सांगली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन ठिकाणे –
Top 14 places to visit in sangli
सांगलीतील भेट देण्याची प्रमुख ठिकाणे-
1) बाहुबली मंदिर –
सांगली जिल्ह्यातील उंच डोंगराच्या ठिकाणी वसलेले बाहुबली हिल हे जैन धार्मिक स्थळ आहे. या मंदिरातील बाहुबलीची मूर्ती 28 फूट उंच असून या ठिकाणी पोहोचण्यासाठी साधारणता 400 पायऱ्या चढाव्या लागतात. येथील निसर्गरम्य वातावरणात शांतता आणि पावित्र्याचा अनुभव येतो. या ठिकाणी निसर्ग, अध्यात्म आणि इतिहास याचा त्रिवेणी संगम आहे. येथे बारा महिने भाविकांची वर्दळ असते. पर्यटकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.Top 14 places to visit in sangli

2)सांगलीचा किल्ला –
सांगलीचा किल्ला हे एक सांगलीचे आकर्षक पर्यटन स्थळ आहे. श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी 19 व्या शतकात हा किल्ला बांधला. किल्ल्याचे असलेले गोलसर बांधकाम पर्यटकांना मनमोहीत करते. या किल्ल्याला पाहून त्या काळातील स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आपणास पाहावयास मिळतो. एकदा तरी या किल्ल्याची सफर केलीच पाहिजे.

3)सिद्धेवाडी धबधबा-
सिद्धेवाडी धबधबा हा सांगली जिल्ह्यातील नैसर्गिक समृद्धीने बहरलेला असा धबधबा आहे. हा धबधबा 50 फूट उंचीवरून कोसळतो तेव्हा बघणाऱ्याच्या डोळ्याचे पारणे फिटते. ट्रेकिंग आणि हॅकिंग साठी हा धबधबा लोकप्रिय आहे. हिरवाईने वेढलेला हा धबधबा पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. पावसाळ्यात येथे भेट देण्याचा आनंद काही औरच असतो.

4)दंडोबा हिल्स आणि फॉरेस्ट प्रिझर्व-
निसर्ग प्रेमींसाठी साठी फॉरेस्ट प्रीझर्व आणि दंडोबा हिल्स हे ठिकाणी नक्कीच पाहण्यासारखे आहेत. हे जंगल 28 किलोमीटर पर्यंत पसरलेले असून येथील शांतता आणि हिरवळ मनमोहीत करते. येथील विविध प्रकारचे पक्षी, प्राणी पर्यटकांना पाहायला मिळतात. ट्रेकिंगची आवड असणारे आणि निसर्गप्रेमी यांनी या ठिकाणाला अवश्य भेट द्या. येथील मनमोहक वातावरण आणि निसर्गाने बहरलेले डोंगर पाहून तुमच्या मनाला आनंद मिळेल.

5)श्री शुक्राचार्य पळशी-
श्री शुक्राचार्य यांचे खानापूर तालुक्यातील खानापूर- जत रस्त्याच्या उत्तर बाजूस दोन किलोमीटर आत मध्ये हे जागृत देवस्थान आहे. या देवस्थानाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की शुक्राचार्य यांचे तप हरण करण्यासाठी इंद्राने रंभा नावाची अप्सरा पाठवली होती. परंतु शुक्राचार्य हे ब्रह्मचारी असल्याने त्यांनी स्त्रीचे दर्शन नको म्हणून ते या डोंगरावर अदृश्य झाले. तेच हे देवस्थान आहे. याची साक्ष म्हणजे ते ज्या ठिकाणी अदृश्य झाले तेथे त्यांच्या शरीराची मागील बाजू व जटा डोंगरात स्पष्ट दिसतात. विट्यातील हे एक जागृत देवस्थान आहे. येथील गर्द झाडे आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे आहे.

6)रामलिंग बेट –
सांगली जिल्ह्यातील बोरगाव जवळ असलेल्या बहे( ब्रह्मनाळ) येथील कृष्णा नदीच्या पात्रात रामलिंग बेट तयार झाले असून इस्लामपूर होऊन हे ठिकाण दहा किलोमीटर अंतरावर आहे. संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या निसर्गरम्य परिसरात बोट क्लब उपलब्ध आहे. रामलिंग येथील कृष्णा नदीच्या पूलाच्या उजव्या बाजूला राम लिंगाचे पुरातन मंदिर आहे. तर डाव्या बाजूला कृष्णा नदीचा विस्तीर्ण पात्र आणि शांत डोह आहे. कृष्णा नदी काठावरची हिरवीगार शेती, पुरातन मंदिरे आणि नोका विहार मनमोहन टाकतो. सांगली जिल्ह्यात नौका विहाराची उपलब्धता झाली आहे. हा रम्य परिसर पाहून मनाला चैतन्य मिळते.

7)गोकाक धबधबा-
सांगलीपासून अगदी थोड्याच अंतरावर गोकाक हा धबधबा आहे. हा धबधबा म्हणजे निसर्गाचा अद्भुत अविष्कार आहे. 177 मीटर उंचीवरून या धबधब्याचे पाणी पडते. ते पाहून मन प्रफुल्लित झाल्याशिवाय राहत नाही.
Please Visit Our website:AllIndiajourney.com
या धबधब्याचे पाणी पडताना पाहून नायगरा धबधब्याचा फील येतो. पावसाळ्यात तर या धबधब्याच्या पाण्याचा आवाज दूरपर्यंत येतो. या धबधब्याजवळ चालुक्य काळातील स्मारके आहेत. त्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व आहे.

8)चांदोली नॅशनल पार्क-
चांदोली नॅशनल पार्क हे निसर्ग सौंदर्याने भरलेले परिपूर्ण अभयारण्य आहे. या नॅशनल पार्क मध्ये दक्षिण भागातील सह्याद्री टायगर रिझर्व उत्तरेतील कोयना वन्यजीव अभयारण्य समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच या अभयारण्यात मलबार आणि उत्तर पश्चिम येथील जंगलांचा समावेश आहे.
या विस्तृत जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती आणि असंख्य प्रकारच्या प्राण्यांचा समावेश आहे. या अभयारण्यात 23 प्रकारच्या सस्तन प्राण्यांचे, 122 प्रकारचे पक्ष्यांचे आणि वीस प्रकारच्या सरपटणारे व उभयचर प्राण्यांचे घर आहे.

9)रेवणसिध्द-
विटा-खानापूर रस्त्यालगत रेनावी गावाच्या आसपास श्री रेवणसिद्ध देवाचे स्वयंभू स्थान आहे. मंदिराच्या पूर्व बाजूला उसळसिद्ध व पश्चिमेस विहारात विश्वाराध्य आहे. देवापुढे नंदी आहे व नंदीच्या मागे पंचकलशाप्रमाणे प्राचार्य आहे. येथील लोकांची अशी अख्यायिका आहे की हा रेनावी डोंगर पूर्वी पंचधातूचा होता.
येथील डोंगरावर पांढरे खडे मिळतात. त्याचा उपयोग भस्मासाठी करतात. तसेच तालमीसाठी लागणाऱ्या तांबड्या मातीच्या खाणीही या डोंगरावर आहेत. इथे वेगवेगळ्या रंगाची माती सापडते. त्यामुळे येथे संशोधन होणे गरजेचे आहे असे सर्वानुमत आहे. या डोंगरावर 84 तीर्थ होती असा उल्लेख मिळतो.

10)वारणा धरण-
हे धरण चांदोली जवळील वारणा नदीवर ‘वारणा प्रकल्प’ या नावाने बांधले गेले आहे. या धरणाची टी एम सी क्षमता34.20 असून या धरणाला वसंत सागर जलाशय म्हणून पण ओळखले जाते. या धरणाचा बांध मातीचा असून धरणाची लांबी 1580 मीटर आहे. या धरणाचा सांगली,कोल्हापूर आणि चांदोली येथील अनेक जिल्ह्यातील जमिनीच्या सिंचनासाठी उपयोग होतो.
हे धरण नव्यानेच बांधले गेले आहे. पर्यटकांसाठी हे एक आकर्षक ठिकाण आहे. धरण क्षेत्रामध्ये चांदोली अभयारण्य असून ते सांगली -कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर आहे.

11)श्री गणपती मंदिर
सांगलीतील गणपती मंदिर हे एक महत्त्वाचे स्थान असून सांगली संस्थांचे पहिले अधिपती अप्पासाहेब पटवर्धन यांनी 1843 मध्ये हे मंदिर बांधले. हे मंदिर अत्यंत आकर्षक असून कृष्णा नदीच्या काठी बांधली आहे. पुरापासून मंदिराचे संरक्षण व्हावे म्हणून या मंदिराची कल्पकतेने मांडणी केली आहे.
श्री गणपती मंदिर हे सांगलीकरांचे आराध्य दैवत आहे. येथे हिंदूच नाही तर सर्व धर्माचे लोक श्रद्धेने दर्शन घेतात. अलीकडेच मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला आहे. सांगली रेल्वे स्टेशन पासून अडीच किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.

12)सागरेश्वर अभयारण्य
सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण सागरेश्वर डोंगरावर आहे. अलीकडेच या डोंगरावर असंख्य प्रकारची झाडे लावण्यात आले आहेत.
या अभयारण्यात विविध प्रकारच्या हरणांच्या जाती पाहावयास मिळतात तसेच अन्य वन्यजीव मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या अभयारण्यात असंख्य प्रकारच्या जातीचे वृक्ष आढळतात निसर्गाने समृद्ध असे हे ठिकाण खूपच आकर्षक आहे.

13)हरिपूर
सांगली शहरातील हरिपूर या ठिकाणाला धार्मिक महत्त्व आहे. हरिपूर हे छोटेसे गाव असून सांगली पासून ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम झालेला असून येथे संगमेश्वर महादेवाचे पवित्र स्थान आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात.
येथील नद्यांचे संगमाचे विहंगम दृश्य पाहण्याजोगे आहे. तसेच नाट्यचार्य गोविंद बल्लाळ देवल त्यांनी याच ठिकाणी असलेल्या पारावर बसून ‘संगीत शारदा’ हे नाटक लिहिले तो पार आजही आपणास पहावयास मिळतो.

14)ख्वाजा शमशोद्दिन मिरासाहेब दर्गा-

हा दर्गा मिरज स्टेशन जवळ असून हिंदू मुस्लिम एकतेचे उपासना केंद्र आहे. हजरत मीरा साहेब आणि त्यांचा मुलगा शमासुदिन हुसेन त्यांचा आशीर्वाद मिळवण्या साठी हजारोच्या संख्येने गुरुवारी सकाळी लोक येत असतात. मिरासाहेब हे त्या काळातील एक सुफी संत होते.
त्यांच्याबद्दल असे सांगितले जाते की ते मक्काहूनभारतात आले व इस्लाम धर्माचा प्रचार केला. दरवर्षी येथे होणाऱ्या सणांमध्ये लाखो लोक भेट देतात.
