मंडळी भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे:
जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रातील खान्देश विभागात आहे. हा जिल्हा उत्तरेकडील सातपुडा रांगा आणि अजिंठा पर्वतरांगांमध्ये दक्षिणेकडे आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने आहिराणी आणि मराठी या भाषा बोलल्या जातात. जळगाव जिल्ह्याला ‘केळीचे शहर’ म्हणून ओळखले जाते.तसेच या जिल्ह्यात 15 तालुके असून तापी, गिरणा, वाघुर या प्रमुख नद्या आहेत.Top 18 places visit to in Jalgaon District
प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे या जिल्ह्यातील होते. तर साने गुरुजींची ही कर्मभूमी होती. या जिल्ह्यात अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. येथील प्रमुख होते ही केळी, कापूस डाळी इ. आहेत. जळगाव जिल्ह्यात नव रात्री महोत्सव, मुक्ताई मेळावा,चांगदेव मेळावा, श्रीराम रथोत्सव हे उत्सव साजरे केले जातात.
येथील खाद्य संस्कृतीमध्ये मुख्यत्वे वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी, पुरणपोळी, शेव भाजी यांचा समावेश असतो. या जिल्ह्यात अन्नप्रक्रिया आणि कापड उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. या जिल्ह्याचा इतिहास रामायण आणि महाभारताचे संबंधित आहे. या जिल्ह्यात आश्चर्यचकित करणारी नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत.
Top 18 places visit to in Jalgaon District
जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे-
1) श्री क्षेत्र पद्मालय

Shree Kshetra Padmalay हे जळगाव जिल्ह्यातील देशभरात प्रसिद्ध असलेले महाभारतकालीन श्री क्षेत्र पद्मालय गणपती मंदिर एरंडोल गावापासून 11 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिर परिसर हा घनदाट जंगलाचा असून या ठिकाणी रंगीबेरंगी कमळ फुलांचा तलाव आहे. या ठिकाणी आमोद आणि प्रमोद अशा स्वयंभू दोन गणेशाच्या मूर्ती आहेत. त्यामध्ये एक उजव्या सोंडेचा गणपती आणि दुसरा डाव्या सोंडेचा गणपती आहे.देशातील अडीच शक्तीपीठापैकी हे गणपती मंदिर अर्ध शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. तसेच मंदिरात गोविंद महाराज यांच्या पादुका शेजारी 440 किलो वजनाची एक घंटा आहे. येथील मंदिर परिसरात एक भिमकुंड आहे. पावसाळ्यात येथील परिसर हिरवाईने नटलेला असतो. अंगारकी आणि संकष्टीला मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात असते. जळगाव पासून हे मंदिर 30 किलोमीटर अंतरावर आहे.
2) बहिणाबाई पार्क-

Bahinabai Park हे जळगाव जिल्ह्यातील मध्यस्थानी असलेले निसर्गरम्य उद्यान आहे. प्रसिद्ध मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने हे उद्यान ओळखले जाते. या उद्यानात अनेक प्रकारचे झाडे व पक्षी पाहायला मिळतात. येथील निसर्गरम्य वातावरण, फुलांची बाग आणि शांतता आपल्याला ताजेतवाने बनवते. तसेच या ठिकाणी मुलांसाठी विविध प्रकारचे खेळणी उपलब्ध आहेत. संध्याकाळच्या वेळी या उद्यानात जास्त गर्दी असते.
3)यावल वन्यजीव अभयारण्य-

Yaval Wildlife Sanctuary हे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील एकमेव महत्वाचे अभयारण्य आहे.
हे अभयारण्य मध्यप्रदेशच्या सीमेलगत असून अनेर आणि मांजर नदीच्या काठावर आहे. घनदाट जंगलाने व्यापलेले हे अभयारण्य 176 चौरस किलोमीटर अंतरावर पसरलेले आहे. या अभयारण्यात सालई, आंजण, तेंडू, जामुन, हळदू, शिसम, बाभूळ, अशा विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. तसेच या ठिकाणी बिबट्या, वाघ, अस्वल, नीलगाय, तरस, रानडुक्कर, रान ससा, चिकारा, माकडे, हरीण असे अनेक प्रकारचे वन्यजीव प्राणी आढळून येतात. या अभयारण्यात जंगल सफारीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जळगाव पासून हे ठिकाण 47 किलोमीटर अंतरावर आहे.
4)फरकांडे, एरंडोल येथील झुलते मनोरे-

Please visit our website: allindiajourney.com
जळगाव जिल्ह्यातील फरकांडे, एरंडोल येथीलSwinging Towers एक आश्चर्य समजले जाते. हे मनोरे म्हणजे जुन्या बांधकामाचे एक उत्तम उदाहरणच आहे. येथील दोन मनोऱ्यामध्ये पंधरा मीटरचे अंतर आहे. येथील एक बुरुज हलवल्यास दुसरे बुरुजही आपोआप हलतात. या मनोऱ्याची उंची सुमारे पंधरा मीटर असून हे मनोरे 250 ते 400 वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. या मनोरच्या आतून गोलाकार पायऱ्या असून एकावेळी एकच व्यक्ती चढू शकते. आणि वरच्या टोकावर चार लहान कमान आहेत त्यामुळे येथून परिसराचे निरीक्षण करता येते. हे मनोरे फारोकी राजवटीत बांधले गेले असावे असे सांगितले जाते.
5) चंडिका देवी मंदिर/ पाटणादेवी-

Patnadevi Temple हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पासून 18 किलोमीटरवर अंतरावर आदिशक्ती चंडिका देवीचे पुरातन जागृत देवस्थान आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून मंदिराच्या गाभाऱ्यात भव्य शिवलिंग आहे.हे मंदिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असून डोंगरी नदीच्या काठावर आहे. येथील पाटणा गावावरून देवीचे नाव पाटणादेवी पडले. मंदिर परिसर निसर्गाने आणि वनराई ने बहरलेला आहे. येथील डोंगरातून वाहणारे खळखळते झरे विविध प्रकारच्या वनस्पती पक्षी मन मोहुन टाकतात. नवरात्रीमध्ये अश्विन महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते.चाळीसगाव शहरापासून हे ठिकाण 18 किलोमीटर अंतरावर आहे.
6) संत मुक्ताबाई मंदिर-

Sant Muktabai Temple हे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यामध्ये कोथळी गावामध्ये आहे. संत मुक्ताबाई या वारकरी संप्रदायातील होत्या. ज्ञानेश्वर निवृत्ती आणि सोपान यांची त्या बहिण होत्या त्यांनी 41 अभंग रचले. त्यातील ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ हा अभंग सर्वांना परिचित आहे. मंदिरा भोवतालचा परिसर शांत आणि रमणीय आहे. एकादशीला या मंदिरात विशेष पूजा केली जाते.
7) संत चांगदेव महाराज मंदिर-

Sant Changdev Maharaj Temple हेमाडपंथी शैलीत बांधलेले जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यामध्ये चांगदेव गावामध्ये आहे. हे मंदिर तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावर आहे.चांगदेव महाराज बाराव्या शतकातील महान तपस्वी योगी होती त्यांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली होती. ज्ञानेश्वर महाराजांची त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचा सर्व अहंकार गळून गेला होता. १७ व्या शतकात राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. महाशिवरात्रीला येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते.
8) हातनुर धरण-

Hatnur Dam हे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हातनूर गावाजवळ तापी नदीवर बांधलेले धरण आहे. या धरणातील पाण्याचा उपयोग सिंचन, जल पुरवठा आणि जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो. धरण परिसर निसर्ग समृद्धीने बहरलेला आहे. या धरणाची उंची 25.5 एवढी असून लांबी 2580 मीटर एवढी आहे. भुसावळ पासून हे ठिकाण 25 किलोमीटर अंतरावर आहे.
9) पाल हिल स्टेशन-

Pal Hill Station हे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पाल गावामध्ये आहे. हे थंड हवेचे ठिकाण निसर्ग सौंदर्याने बहरलेले असून ते सातपुडा पर्वत रांगांमध्ये आहे. हे हिल स्टेशन यावल अभयारण्य जवळ आहे. या हिल स्टेशन कडे जाताना सुकी नदीवरील गर्भाडी धरण पहायला भेटते. हा हिल स्टेशन परिसर घनदाट जंगलाचा असून या ठिकाणी वनस्पती संग्रहालय, वन उत्पादनाच्या संग्रहालय, वन्यजीव अनाथालय पाहिला भेटतात.
10) गांधी रिसर्च फाउंडेशन-

Gandhi Research Foundation हे जळगाव जिल्ह्यातील जैन हिल्स या ठिकाणी आहे. या संस्थेमध्ये महात्मा गांधीच्या संपूर्ण जीवनपटावर अध्ययन आणि प्रचार करण्याचे काम केले जाते. 25 मार्च 2012 मध्ये या फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली. या संस्थेचे मुख्य आकर्षण म्हणजे”खोज गांधीजी की” हे बहु-माध्यमीय संग्रहालय आहे. या ठिकाणी १४८ गांधीजींच्या भाषणांचे ऑडिओ रेकॉर्डिंग्ज आहेत.जळगाव पासून हे ठिकाण आठ किलोमीटर अंतरावर आहे.
11) पारोळा किल्ला-

Parola Fort हा जळगाव जिल्ह्यातील पारोळा मध्ये असलेला एक ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. मराठा साम्राज्याच्या स्थापनेतील हा एक महत्वपूर्ण किल्ला आहे. ज्याची निर्मिती 1727 मध्ये केली गेली. या किल्ल्याच्या चारही बाजूला खंदक असून पूर्व बाजूला तलाव आहे. किल्ल्यावर ‘दिल्ली दरवाजा’ गणपती मंदिर, आणि वीहीर पहावयास भेटते. जळगाव पासून हा किल्ला सुमारे 55 किलोमीटर अंतरावर आहे.
12) उनपदेव-

Unapdev हे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये
अडावद गावाजवळ ऐतिहासिक व धार्मिक ठिकाण आहे.
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले हे ठिकाण निसर्गरम्य असून या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत.
येथील उष्ण पाण्याच्या झऱ्यातील पाण्याने अंघोळ केली तर त्वचा रोग नष्ट होतात असे मानले जाते. रामायण मध्ये या ठिकाणाचा उल्लेख केलेला आहे. श्रीरामाने शरभंग ऋषीसाठी या उष्ण पाण्याचा स्रोत निर्माण केला, असे मानले जाते. हे वर्षभर उष्ण पाणी गोवर्धनाच्या मुखातून बाहेर पडते. त्यामुळे या ठिकाणाला धार्मिक महत्त्व आहे.
13) मनुदेवी मंदिर-

Manudevi Temple हे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आडगाव गावामध्ये असलेले धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. हे मंदिर सातपुडा पर्वतरांगा मध्ये असून तापी नदीच्या काठावर आहे. मनुदेवी ही जळगाव मधील लोकांची कुलदेवी आहे. महिषासुरासी युद्ध केल्यानंतर देवी विश्रांतीसाठी या ठिकाणी थांबली होती अशी आख्यायिका सांगितली जाते. मंदिराच्या समोरच एक सुंदर धबधबा आहे जो पर्यटकांना आकर्षित करतो. जळगाव पासून हे ठिकाण 35 किलोमीटर अंतरावर आहे.
14) मंगळ ग्रह मंदिर-

Mangal Grah Temple हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी आहे. हे भारतातील अति प्राचीन व अति दुर्मिळ मंदिर आहे. मंदिरात मंगळ ग्रहाची स्वयंभू मूर्ती आहे.हे मंदिर कोणी बांधले याची अधिकृत माहिती मिळत नाही. हे मंदिर मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. मांगलिक दोष निवारण्यासाठी भावीक या ठिकाणी अभिषेक आणि पूजा करतात. येथील मंदिर परिसरात फुलबागा आणि नैसर्गिक ठिकाणी आहेत. 1933 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जळगाव पासून हे मंदिर 35 किलोमीटर अंतरावर आहे.
15) रामेश्वर मंदिर जळगाव-

Rameshwar Temple हे जळगाव जिल्ह्यातील पळसोद तालुक्यातील एक धार्मिक व ऐतिहासिक स्थळ आहे. हे मंदिर गिरणा, अंजनी व तापी नदीच्या त्रिवेणी संगमावर आहे. असे सांगितले जाते की प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण वनवासाच्या वेळी या ठिकाणी थांबले होते तेव्हा त्यांनी या ठिकाणी दोन शिवलिंगाची स्थापना केली. तसेच विश्वामित्र ऋषींनी या ठिकाणी रामरक्षा यज्ञ केलेले चा उल्लेख तापीपुराणात आढळतो. दोन शिवलिंग असलेले हे मंदिर दक्षिण भारतानंतर या ठिकाणी एकमेव आहे. हे मंदिर ओम आकाराचे असल्यामुळे या मंदिराला विशेष अध्यात्मिक महत्त्व आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला तीन ते चार किलोमीटर पायी चालत जावे लागते.इ. स. बाराशे मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता.
.16) महर्षी कण्व आश्रम-

Mahrshi Kanva Ashram हे जळगाव जिल्ह्यातील कानळदा या गावातील एक धार्मिक व अध्यात्मिक पर्यटन स्थळ आहे. हा आश्रम गिरणा निसर्गाच्या सानिध्यात नदीच्या काठावर आहे.महाभारत कालीन महर्षी कण्व ऋषी हे येथील गुहांमध्ये तपस्या करत असायचे. ते पांडवांचे गुरु होते. या आश्रमा सभोवतालच्या परिसरात अनेक लेण्या आहेत. येथील गुहांमध्ये सापांचे साम्राज्य असल्यामुळे प्रवेश दिला जात नाही. जळगाव शहरापासून हे ठिकाण बारा किलोमीटर अंतरावर आहे.
17) श्री हरीहरेश्वर मंदिर-

Shree Harihareshwar Temple हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यामध्ये असलेले पिंपळगाव हरेश्वर या गावातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळ आहे. मंदिर बाराव्या शतकात बांधले असल्याचे सांगितले जाते. येथील मंदिरात विष्णूआणि शिव यांचे संयुक्त रूप ‘हरिहरेश्वर’ म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिर परिसरात गणपतीचे मंदिर आणि गोविंद महाराजांची समाधी आहे. या मंदिरातील स्थापत्य शास्त्रात कन्नड शैलीचा प्रभाव दिसून येतो. मंदिरातील 58 खांबावर सुंदर कोरीव काम केलेले आहे. जळगाव पासुन हे मंदिर 61 किलोमीटर अंतरावर आहे.
18)त्रिविक्रम मंदिर-

Trivikram Temple जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी या ठिकाणी असलेले धार्मिक स्थळ आहे. १७३४ मध्ये संत कडोजी महाराज यांनी या मंदिराची स्थापना केली. हे मंदिर ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखले जाते. या मंदिरात विठोबा विष्णू आणि बालाजी चा संगम असल्यामुळे या मंदिराला त्रैविक्रम मंदिर म्हणतात. शेंदुर्णीतील या मंदिरातील मूर्ती सोन नदीच्या काठावर 25 फूट खोलीवर सापडली आहे.
पंढरपूर सारखेच या ठिकाणी भक्तांची गर्दी असते. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला या मंदिरात विशेष पूजा केली जाते. जळगाव पासुन हे ठिकाण 51 किलोमीटर अंतरावर आहे.

1)महर्षी कण्व आश्रम जळगाव जिल्ह्यातील कोणत्या गावात आहे ?
1)महर्षी कण्व आश्रम जळगाव जिल्ह्यातील कानळदा गावात आहे .
2)मंगळ ग्रह मंदिर हे जळगाव जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे?
मंगळ ग्रह मंदिर हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी आहे.
3)गांधी रिसर्च फाउंडेशन हे जळगाव जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे?
गांधी रिसर्च फाउंडेशन हे जळगाव जिल्ह्यातील जैन हिल्स या ठिकाणी आहे.