चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे:Top 14 places visit to in Chandrapur District

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा हा विदर्भ विभागात आहे. गौंड राजाच्या काळात या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव चांदा होते. 1964 मध्ये या जिल्ह्याचे नाव चंद्रपूर करण्यात आले. 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. त्यामुळे या जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी असे म्हटले जाते. चंद्रपूरच्या दुर्गापुर मध्ये औष्णिक वीज प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे.Top 14 places visit to in Chandrapur District


चंद्रपूर मध्ये वैनगंगा, वर्धा,पैनगंगा आणि इरई या प्रमुख नद्या आहेत. तसेच या जिल्ह्यामध्ये तांदूळ,ज्वारी, गहू,कापूस, तूर,जवस, तंबाखू ही पिके घेतली जातात. महाराष्ट्रातील हा जिल्हा सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सिमेंटचे कारखाने आहेत. महाराष्ट्र राज्यातील पहिला पोलाद कारखाना या जिल्ह्यात निर्माण केला.

तसेच या जिल्ह्यात बल्लारपूर येथे देशातील सर्वात मोठा कागद कारखाना आहे. महाराष्ट्रातील मॅगनीज प्रकल्प याच जिल्ह्यात आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहेत.1948 साली बाबा आमटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावामध्ये आनंदवन आश्रम कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी सुरू केला. या जिल्ह्यामध्ये अनेक आदिवासी जमाती आहेत. या जिल्ह्यामध्ये तांब्याचे साठे भरपूर प्रमाणात मिळतात.

Top 14 places visit to in Chandrapur District

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे:


1) भद्रावती जैन मंदिर-

Top 14 places visit to in Chandrapur District

Bhadravati Jain Temple हे भद्रावती गावातील जैन मंदिर आहे. हे मंदिर खूप जुने असून या मंदिरामध्ये अत्यंत सुंदर अशी रेखीव शिल्पे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भावीक भेट देतात. चंद्रपूर पासून हे ठिकाण 32 किलोमीटर अंतरावर आहे.


2)घोडाझरी प्रकल्प-

Ghodazari Prakalp हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी सात तलावांचा मिळून एक तलाव बनवलेला आहे. नागपेठ तालुक्यात हा घोडाझरी प्रकल्प असून येथील परिसर अत्यंत रमणीय व निसर्गरम्य आहे. चंद्रपूर पासून हा घोडाझरी प्रकल्प 105 किलोमीटर अंतरावर आहे.

3-माणिकगड किल्ला-

Manikgadh Fort हा चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यामध्ये चांदूरच्या डोंगरावर आहे. 9 व्या शतकामध्ये नागराजांनी हा किल्ला बांधलेला असून समुद्रसपाटीपासून साधारणता 507 मीटर उंचीवर हा किल्ला आहे. किल्ल्याला तटबंदी आणि बुरुज आहेत. सध्या थोड्याफार प्रमाणात हा किल्ला भगनावस्थेत आहे. परंतु येथे पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला दीड किलोमीटर पर्यंत चालत जावे लागते.चंद्रपूर पासून हा किल्ला 60 किलोमीटर अंतरावर आहे.

Plese visit our website:Allindiajourney.com

4) सात बहिणींचा डोंगर-

Seven Sisters Hill या ठिकाणाला पेरजागड म्हणून ओळखले जाते. निसर्गाने बहरलेल्या ओढाझरी या अभयारण्यात हा ठिकाणी हा डोंगर आहे. या ठिकाणी ट्रेकिंग प्रेमी मोठ्या प्रमाणात येतात. डोंगरावर सात बहिणी (अंबाई, निंबाई, उमाई,गौराई, मुक्ताई, पवराई आणि भिवराई)रहात होत्या असे सांगितले जाते. त्यांच्या मूर्ती आजही येथे पाहायला भेटतात. या डोंगरावर धबधबा आणि मुक्ताई देवस्थान आहे. या ठिकाणी अनेक वन्यजीव प्राणी आढळतात.

5) बटरफ्लाय गार्डन-


चंद्रपूर जिल्ह्यातील Butterfly Garden हे ताडोबा बटरफ्लाय गार्डन किंवा आगरझरी बटरफ्लाय गार्डन म्हणून ही ओळखले जाते.10 फेब्रुवारी2018 मध्ये या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. विदर्भातील हे पहिलेच गार्डन असून त्यामध्ये असंख्य प्रकारची रंगीबेरंगी फुलपाखरे आपल्याला पाहायला भेटतात. हे उद्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बर्फर झोन मध्ये असून चंद्रपूर -मोहर्ली रोडवर आहे. चंद्रपूर पासून हे उद्यान 13 किलोमीटर अंतरावर आहे.

6) बिजासन लेणी-


Bijasan Cave ह्या बौद्ध बांधवांच्या श्रद्धा स्थान असून
या लेण्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात आहेत. या लेण्या दहा एकर मध्ये असून त्या ऐतिहासिक व सांस्कृतिक आहेत.या लेण्यांबद्दल असे सांगितले जाते की या लेण्या 2000 वर्षापूर्वीच्या असून अजिंठा वेरूळ लेण्यापेक्षा जुन्या आहेत. गडद आणि रहस्यमय लेण्यांमध्ये विस्तीर्ण मार्ग आहेत. या लेण्यांची गुढता एक अविस्मरणीय अनुभव देतात. चंद्रपूर पासून या लेण्या 28 किलोमीटर अंतरावर आहेत.

7) मुक्ताई धबधबा-

Muktai Waterfall हा महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामध्ये डोमा गावच्या जंगलामध्ये आहे. महाराष्ट्रातील अनेक लोकप्रिय धबधब्यांपैकी हा एक धबधबा आहे. या ठिकाणी मुक्ताई मातेचे मंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणाला मुक्ताई मातेच्या नावावरून ओळखले जाते. डोंगरातून जवळजवळ 57 फोटो उंचीवरून हा धबधबा कोसळतो. हिरव्यागार वनराईने नटलेला हा धबधबा पाहण्यासाठी असंख्य पर्यटक येथे भेट देतात. चंद्रपूर पासून हे ठिकाण 120 किलोमीटर अंतरावर आहे.


8) ए पी जे अब्दुल कलाम गार्डन-

A P J Abdul Kalam Garden चंद्रपूर जिल्ह्यातील एक नवनिर्मित गार्डन असून या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देतात. या गार्डनमध्ये मुलांसाठी प्लेग्राउंड तलाव,बांबू गार्डन, सर्व प्रकारच्या वन्य प्राण्याच्या मुर्त्या पहावयास भेटतात. तसेच या गार्डनमध्ये राजहंस आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. उद्यानामध्ये एपीजे अब्दुल कलाम यांचा पुतळा बसवलेला आहे. 15 जानेवारी म्हणजे अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसा दिवशी या गार्डनमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. चंद्रपूर पासून हे ठिकाण आठ किलोमीटर अंतरावर आहे.

9) महाकाली मंदिर-

Mahakali Temple हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण धार्मिक स्थळ आहे. महाकालीचे हे मंदिर काली मातेला समर्पित असून ते चंद्रपूर शहराच्या मध्यावर आहे. एप्रिल महिन्यामध्ये दरवर्षी या ठिकाणी देवीची खूप मोठी यात्रा भरते. मंदिरामध्ये महाकाली देवीच्या दोन मूर्ती आहेत. येथील भिंतीवर विविध शिल्प चित्रे पाहायला भेटतात. मंगळवारी देवीच्या मंदिरात भाविकांची जास्तच गर्दी असते.

10) ताडोबा राष्ट्रीय उद्यान-

Tadoba national Sanctuaryहे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रमुख व्याघ्र पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाघांची संख्या आहे. या ठिकाणी अंधारी आणि ताडोबा हे दोन अभयारण्य व्याघ्र संरक्षित म्हणून केली आहेत. तुम्हाला येथे जाण्यासाठी 70 दिवस आधी बुकिंग करावे लागते. या उद्यानाचा परिसर हा 1734 किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे. या उद्यानामध्ये वाघांबरोबर अनेक प्रकारचे वन्यजीव प्राणी आढळतात. चंद्रपूर पासून हे अभयारण्य 34 किलोमीटर अंतरावर आहे.

11) असोलामेंढा धरण-


Asolamendha Dam हे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यामध्ये पाथरी गावाजवळ आहे. आसोला मेंढा हे धरण ब्रिटिश काळामध्ये बांधलेले असून या धरण परिसरातील निसर्गरम्य वातावरण आणि घनदाट जंगलांनी वेढलेला भाग मंत्रमुग्ध करतो. या धरणाचे बांधकाम 1902 मध्ये सुरू झाले होते आणि 1918 मध्ये ब्रिटिश राजवटीत ते पूर्ण झाले.

या धरणाची लांबी 1376 मीटर इतकी आहे. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 67 एम सी एम एवढी आहे. पर्यटक या धरणावर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.चंद्रपूर शहरापासून हे धरण साधारणता 51 किलोमीटर अंतरावर आहे.

12) अंचलेश्वर मंदिर-


चंद्रपूर शहरातील गोंड किल्ल्याजवळ Anchaleshwar Mahadev Temple हे धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर शिवाला समर्पित असून मंदिरासमोर 5 वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेली चार टन वजनाची नंदीची मूर्ती आहे. हे मंदिर 9 व्या शतकातील आहे. येथील मंदिर परिसर अत्यंत शांत व रम्य आहे. या मंदिरामध्ये भगवान शिवाच्या पायाच्या अंगठ्याच पूजा केली जाते. हे मंदिर अचलगड किल्ल्याच्या आत मध्ये आहे.


13) बल्लारपूर किल्ला-


महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये Ballarpur Fort हा किल्ला गोंड नदीच्या काठावर असलेला एक प्राचीन व ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला राजा गोंड शहा ने बांधला. या किल्ल्याला बल्लाळशाह किल्ला म्हणून देखील ओळखले जाते या किल्ल्याची तटबंदी मजबूत असली तरी किल्ल्याचा काही भाग जीर्ण झाला आहे. हा किल्ला चंद्रपूर पासून 16 किलोमीटर अंतरावर बल्लारपूर शहरात आहे.

14) चंद्रपूर किल्ला-


महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील Chandrapur Fort हा सोळावा शतकाच्या दरम्यान गोंड राजाने बांधलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. त्याकाळी संरक्षणाच्या हेतूने हा किल्ला बांधला होता. या किल्ल्याला अचलेश्वर,बिनबा,जटपुरा व पठाणपुरा हे मुख्य दरवाजे आहेत. चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेला हा किल्ला इराई आणि झरपट नद्यांच्या संगमावर आहे. या किल्ल्याला पंधरा ते वीस फूट उंचीच्या मजबूत भिंती आहेत.

1)बल्लारपूर किल्ला कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

बल्लारपूर किल्ला गोंड नदीच्या काठावर आहे .

2)मुक्ताई धबधबा कोणत्या तालुक्यात आहे ?

मुक्ताई धबधबा चिमूर तालुक्यात आहे .

3)चंद्रपूर जिल्ह्यातील फुलपाखरू उद्यानयाची निर्मिती कधी करण्यात आली ?

चंद्रपूर जिल्ह्यातील फुलपाखरू उद्यानयाची निर्मिती १० फेब्रुवारी २०१८ मध्ये करण्यात आली .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top