून पडते याचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही. तसेच या गुफेमध्ये गणपती, पार्वती देवी आणि वीरभद्र यांची मूर्त्या आहेत.
मंदिर मंदिर परिसरात घनदाट झाडे,ओढे आणि धबधबे आहेत त्यामुळे या ठिकाणी मनाला प्रसन्नता मिळते.
19) राधानगरी धरण-

Radhanagri Dam हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील महत्त्वाचे आणि सर्वात जुने धरण आहे. हे धरण दूधगंगा नदीवर बांधलेले असून या धरणाला काळम्मावाडी धरण म्हणूनही ओळखले जाते.
हे धरण 1999 मध्ये बांधून पूर्ण झाले.या धरणाची उंची 73.08 मीटर असून, लांबी 1280 मीटर एवढी आहे.या धरणाची जलसाठाक्षमता सुमारे 28,000 दशलक्ष घनफूट (TMC) आहे.या धरणातील पाण्याचा वापर शेतीच्या सिंचनासाठी आणि जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो. येथील धरणाच्या आसपासच्या परिसर हा राधानगरी अभयारण्याचा आहे. जंगल सफारी आणि ट्रेकिंग प्रेमी साठी हे ठिकाण उत्तम आहे.या ठिकाणाला पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात.कोल्हापूर पासून हे ठिकाण 75 किलोमीटर अंतरावर आहे.
20)राऊतवाडी धबधबा-

Rautvadi Waterfall हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील नैसर्गिक प्रेक्षणीय ठिकाण आहे. सह्याद्रीच्या डोंगर रंगांमधून वाहणारा हा धबधबा पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोसळतो. या धबधब्याच्या परिसरात राधानगरी धरण आणि कळंब तलाव हे ठिकाणी आहेत. कोल्हापूर पासून राऊतवाडी धबधबा 50 किलोमीटर अंतरावर आहे.
21) तिलारी धरण-

Tilari Dam हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील तिलारी नदीवर बांधलेले धरण आहे. या धरणातील जलसाठ्याचा उपयोग महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यातील सिंचनासाठी आणि जलविद्युत निर्मितीसाठी वापरला जातो. या धरणाची उंची 38.05 मीटर आणि लांबी 485 मीटर आहे. तसेच या धरणावर 60 मेगावॅट एवढी वीज निर्मिती केली जाते. या धरण परिसरात तिलारी वनक्षेत्रआणि सुंदर धबधबे पाहायला भेटतात.तिलारी धरण हे कोल्हापूर पासून 128 किलोमीटर अंतरावर आहे.

1)श्री नृसिंहवाडी दत्त मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या संगमावर वसले आहे?
श्री नृसिंहवाडी दत्त मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले तीर्थक्षेत्र आहे.
2)शालिनी पॅलेस हे कोल्हापूर मधील ऐतिहासिक ठिकाण कुठे आहे?
शालिनी पॅलेस हे कोल्हापूर मधील ऐतिहासिक ठिकाण रंकाळा तलावाच्या काठावर आहे.
3)खासबाग मैदान हे कोल्हापूर जिल्ह्यातील कशाचे मैदान आहे?
खासबाग मैदान हे कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व असलेले कुस्तीचे मैदान आहे.