बीड जिल्हा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा मराठवाडा विभागात असून महाराष्ट्राच्या मध्यभागावर आहे. हा जिल्हा अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे.तसेच या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड असून या जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ही ओळखले जाते. या जिल्ह्याचा बालाघाट पासून सुरू झालेला काही भाग दुर्गम आणि मागासलेला आहे.Top 12 places visit to in Beed district
या जिल्ह्यामध्ये मराठी, हिंदी, उर्दू, तेलगू या भाषा बोलणारे लोक आढळतात. बीड मधील माजलगाव हा येथील एक सधन तालुका आहे. या जिल्ह्यातून सिंदफणा नदी वाहते नदीवर एक धरण बांधलेले आहे.
बीड जिल्ह्यामध्ये अनेक प्राचीन व ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. पूर्वी या जिल्ह्याला चंपावती नगर नावाने ओळखले जायचे. या जिल्ह्यात अकरा तालुके असून बारा ज्योतिर्लिंगा मध्ये असलेले परळी वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यात आहे.
जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय शेती हा असून येथील शेती पावसावर अवलंबून आहे. तसेच येथे खूप साखर कारखाने देखील आहेत. येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथील प्रमुख पीक ज्वारी असून गहू बाजरी मका उडीद मटकी चवळी कापूस भुईमूग ही पिके या जिल्ह्यात घेतली जातात. हा जिल्हा तेलबिया व भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. या जिल्ह्यातील प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिराचा इतिहास दीडशेच्या दशकातील ग्रंथांमध्ये आढळून येतो.Top 12 places visit to in Beed district
Top 12 places visit to in Beed district
बीड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे-
1)परळी वैजनाथ ज्योतीलिंग-

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले Parali vaijnath jyotirling हे बीड जिल्ह्यात आहे.1700 च्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. बारमाही येथे भाविकांची गर्दी असते. बीड शहरापासून हे मंदिर 93 किलोमीटर अंतरावर आहे.
बालाघाट पर्वताच्या पायथ्याशी हे मंदिर वसलेले आहे. शिवशंभु चे हे जागृत देवस्थान असून हे मंदिर चिरेबंदी स्वरूपात आहे.
2) नायगाव मयूर अभयारण्य-

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात हे Naygaon mayur Sanctuary आहे. हे अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध असून येथील मोरांची संख्या दहा ते बारा हजारांपेक्षा जास्त आहे. तसेच या अभयारण्यात वाघ, मुंगूस,हरिण, काळवीट, लांडगे, रानससे,कोल्हे असे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत.
महाराष्ट्र शासनाने 1994 मध्ये या अभयारण्याला मान्यता दिली. बीड शहरापासून हे अभयारण्य 25 किलोमीटर अंतरावर आहे. हे अभयारण्य हिरवीगार वनराई आणि डोंगराने वेढलेले आहे. तसेच येथे 100 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आहेत.
3) कपिलधारा-

बीड जिल्ह्यातील Kapildhara या ठिकाणाला महाबळेश्वर म्हणून ही ओळखले जाते. या ठिकाणी श्री संत मन्मथ स्वामी यांची संजीवन समाधी आहे. श्री क्षेत्र कपिलधारा
हे ठिकाण निसर्गरम्य वातावरणात असून येथे एक धबधबा आहे. या ठिकाणाला ऐतिहासिक वारसा असल्यामुळे महाराष्ट्रातूनच नव्हे तर पूर्ण भारततुन लाखो पर्यटक येथे भेट देतात. तुलसी विवाहाच्या वेळी येथे मोठी यात्रा भरते. हे ठिकाण वीरशैव समाजासाठी महत्त्वाचे मानले जाते. बीड पासून दक्षिणेकडे 19 कि. मी. अंतरावर आहे.
4)भुईकोट किल्ला धारूर –

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील जमिनीवर बांधलेला हा Bhuikot Fort आहे. तुम्ही या किल्ल्याचे नाव महादुर्ग असे होते. या किल्ल्याच्या तिन्ही बाजूंच्या भाग खोल दऱ्यांनी वेढलेला आहे. बीड शहरापासून साधारणता 58 कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांमध्ये या किल्ल्याचा समावेश केला जातो. इतिहास प्रेमी आणि पर्यटक या किल्ल्याला आवर्जून भेट देत असतात.
5) कंकालेश्वर मंदिर-

Kankaleshwar Temple बीड जिल्ह्यामध्ये असून हे मंदिर शिवाला समर्पित आहे. 84 मीटर चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर बिंदुसरा नदीच्या तीरावर आहे. हे मंदिर एक हजार वर्षे जुने असून मंदिराची रचना हेमाडपंती शैलीमध्ये केलेली आहे.
कंकालेश्वर मंदिर धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ असल्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. या मंदिरातील कोरलेल्या शिल्पांमध्ये नक्षीकाम, कोरीव काम अत्यंत सुबकतेने केलेले आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिराच्या छतावर कमळ आणि फुलांची नक्षी कोरलेली आहे.
6)योगेश्वरी माता मंदिर-
Please visit our website: Allindiajourney.com

Yogeshwery Mata temle हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या ठिकाणी आहे. हे जागृत देवस्थान असून शक्ती पीठ आहे. ही देवी कोकणस्थ ब्राह्मण लोकांची कुलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक लोकांची ही कुलदेवता आहे. येथे भाविक देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. परळी वैजनाथ पासून हे मंदिर 25 किलोमीटर अंतरावर आहे
7)मुकुंदराज महाराज मठ-

Shree Mukundraj Maharaj यांची समाधी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर जयंती नदीच्या काठावर असलेल्या काड्यांमध्ये आहे. मुकुंदराज महाराज हे मराठी भाषेचे आद्य कवी होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माच्या अगोदर 75 वर्ष त्यांना समाधी घेऊन झाले होते.त्यांनी वेदांताचे तत्त्वज्ञान मराठी भाषेत मांडण्यासाठी ‘विवेकसिंधू’ हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ 1110 मध्ये लिहिला.
8)सौताडा धबधबा-

Soutada Waterfall हा बीड मधील पाटोदा तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. पाटोद्याच्या डोंगरातून उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाऊन पुढे या नदीचा प्रवाह सौताडा येथे 70 मीटर उंचीवरून कोसळतो तोच हा सौताडा धबधबा. तसेच या धबधब्याच्या दरीमध्ये भगवान राम आणि सीता व महादेवाचे एक मंदिर आहे.
या मंदिराला रामेश्वरम म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यामध्ये येथील धबधब्याचे दृश्य अवर्णनीय असते. येथील हिरवागार परिसर,रामेश्वरम मंदिर, खोल दऱ्या मन मोहून टाकतात. श्री क्षेत्र रामेश्वर हे बीड पासून 55 किलोमीटर अंतरावर आहे.
9)हजरत शेहंशावली दर्गा-

Hajrat shahanshavali darga हे बीड मधील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे.सूफी संत हजरत शहेनशाह वली यांच्या चौदाव्या शतकातील समाधीचे येथे स्थान आहे. ते चिस्ती या संप्रदायाचे सुफी संत होते. हे ठिकाण बीडच्या पूर्वेकडे असून येथे दरवर्षी उर्स भरतो. येथील समाधी परिसर आणि दर्ग्याची बांधणी 1385 ते 1840 या दरम्यान झाली. बीड पासून हे ठिकाण थोड्या अंतरावर आहे.
10) ऐतिहासिक खंडोबामंदिर-

बीड मधील Khandoba Temle हे एक प्राचीन धार्मिक स्थळ आहे. या देवाची नवसाला पावणारा खंडोबा म्हणून ओळख आहे. रविवारी येथे भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करतात. नीजामशाहीच्या काळात या मंदिराची बरीच तोडफोड झाली होती. नंतरच्या काळात अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तसेच या मंदिरापासून बीडच्या बलभीम चौकापर्यंत एक बोगदा आहे. परंतु सध्या तो बंद आहे.
बीड जिल्ह्यापासून साधारणता चार किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.
11)बिंदुसरा नदीचा किनारा-

Bindusara river ही बीड जिल्ह्यातील लहान नदी असून ही सिंदफणा आणि गोदावरी नदीची उपनदी आहे. बीड जिल्ह्यातील हे एक पर्यटन स्थळ आहे. येथील निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी पर्यटक नेहमी गर्दी करतात. या नदीचा उगम वाघिरा गावाजवळील बालाघाटच्या डोंगरातून होतो. सूर्योदयआणि सूर्यास्ताच्या वेळी पर्यटक येथे खूप गर्दी करतात.
12) नारायण गड-

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पौडुळ गावात Narayangadh हे धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर विठ्ठलाचे असून या मंदिराला ‘धाकली पंढरी’ म्हणून ओळखले जाते. भाविकांचे तीर्थस्थान असलेल्या या मंदिराची स्थापना संत नारायण बाबा यांनी केली. नारायण महाराज हे संत एकनाथ महाराजांच्या शिष्यामधले एक महत्वाचे व्यक्तिमत्व होते. येथील विशेष गोष्ट म्हणजे दर बारा वर्षांनी येथे आपोआप शिवलिंगाची निर्मिती होते. दरवर्षी भावीक या मंदिराला मोठ्या संख्येने येत असतात.

1)नारायण गड हे धार्मिक स्थळ कोणत्या गावात आहे?
नारायण गड हे धार्मिक स्थळ शिरूर तालुक्यातील पौडुळ गावात आहे?
2)सौताडा धबधबा किती मीटर उंचीवरून कोसळतो?
सौताडा धबधबा 70 मीटर उंचीवरून कोसळतो.
3)नायगाव मयूर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ?
नायगाव मयूर अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध आहे .