हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे-Top 15 Places Visit To In Hingoli District

मंडळी भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे हिंगोली जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एक प्रमुख जिल्हा आहे. 1 मे 1999 मध्ये परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. संत नामदेव महाराजांचा जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याला ओळखले जाते. Top 15 Places Visit To In Hingoli District

बारा ज्योतिर्लिंगापैकी औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यात आहे. 1803 मध्ये टिपू सुलतान व मराठा यांच्यामध्ये याच जिल्ह्यात युद्ध झाले होते. या जिल्ह्यामध्ये पाच तालुके आहेत. हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ 4526 चौरस किलोमीटर एवढे आहे.
हिंगोली जिल्हा महाराष्ट्रातील पूर्वेकडे दख्खन पठारावर वसलेला आहे. या जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांना ‘जिंतूर हिंगोली टेकड्या’ म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्यातून पैनगंगा,कयाधू, केनाड, पूर्णा या चार प्रमुख नद्या वाहतात.

सिद्धेश्वर आणि येलदरी हे धरण पूर्णा नदीवर बांधण्यात आले आहे. या जिल्ह्यात ज्वारी आणि कापूस हे प्रमुख पिके घेतली जातात. तसेच या जिल्ह्यांमध्ये अनेक लोककला प्रसिद्ध आहेत. या जिल्ह्यात अनेक धार्मिक व पर्यटन स्थळे आहेत. हिंगोली जिल्ह्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ हा ऑक्टोबर ते फेब्रुवारी मानला जातो. इ.स.1270 मध्ये संत नामदेव महाराज यांचा जन्म नर्सी नामदेव या ठिकाणी झाला.ते आज एक पवित्र तीर्थस्थान आहे.

Table of Contents

Top 15 Places Visit To In Hingoli District

हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे-


1)औंढा नागनाथ-

Top 15 Places Visit To In Hingoli District


Aundha Nagnathहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले स्वयंभू ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यांमध्ये आहे. हे शिव मंदिर सुमारे 60 हजार चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले असून ते पाच हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिराची वास्तुकला अत्यंत अद्वितीय आहे. द्वादश कोणी असलेले हे मंदिर हेमाडपंथी शैलीत असून शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे.

महाभारत काळात धर्मराजाने हे मंदिर बांधले अशी आख्यायिका सांगितली जाते. मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे असून मंदिराचा मुख्य भाग भूगर्भात आहे. मंदिरातील पिंड ही महादेव आणि श्रीविष्णू यांची समजली जाते. त्यामुळे नागनाथला हरिहर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते तेव्हा लाखोच्या संख्येने भाविक येथे भेट देतात. हिंगोली पासून हे ठिकाण 30 किलोमीटर अंतरावर आहे.

2)मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर-

Mallinath Digamber Jain Temple हे मंदिर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यामध्ये शिरड शहापूर गावात आहे. तीनशे वर्ष जुने असलेले हे मंदिर जैन लोकांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. मंदिरामध्ये भगवान मल्लिनाथ यांची 300 वर्ष जुनी मूर्ती आहे.देशभरातून जैन भाविक मोठ्या प्रमाणात या मंदिराला भेट देतात.हे तीर्थस्थळ हिंगोली पासून 35 किलोमीटर अंतरावर आहे.

3)संत नामदेव जन्मस्थळ नरसी-


Sant Namdev Narsi हे हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव महाराजांचे जन्म ठिकाण असलेले हे एक धार्मिक स्थळ आहे. 1270 मध्ये या ठिकाणी नामदेव महाराजांचा जन्म झाला.नामदेव दामाजी रेळेकर असे संत नामदेवांचे संपूर्ण नाव असून कयाधू नदीच्या काठावर संत नामदेवाचे मंदिर आहे. संत नामदेवांनी आपल्या जीवनात असलेले ईश्वराच्या व्यापकतेचे ज्ञान दिले. हिंगोली पासून हे ठिकाण 17 किलोमीटर अंतरावर आहे.

4) संत तुकामाई मंदिर-

Sant Tukamai म्हणजेच तुकाराम चैतन्य हे गुढवादी व अध्यात्मिक गुरु होते. यांचा जन्म 19 मार्च 1813 मध्ये हिंगोली जिल्ह्यामधील कळमनुरी तालुक्यातील सुकळी वीर या गावांमध्ये काशिनाथ पंत आणि पार्वतीबाई यांच्या पोटी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. ते श्री गुरु चिन्मयानंद स्वामी यांचे शिष्य होते. व 19 व्या शतकातील आध्यात्मिक गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे ते शिष्य होते. पुढे ते संत तुकाराम चे संत तुकामाई झाले. दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी ग्रामस्थांकडून अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो.

5) तुळजाभवानी मंदिर हिंगोली-

Tuljabhavani Temple हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यामध्ये असलेले तुळजाभवानी नगर मध्ये तुळजाभवानी मातेचे स्वयंभू मंदिर आहे. येथील पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मोठ्या भक्ती भावाने देवीची उपासना करतात. तुळजापूर येथील भवानी माता कळमनुरीच्या भक्तांच्या निस्सीम भक्ती पोटी येथे अवतरले असल्याचे सांगितले जाते. भक्तांची तारणहार आणि नवसाला पावणारी अशी या देवीची ओळख आहे. महाराष्ट्रातून अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी येतात.

Please visit our website: allindiajourney.com

6) श्री भवानी माता मंदिर-

Shree Bhavani Mata Temple हे पूर्वाभिमुख असून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यामध्ये नागपूर नांदेड महामार्गावर वारंगा फाटा पासून काही अंतरावर आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या मातेची ख्याती आहे. हे मंदिर प्रति तुळजापूर म्हणून ओळखले जाते. मंदिराचा परिसर गर्द झाडीने वेढलेला आहे. 2003 मध्ये भवानी मातेच्या मंदिराचा लोकसहभागातून जीर्णोद्धार केला. 2014 मध्ये महाराष्ट्र शासनाने या मंदिराला अ दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले. नवरात्र उत्सवात महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. तसेच भवानी मातेच्या मंदिरा शेजारी शिव शंभू चे तीस फूट उंच असलेले मूर्तीचे मंदिर आहे.

7) सिद्धेश्वर धरण-


Siddheshwar Dam हे हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा नदीवर असलेले एक महत्त्वपूर्ण धरण आहे. हे धरण पूर्णा नदीवर बांधले असून हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्याच्या सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाते. या धरणाची उंची 38.26 मीटर तर लांबी: 6,353.2 मीटर एवढी आहे. त्या धरणामुळे 57 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. धरण परिसरात खूप पुरातन झाडे आहेत. तसेच हा परिसर निसर्गरम्य असल्यामुळे या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी प्राणी पाहाव्यास भेटतात. धार फाटा ठिकाणावरून हे धरण आठ किलोमीटर अंतरावर आहे.

8)खटकाळी मारुती मंदिर-


Khatkali Maruti Temple हे हिंगोली जिल्ह्यातील दक्षिणाभिमुख असलेले मारुतीचे मंदिर आहे. भक्तांच्या इच्छापूर्तीसाठी ओळखले जाते. महाराष्ट्रातून बरेच पर्यटक या ठिकाणी मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात. हिंगोली शहरापासून हे मंदिर 2 किलोमीटर अंतरावर आहे.

9) हिंगोली दसरा महोत्सव-

Hingoli Dasara Mahotsavहा हिंगोली जिल्ह्यातील आणि देशातील दुसरा सर्वात मोठा सार्वजनिक दसरा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव हिंगोली जिल्ह्यांमध्ये 167 वर्षापूर्वी मानदास बाबा यांनी सुरू केला होता.रामलीला मैदानावर दरवर्षी हा उत्सव मोठ्या जल्लोषात पार पाडला जातो.

या महोत्सवामध्ये धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आणि कृषी प्रदर्शनाचा सहभाग असतो. दसऱ्याच्या शेवटच्या दिवशी 51 फूट रावणाची मूर्ती दहन केली जाते. हे येथील प्रमुख आकर्षण आहे. 9 ते 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये देशभरातुन अनेक पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.


10) चिराग शहा दर्गा हिंगोली-


Chirag Shaha Darga हे हिंगोली जिल्ह्यातील तळ्याच्या ठिकाणी असलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. येथील तलाव परिसरात अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आणि वनस्पती आढळून येतात. आत्तापर्यंत 45 प्रकारच्या पक्षांच्या प्रजातीचे निरीक्षण करण्यात आले आहे. अनेक मुस्लिम आणि हिंदू भाविक येथील दर्ग्याला भेट देण्यासाठी येत असतात.

11) भगवान शांतिनाथ जीनालय-


Bhagvan Shantinath Jinalay हे हिंगोली जिल्ह्यातील
शिरड शहापूर गावात असलेले एक प्रसिद्ध जैन मंदिर आहे. येथील जिनालयामध्ये तीन गर्भगृह,पाच प्रवेशद्वारे, सहा शिखरे आणि सात दरवाजे आहेत. दरवर्षी फाल्गुन महिन्यात या जिनालयामध्ये मोठा सोहळा साजरा केला जातो. प्रार्थना आणि पूजा करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक लोक येत असतात.


12) विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर-

Vighnaharta Chitanmani Ganpati हे हिंगोली जिल्ह्यातील गोडीपीर येथील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. या मंदिरातील मूर्ती ही स्वयंभू असून नवसाला पावणारा चिंतामणी अशी या गणपतीची ओळख आहे. या चिंतामणीला 108 पासून ते 1008 मोदकांचा प्रसाद भाविक अर्पण करतात. देशातील अनेक राज्यातून भाविक येथील गणपतीच्या दर्शनासाठी येतात. तसेच महिन्याच्या चतुर्थीला ही चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. हिंगोली पासून हे मंदिर दोन किलोमीटर अंतरावर आहे.

13) टोकाई गड-

Tokai Gad हा हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये कुरुंदा या ठिकाणी असून हा गड ऐतिहासिक व नैसर्गिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या ठिकाणी असलेल्या टोकाई देवीच्या नावावरून या गडाला टोकाई गड नाव मिळाले असावे असे सांगितले जाते. सध्या या ठिकाणी 72 एकर हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण केले जात आहे.व ‘ऑक्सिजन पार्क’ आणि वनराई विकसित करण्याचे काम चालू आहे. तसेच या ठिकाणी आपल्याला ऐतिहासिक महत्त्व असलेले शिवकालीन बारव पाहावयास भेटते. हजारो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात

14) जटाशंकर मंदिर डोंगरकडा-


Jatashankar Temple हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेले डोंगरकडा गावात आहे. या मंदिरात शिवलिंगाची पूजा केली जाते.येथील शिवलिंग स्वयंभू असल्यामुळे भाविकांचे ते पवित्र तीर्थस्थान आहे. महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविक लोक ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात. हिंगोली पासून हे ठिकाण 53 किलोमीटर अंतरावर आहे.

15) ईसापुर धरण –


Isapur Dam हे हिंगोली जिल्ह्यातील मातिचे धरण पैनगंगा नदीवर आहे. या धरणातून हिंगोली,नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याला सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची उंची 57 मीटर असून लांबी4,120.1 मीटर4,120.1 मीटर एवढी आहे. या धरण परिसरात वन्यजीव अभयारण्य विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे धरण सिंचनाशिवाय पर्यटनाच्या दृष्टीने ही महत्वाचे आहे. धरण परिसरात अनेक पर्यटन स्थळे आहेत.

Visit the travel blog

1)हिंगोली जिल्ह्यातील भगवान शांतीनाथ जिनालाय कोणत्या गावात आहे ?

हिंगोली जिल्ह्यातील भगवान शांतीनाथ जिनालाय शिरड शहापूर गावात आहे .

2)हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरण कोणत्या नदीवर आहे ?

हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरण पैनगंगा नदीवर आहे .

3) हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे?

हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण पूर्णा नदीवर आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top