सातारा जिल्ह्यातील महत्वाची लोकप्रिय प्रेक्षणीय ठिकाणे : Top 15 places to visit in Satara

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा हा सामाजिक ऐतिहासिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याला वीरांची भूमी म्हणूनही ओळखले जाते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सातारा जिल्ह्याचे सर्वात जास्त योगदान आहे. या जिल्ह्यातील अनेक युवक भारतीय सेनेमध्ये भरती होण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात.
सातारा जिल्ह्यात 11 तालुके आहेत. आणि कृष्णा आणि भीमा या दोन मुख्य नद्या आहेत. जागतिक स्तरावरील महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ सातारा जिल्ह्यातच आहे.

सातारा जिल्ह्यातील महत्वाची लोकप्रिय प्रेक्षणीय ठिकाणे : Top 15 places to visit in Satara

1) कास पठार-


कास पठार हे साताऱ्यातील सुंदर ठिकाण आहे. येथे ज्वालामुखी युक्त लालसर माती आहे. साताऱ्यातील महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये हे एक ठिकाण येते. पाचगणी आणि महाबळेश्वर पासून हे ठिकाण खूप जवळ आहे. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर हे ठिकाण पाहणे अजिबात चुकू नका.Top 15 places to visit in Satara

साधारण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये हे ठिकाण वेगवेगळ्या प्रजातीच्या फुलांनी बहरलेले असते. जगातील सर्व कानाकोपऱ्यातील लोक या ठिकाणाला भेट देत असतात. अशा या सुंदर कास पठाराला एकदा तरी अवश्य भेट द्या.Top 15 places to visit in Satara
ठिकाण: सातारा, महाराष्ट्र
वेळ: सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत.

Top 15 places to visit in Satara

सातारमधील भेट देण्याची प्रमुख ठिकाणे

Top 15 places to visit in Satara

2) प्रतापगड किल्ला-

महाबळेश्वर हिल स्टेशन पासून जवळ असलेला सातारा जिल्ह्यातील प्रतापगड हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जमिनीपासून साधारण 3500 मीटर उंचीवर हा किल्ला आहे. येथील तटबंदी सुस्थितीत असल्यामुळे खूप पर्यटक येथे येत असतात.

येथे असलेल्या चार तलावा पैकी काही तलाव पावसाळ्यात पाण्याखाली जातात. मोटारीने गेल्यानंतर रस्त्याच्या शेवटी मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक टेहळणी बुरुज आहे. येथे साधारण 60 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित करण्यात आला होता.

किल्ल्याच्या शिखर भागी भवानी मातेचे मंदिर असून किल्ल्याच्या इतिहासाचे वर्णन करणारे सांस्कृतिक ग्रंथालय आहे. तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावातून प्रतापगडकडे जाताना
हस्तकला केंद्र आहे. पर्यटक तिथे आवर्जून भेट देतात.
सातारा पासून अंतर:86.9 किमी
येथे कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही.




3) तापोला-


तापोळा हे उपग्रह गाव असून महाबळेश्वर मध्ये ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी तुम्ही निसर्गातील सुंदर दृश्य अनुभवू शकता. तापोळा येथे एक तलाव असून बाजूला घनदाट जंगल आहे. येथेच वासोटा आणि जयगड सारखे अज्ञात किल्ले आहेत. जंगल ट्रेक करणाऱ्या लोकांना वासोटा किल्ला हे एक उत्तम ठिकाण आहे.

विशेष म्हणजे वासोटा किल्ल्यावरील हाय किंग. या 90 किलोमीटर लांबीच्या जलाशयात विविध अज्ञात बेटे पसरलेली आहेत. तसेच येथे असलेल्या शिवसागर तलावात बोटिंग करता येते. येथे असलेल्या अभूतपूर्व गोष्टींमुळे सहलीचा अप्रतिम आनंद आपल्याला मिळतो.
साताऱ्यापासून अंतर:81.6 किमी
प्रवेश शुल्क: 750 ते 1750 रुपये. Top 15 places to visit in Satara

4) महाबळेश्वर मंदिर-

महाबळेश्वर हे शिवाचे प्राचीन मंदिर आहे. जे सर्वांच्या भक्तीचे श्रद्धास्थान आहे. महाबली म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर शिवाचे जागृत देवस्थान आहे. चित्त थरारक परिसरात वसलेल्या या सुंदर मंदिरात सोळाव्या शतकातील मराठा साम्राज्याच्या स्मृती आहेत. हे उल्लेखनीय मंदिर पाच फूट उंच भिंतीत बंद असून आतील आणि बाहेरील कक्षांनी बनलेले आहे.

गर्भगृहाच्या आत मध्ये शिवाचे वास्तव्य आहे. मंदिरा आवारात शिव पलंग, ढोल, डमरू,त्रिशूल,नंदी आणि कालभैरव यांच्या कोरीव काम केलेल्या मूर्ती आहेत. या मंदिरातील आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे येथील मंदिरातील शिवलिंग सहा फूट लांबीचे आहे. महाबळेश्वर मंदिर हे एक पवित्र स्थान असून बाराही महिने भाविक दर्शनासाठी येत असतात.

या ठिकाणी अजून दोन मंदिरे आहेत ती म्हणजे अतीबलेश्वर मंदिर आणि पंचगंगा मंदिर. महाबळेश्वर मंदिर हे दक्षिण भारतातील हेमदंत कलेचा उत्तम नमुना आहे. या मंदिरात कोणतेही प्रवेश शुल्क नाही.
सातारपासून अंतर:61.3

5) कमळगड किल्ला-


प्रवेश शुल्क: प्रवेश शुल्क नाही.
कमळगड हा एक चौकोनी आकार असलेला डोंगरी किल्ला आहे. साताऱ्यातील महत्त्वाच्या किल्ल्यांमध्ये हा एक किल्ला आहे. आपण जेव्हा किल्ल्यावर जातो तेव्हा खालील नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळते. या किल्ल्यापासून दूरवर असलेले धुम धरण आणि हिरवागार परिसर आपल्या मनाला आनंद देतो. Top 15 places to visit in Satara

मात्र हा किल्ला कोणी बांधला किंवा चालवला याबद्दलचे कोणतेही तपशील भेटत नाहीत. हा किल्ला विजापूरच्या अधिपत्याखाली आलेला होता. कमल गड किल्ला 1818 मध्ये ब्रिटिश सैन्यांनी ताब्यात घेतला होता. आणि त्याचे रूपांतर तुरुंगात केले होते. गुन्हेगारांना या ठिकाणी फाशी दिली जायची. वाई तालुक्यातील नांदगणे या ठिकाणी हा किल्ला आहे. या किल्ल्यावर प्रवेश शुल्क नाही. साताऱ्यापासून हा किल्ला 64.5 किमी अंतरावर आहे

please visit our website:All india journey .com

.

6) धोबी धबधबा-


धोबी धबधबा हा एका साईटने लोडविक एलफिस्टन पॉईंटला जोडलेला आहे. आणि नंतर लहान रस्त्याने जुन्या महाबळेश्वर रोडला जोडतो. निसर्गप्रेमींसाठी हे एक खूप छान ठिकाण आहे. येथे भरपूर खडक आणि हिरवळ आहे. या धबधब्यावरून कोसळणारे पाणी इंद्रधनुष्यासारखे भासते. Top 15 places to visit in Satara

कोयना नदीवरील धुके येथून पाहाव्यास मिळते.महाबळेश्वर पासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. पिकनिक साठी हे एक उत्तम ठिकाण असून पावसाळ्यात येथे खूप गर्दी असते. इथे कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. सातारा पासुन या धबधब्याचे अंतर 58.8 किमी आहे.

7)पाचगणी)-


महाबळेश्वर मधील पाचगणी हे एक सुंदर हिल स्टेशन आहे. समुद्रसपाटीपासून 1334 मीटर उंचीवर हे ठिकाण आहे. या ठिकाणी पाच टेकड्यांपासून सह्याद्रीच्या पर्वत रांगा बनलेल्या आहेत म्हणून या ठिकाणाला पाचगणी असे नाव पडले आहे. याशिवाय येथे असलेल्या टेकड्या आणि किनारी मैदानी यांच्यामध्ये चित्तथरारक दृश्य पाहायला मिळतात. ब्रिटिश काळात उन्हाळ्यामध्ये हे ठिकाण अल्हाददायक मानले जात होते. आणि आजही तसेच मानले जाते.

. पाचगणी ला महाबळेश्वर चे जुळे स्थान म्हणून पण ओळखले जाते. आजूबाजूला असलेल्या हिरव्या गार दऱ्या आणि रसाळ स्ट्रॉबेरी चे असंख्य मळे यामुळे हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. खरे तर पाचगणी ला “भारताचे स्ट्रॉबेरी गार्डन” म्हणून पण ओळखले जाते. फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान येथील स्ट्रॉबेरी चे उत्पादन मुबलक प्रमाणात मिळते. येथील स्ट्रॉबेरी खाऊन मन तृप्त होते. सातारा पासुन हे ठिकाण 48.8 किलोमीटर अंतरावर आहे. Top 15 places to visit in Satara

8) चंदन वंदन किल्ला-


सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये असलेला हा किल्ला डोंगराच्या माथ्यावर आहे. बारा शतका शेवटी ख्रिस्त पूर्व शिलाहार राजवंशातील भोज राजा दुसरा यांनी हा किल्ला बांधला. हा किल्ला धार्मिक लोक आणि गिर्यारोहकांना आकर्षित करतो. चंदन वंदन हे दोन शेजारी शेजारी किल्ले आहेत.

हे दोन्ही किल्ले भव्य असून याचा उल्लेख राज वंशापासून दुसऱ्या राज वंशात आणि मराठ्यांपासून मोगलापर्यंत केलेला आहे. किल्ल्याभोवती सोडून दिलेले दरवाजे आणि बुरुज आहेत. या बुरुजांमध्ये शिवमंदिर, मशीद आणि अनेक खोल्या आहेत. या किल्ल्याला तुम्ही अवश्य भेट देऊ शकता. येथे प्रवेश शुल्क आकारले जात नाही. सातारा पासुन हा किल्ला 26 किमी अंतरावर आहे

.


9)चार भिंती-


सातारा जिल्ह्यातील प्रेक्षणीय ठिकाण म्हणजे चार भिंती. राजा छत्रपती प्रताप सिंह यांनी 1850 मध्ये हे ठिकाण बांधले होते. शत्रु वर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणाची निर्मिती करण्यात आली होती. संपूर्ण सातारा शहर पाहण्याची क्षमता असलेले हे ठिकाण आहे.

काही इतिहासकार असे सांगतात की 1850 च्या दशकात आपल्या देशावर राज्य करणारे राजे आणि राणी चार भिंती या ठिकाणाचा वापर करत असत. 2001 मध्ये या ठिकाणाचे पुनर्वसन करण्यात आले. चार भिंती पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. सातार पासून हे ठिकाण फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे. येथे कोणतेही प्रवेश शुल्क नाही. Top 15 places to visit in Satara

.


10)आर्थर सीट-

या पॉईंट मध्ये तुम्ही जर हलकी वस्तू फेकली तर हवेच्या दाबामुळे ती परत वरती तरंगते. मालेट की पत्नी आणि मुलगी सावित्री नदीमध्ये बुडाली होती. त्यावेळी आर्थर येथे बसून धबधब्याकडे पहात असे. व्हूपॉईंट वर पोहोचण्यासाठी पार्किंग मधून 30 मिनिटे लागतात. येथे प्रवेश शुल्क नाही. साताऱ्यापासून हे अंतर 68.1 किमी आहे.

Top 15 places to visit in Satara

11) विल्सन पॉईंट-


विल्सन पॉईंट हे महाबळेश्वर मधील ठिकाण सर लेस्लि विल्सन यांच्या नावाने ओळखले जाते. या विस्तीर्ण पठारावरील निसर्ग अत्यंत मंत्रमुग्ध करणारा आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक येथील सूर्योदय पाहण्यासाठी येत असतात. येथील परिसरात पसरलेल्या सूर्याचे रंग अतिशय सुंदर दिसतात. येथील सूर्यास्ताचे दृश्य ही विहंगम असते

.

12)ठोसेघर धबधबा-


साताऱ्यातील नयन रम्य ठिकाण म्हणजे ठोसेघर धबधबा.हा धबधबा सातारा जिल्ह्यातील तारळी नदीवर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंचीवर हा धबधबा आहे. आणि भारतातील उंच धबधब्यांच्या यादीत याचा दुसरा क्रमांक आहे.

सातारा पासून 26 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. हा धबधबा ठोसेघर गावामध्ये असून गावाच्या नावावरून या धबधब्याला ठोसेघर नाव देण्यात आले आहे. येथील निसर्गाचे दृश्य अद्भुत आहे

.

13)कोयना धरण-


कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. 1956 मध्ये महाराष्ट्र शासनाने हे धरण बांधले. कोयना धरण जलाशयाला शिवसागर नावाने ओळखले जाते. या धरणाची क्षमता 1,960 मेगावॅट इतकी आहे. या धरणाचा स्लिप वे मध्यभागी असून दुसऱ्या टोकाला तापोळा हे गाव आहे.

येथील जलविद्युत प्रकल्प भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पूर्ण झालेला जलविद्युत प्रकल्प आहे.सातारा जिल्ह्यातील कोयना नगर मध्ये हे धरण आहे.या धरणामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतीला पाणी मिळते. तसेच या धरणावर मोठ्या जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती केली आहे.कोयना धरणाचा जलाशय शिवसागर या नावाने ओळखला जातो.

14) सज्जनगड-


सातारा जिल्ह्यातील सज्जनगड हे एक महत्त्वाचे स्थान आहे. समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ठिकाणाला अवश्य भेट दिली पाहिजे. साताऱ्यापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर सज्जनगड हे ठिकाण आहे. परळी गावातून पायी मार्गाने सज्जनगड वर जाता येते.

तसेच सातार मधून बसेसची सोय पण आहे. सज्जनगड च्या उत्तरेला महाबळेश्वर, रायगड, प्रतापगड किल्ले आहेत. तर दक्षिणेला कळंब पश्चिमेला खेड व चिपळूण शहर आणि ईशान्येला सातारा शहर व अजिंक्यतारा किल्ला आहे.

15)मुंबई पॉइंट / सनसेट पॉइंट –


मुंबई पॉईंट म्हणजेच सनसेट पॉईंट. महाबळेश्वर पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. येथील सूर्यास्ताचे अभूतपूर्व दृश्य बघण्यासाठी लोक खूप गर्दी करतात. परंतु तुम्हाला येथे 5:30 च्या अगोदर पोहोचले पाहिजे. तरच तुम्ही सनसेटचा आनंद घेऊ शकता.

FAQ

Q-1)सातारमधील चार भिंती कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत ?

Ans-सातारमधील चार भिंती या हुतात्मा स्मारक नावाने प्रसिद्ध आहेत.

Q -2)सातारमधील कोयना धारण कोणत्या साली बांधले गेले ?

Ans-१९५६ मध्ये महाराष्ट्र शासनाने कोयना धारण बांधले.

Q-3)चंदन वंदन किल्ला कोणी बांधला ?

Ans-शिलाहार राजवंशातील राजा भोज दुसरा यांनी हा किल्ला बांधला.

Q-4)मुंबई पॉईंट सातारा जिल्यातील कोणत्या शहरात आहे ?

Ans-मुंबई पॉईंट महाबळेश्वर शहरात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top