रायगड जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 21 places visit to in Raigad District

मंडळी भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत रायगड जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे रायगड जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. हा जिल्हा कोकण प्रशासकीय विभागात येत असून या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा असे होते. या जिल्ह्यात 15 तालुके आहेत व जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. तसेच या जिल्ह्यामधून भोगावती, पाताळगंगा, उल्हास, आंबा,काळ, पुंडलिका,सावित्री, आणि घोड या नद्या वाहतात. Top 21 places visit to in Raigad District

तसेच या जिल्ह्यामध्ये राजनाला व कोलाड ही मुख्य धरणे आहेत. या जिल्ह्यामध्ये तांदूळ हे मुख्य पीक असून नाचणी, वरी,काजू, आंबा नारळ आणि सुपारी याचेही उत्पादन घेतले जाते. पाली आणि महाड या ठिकाणी असलेले अष्टविनायकातील गणपतीची मंदिरे रायगड जिल्ह्यात आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातील गागोद हे आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान आहे.

तर शिरढोण या ठिकाणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मस्थान आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. तसेच या जिल्ह्यांमध्ये अनेक ऐतिहासिक,धार्मिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत.

Table of Contents

Top 21 places visit to in Raigad District

रायगड जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-

1) रायगड किल्ला-

Top 21 places visit to in Raigad District


Raigad Fort हा रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेला गिरीदुर्ग प्रकारातील अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 2690 फूट उंचीवर आहे. रायगडाचे स्थान व महत्व पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाला आपले राज्याची राजधानी बनवले. 6 जून 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा याच किल्ल्यावर झाला होता.

या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील नगार खाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ बोललेले सिंहासनापाशी ऐकायला जाते. या किल्ल्यावर मेणा दरवाजा, हिरकणीचा बुरुज, महादरवाजा, टकमक टोक, शिवाजी महाराजांची समाधी, वाघ दरवाजा, जगदीश्वर मंदिर, नगार खाना,बाजारपेठ याशिवाय अनेक ठिकाणे पाहायला मिळतात. शिवरायांनी शेवटचा श्वास देखील याच किल्ल्यावर घेतला. रायगड जिल्ह्यातील महाड पासून हा किल्ला 25 किलोमीटर अंतरावर आहे.

2) चवदार तळे, महाड-


Chavdar Lake हे रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे राजधानी असलेल्या महाड या ठिकाणी हे ऐतिहासिक स्थळ आहे. 20 मार्च 1927 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या असंख्य अनुयायांसोबत पाण्यासाठी या तळ्यावर सत्याग्रह केला होता. या तळ्यातील पाणी प्राशन करून हा पानवठा सर्वांसाठी खुला केला होता.

हा पाण्याचा सत्याग्रह जगप्रसिद्ध असून या सत्यागृहामुळे सामाजिक समतेचे रणशिंग फ़ुंकले गेले. हा तलाव अंदाजे क्षेत्रफळ 2.5 एकरवर असून हे तळे 5.5 खोल व 100 मीटर लांब व 100 मीटर रुंद आहे. हे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण आहे.

3) वरदविनायक मंदिर महड-


Varadvinayak Temple महड हे रायगड जिल्ह्यातील खोपोली गावाजवळ व खालापूर तालुक्यातील महाड या ठिकाणी असलेले पवित्र धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर अष्टविनायकापैकी एका गणपतीचे आहे. 1725 मध्ये रामजी महादेव बिवालकर यांनी हे मंदिर बांधले. या गणेशाची मूर्ती स्वयंभू असून ती शेजारी असणाऱ्या तलावात मिळालेली आहे.

या मंदिरात नवग्रह देव, शिवलिंग, आणि मूषक यांच्या मूर्ती आहेत. तसेच मंदिराच्या चारही बाजूला हत्तीच्या पहारेकरी चार मूर्ती आहेत. वर्षभर या पवित्र तीर्थस्थळावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

4) हरिहरेश्वर मंदिर श्रीवर्धन –


Harihareshwar Temple श्रीवर्धन हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन जवळील ब्रह्मगिरी, विष्णूगिरी, शिवगिरी, पार्वती या टेकड्यांच्या कुशीत हरीहरेश्वर या ठिकाणी समुद्राच्या किनारी असलेले भगवान शिवाचे पवित्र, महत्वाचे तीर्थस्थळ आहे.श्री क्षेत्र हरिहरेश्वर या ठिकाणाला दक्षिण काशी व देवघर म्हणूनही ओळखले जात असून या मंदिराला भगवान शिवानी आशीर्वाद दिलेला आहे.

1723 मध्ये हरिहरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला पेशव्यांचे हे कुलदैवत असल्याचे सांगितले जाते. हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगार समुद्रकिनारा परिसरात काळभैरव मंदिर, महालक्ष्मी मंदिर आणि इतर मंदिरे पाहायला मिळतात.

5) बल्लाळेश्वर मंदिर, पाली-


Ballaleshwar Temple हे रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळील पाली या ठिकाणी असलेले अष्टविनायकातील एक गणपती मंदिर आहे. हे मंदिर सरसगड व अंबा नदीच्या परिसरात असून श्री मोरेश्वर विठ्ठल सिंदकर (दिघे) यांनी इ.स. 1640 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तसेच या मंदिरात चिमाजी आप्पांनी बसवलेली एक पुरातन घंटा आहे.

या मंदिरातील विनायकाची मूर्ती डाव्या सोंडेची असून पूर्वाभिमूक दगडी सिंहासनावर बसलेली आहे. व मूर्तीच्या डोळ्यात आणि नाभीत हिरे बसवलेले आहेत. आणि दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. येथील मंदिर परिसरात दोन तलाव आहेत.रायगड जिल्ह्यातील रोहा पासून हे मंदिर 28 किलोमीटर अंतरावर आहे.

Visit our website: allindiajourney.com

6) कनकेश्वर मंदिर अलिबाग-


Kankeshwar Temple हे रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून दहा मिनिटाच्या अंतरावर 385 मीटर उंचीची टेकडी आहे. त्या टेकडीवर हे प्राचीन स्वयंभू शिवमंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी मापगाव वरून 700 पर्यंत चढून जावे लागते. या मंदिर परिसरात नागोबाचा टप्पा, देवची पायरी, पुष्कर्णी,गायमुख आणि व्याघ्रेश्वर ही ठिकाणे पाहायला मिळते.

तसेच या ठिकाणी असलेला घनदाट जंगलाचा भाग आणि अल्लाददायक वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. या ठिकाणाहून कर्नाळा किल्ला, माणिकगड, सागरगड आणि इतर किल्ले आपण पाहू शकतो.पेण रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण 22 किलोमीटर अंतरावर आहे.

7) सुवर्णगणेश मंदिर दिवेआगर –


Suvarna Ganesh Temple हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार या ठिकाणी असलेले निसर्गरम्य आणि प्रसिद्ध गणेश मंदिर आहे. या गणेशाची आगळीवेगळी कहाणी आहे. ती अशी की 1997 मध्ये द्रौपदी धर्मा पाटील यांच्या बागेत तीन फूट खोल जमिनीत झाडांची आळी करताना एक तांब्याची पेटी मिळाली. त्यामध्ये गणपतीचा शुद्ध सोन्याचा एक किलो 300 ग्रॅम वजनाचा मुखवटा व 280 ग्रॅम वजनाचे गणपतीचे दागीने सापडले.

ही मूर्ती 300 ते 400 वर्ष जुनी असल्याचे सांगितले जाते. परंतु 2012 मध्ये दरोडेखराने सुरक्षारक्षकाची हत्या करून ही मूर्ती चोरून नेली. परंतु पोलिसांनी त्यांना शितापीने पकडले. दरोडेखोरांनी ही मूर्ती वितळल्यामुळे मूळ मूर्ती पाहायला मिळणार नाही.नवीन मूर्ती बनवायची आहे. अलिबाग पासून हे ठिकाण 75 किलोमीटर अंतरावर आहे.

8) राणीचा राजवाडा-


Ranicha Rajwada हा रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांसाठी बांधलेला एक ऐतिहासिक महत्त्वाचा वाडा आहे. हा वाडा ‘राणी वसा’ म्हणूनही ओळखला जातो. लाकडी बांधकामात बांधलेल्या या वाड्यातील सहा खोल्या आजही चांगल्या स्थितीत आहेत. समुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर उंचीवर असलेला रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याची राजधानी होता.

आपण रोपवे किंवा पायरी मार्गाने गडावर पोहोचू शकतो. या किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक वास्तूचे अवशेष आहेत, त्यामध्ये राणीचा राजवाडा, टेहळणी बुरुज,हिरकणी बुरुज,जगदीश्वर मंदिर,पालखी दरवाजा,
विंचू काटा,टकमक टोक, गंगा सागर तलाव,इ. पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

9) अलिबाग बीच-


Alibag Beach हे रायगड जिल्ह्यातील एक सुंदर शहर व पर्यटन स्थळ आहे. येथील समुद्रकिनारा लांब, स्वच्छ, कमी गर्दीचा आणि सपाट आहे. अलिबाग शहराची स्थापना मराठा साम्राज्याचे सेनापती कान्होजी आंग्रे यांनी केली होती. या ठिकाणी खाद्यपदार्थांमध्ये मिळणारी पोपटी प्रसिद्ध आहे.अलिबाग मध्ये पर्यटकांसाठी अनेक सुंदर व निसर्ग रम्य ठिकाणे आहेत.

ज्यामध्ये कुलाबा किल्ला, मांडवा बीच,किहीम बीच तसेच रेवस आणि मांडवा ही दोन प्रमुख बंदरे या ठिकाणी आहेत. अलिबाग हे ठिकाण पर्यटकांसाठी एक उत्तम ठिकाण असून मुंबई पासून जवळ असल्यामुळे विकेंडच्या शेवटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. नागाव समुद्र्किनाऱ्यापासून अलिबाग सात किलोमीटर अंतरावर आहे.

10) सागरगड किल्ला –


Sagargad Fort हा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून हा किल्ला 1357 फूट उंचीवर असून गिरीदुर्ग प्रकारातील आहे.हा किल्ला खंडाळे गावापासून पायी चालत दोन तासाच्या अंतरावर आहे.या किल्ल्याला खेडदूर्ग म्हणून ही ओळखले जाते.

किल्ल्यावर जाताना महिषासुर मर्दिनीचे छोटे मंदिर, पाण्याची टाकी,”दोधणे” धबधबा ही ठिकाणी पाहायला मिळतात. पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य अप्रतिम असते. तसेच सागर गड माचीवर सिद्धेश्वर मठ असून पर्यटकांना मठात रात्रीचा मुक्काम करता येतो. हा किल्ला एका दिवसात पाहता येतो.

11) मुरुड जंजिरा किल्ला-


Murud Janjira Fort हा रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील एक ऐतिहासिक व अभेद्य किल्ल्या आहे. हा किल्ला चारी बाजूंनी समुद्राने वेढलेला असून समुद्रातील एका बेटावर हा किल्ला आहे. हा किल्ला कोणालाही जिंकता आला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याजवळच पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधलेला आहे.जंजिरा हा भारतातील सर्वात मजबूत किनारी किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. या किल्ल्यावर 592 तोफा असल्याचे सांगितले जाते.

सध्या या ठिकाणी कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात. तसेच किल्ल्यावर एक पडक्या अवस्थेतील भव्य राजवाडा, मशीद व गोड्या पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी होडीतून जावे लागते. मुंबईपासून हे ठिकाण 165 किलोमीटर अंतरावर आहे.

12) पद्मदुर्ग किल्ला-


Padmadurga Fort हा रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील मुरुड गावाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेल्या पाच किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. एवढे किल्ले समुद्रात बांधणारे शिवाजी महाराज हे एकमेव होते. पद्मदुर्ग हा किल्ला सिद्दीला रोखण्यासाठी शिवाजी महाराजांनी बांधला होता.हा किल्ला कासा या नावाने ही ओळखला जातो. 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रातील नौदलाच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता.

हा किल्ला जंजिरा पासून चार किलोमीटर अंतरावर आहे. तसेच शिवाजी महाराजांचे मुख्य जहाज बांधणीचे आवार या किल्ल्यावर होते. या किल्ल्याजवळ मुरुड बीच,जंजिरा किल्ला,काशीद बीच ही ठिकाणे आहेत. मुंबईपासून हे ठिकाण 150 किलोमीटर अंतरावर आहे.

13) गगनगिरी महाराज आश्रम खोपोली-


Gagangiri Maharaj Ashram हे रायगड जिल्ह्यातील खोपोली पाताळगंगा या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात असलेले धार्मिक तीर्थक्षेत्र आहे.स्वामी गगनगिरी महाराज हे भारतातील दत्तावतारी, नाथपंथिय, हठयोगी, जलतपस्वि,आधुनिक योगी, संत व देशभरातील साधुसंतामध्ये विख्यात होते.

त्यांनी गगनबावडा आणि सांगली येथील पाण्याच्या तळाशी जाऊन जलतपश्चर्या केली आहे. गगनगिरी महाराजांच्या खोपोलीतील आश्रमामध्ये अनेक धार्मिक विधी साजरे केले जातात. गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंतीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे केले जातात. त्यावेळी लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणाला भेट देतात.

14) माथेरान-


Matheran हे रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य, थंड प्रल्हाददायक हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंच पठारावर आहे. हा परिसर घनदाट झाडे यांनी लाल पायवाटांनी बहरलेला आहे. पर्यटकांसाठी या ठिकाणी टॉय ट्रेन व घोड्यांची सवारी उपलब्ध आहे. तसेच या ठिकाणी तुम्ही अलेक्झांडर पॉईंट, लुईओसा, पॉइंट,पॅनोरामा पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट, लॉर्ड पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, इको पॉईंट,रामबाग पॉईंट,ही पिकनिक स्थळे पाहू शकता.आहे.

या ठिकाणी शिवाजी महाराज्यांच्या जीवानावर आधारित वस्तू-संग्रालय आहे. माथेरान परिसरात कोणत्याही वाहनास प्रवेश नाही त्यामुळे हे ठिकाण सुंदर व शांत आहे. येथील मुख्य बाजारात आपण विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करू शकतो.माथेरान हे ठिकाण मुंबईपासून 90 किलोमीटर अंतरावर तर पुणे पासून 120 किलोमीटर अंतरावर आहे.

15) राजनाला धरण-


Rajnala Dam हे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ‘कोलाड’ गावाजवळील एक महत्त्वाचे धरण आहे. हे धरण मुंबई पुणे महामार्गावर असून निसर्गरम्य वातावरणात आहे. या धरणातील पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी वापरले जाते. रायगड जिल्ह्यातील हे एक महत्त्वाचे जलस्त्रोत आहे.तसेच या धरणाजवळ एक जलविद्युत प्रकल्प असून त्यावर वीज निर्मिती केली जाते. पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणावर भेट देतात.


16) इमॅजिका-


Imagicaa हे रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातील 300 एकर क्षेत्रफळात पसरलेले भारतातील सर्वात मोठे स्वयंपूर्ण थीम पार्क आहे.या एकाच ठिकाणी मनोरंजन, मजा, साहस, जेवण, खरेदी आणि निवास याचा आनंद आपण घेऊ शकतो. या ठिकाणचे आकर्षण म्हणजे वॉटर पार्क, स्नो पार्क, 3D आणि AR पार्क आणि लाइव्ह शो,लोकप्रिय लँड राईड्स, वॉटर राईड्स, लोच नेस एक्सप्लोरर्स, बंप इट बोट्स, अलिबाबा और चालीस चोर,हाय थ्रिल राईड्स,लेसर शो याचा आनंद आपण घेऊ शकतो.

तसेच येथील प्रिन्स ऑफ द डार्क वॉटर्स शो,भारतातील सर्वात मोठे स्नो पार्क,रस्त्यावरील परेड आणि लाईव्ह कार्यक्रम अशा एक ना अनेक गोष्टी इमेजिका मध्ये उपलब्ध आहेत. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पुण्यापासून हे ठिकाण शंभर किलोमीटर अंतरावर आहे.

17) देवकुंड धबधबा-


Devkund Waterfall हा जिल्ह्यातील भिरा गावाजवळ असलेला निसर्गरम्य धबधबा आहे. हा धबधबा ताम्हिणी घाटाच्या पायथ्याशी असून हा एक ‘प्लंज’ धबधबा आहे. खाली असलेल्या खडकावर हा धबधबा मोठ्या प्रमाणात कोसळतो. एक दिवसाच्या पिकनिक साठी हे एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणाला पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. मुंबईपासून हे ठिकाण 170 किलोमीटर अंतरावर आहे.

18) फणसाड वन्यजीव अभयारण्य-


Fansad Wildlife Sanctuary हे रायगड जिल्ह्यातील मुरुड रोहा तालुक्यात असलेले जैवविविधतेने बहरलेले महत्वाचे वन्यजीव अभयारण्य आहे. या अभयारण्य क्षेत्रफळ 69.79 चौरस किलोमीटर असून या 1986 मध्ये या वनाला अभयारण्याचा दर्जा मिळाला. हे अभयारण्य समुद्रकिनाऱ्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असून 38 गावांना वेढलेले आहे.

या अभयारण्यामध्ये अंजनी, अर्जुन, ऐन, कांचन, किंजळ, कुडा, गेळा, जांभूळ, निलगिरी,अंजनी असे 700 प्रकारचे वृक्ष, वीस पेक्षा अधिक प्रकारचे वन्यजीव प्राणी आणि 90 पेक्षा जास्त विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या जाती आढळून आले आहेत. या अभयारण्याच्या जवळ फणसाड धबधबा देखील आहे. याशिवाय या अभयारण्यामध्ये अशोक, कुरडू, नरक्या, सर्पगंधा, सीता यांसारख्या औषधी वनस्पती असून गारंबीच्या वेली हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे.

या वेलीची लांबी 100 मीटरहून अधिक असते. यावेळी च्या शेंगांमधील गर शेकरू प्राण्यांचा आवडता खाद्य आहे. या अभयारण्यात विविध प्रकारचे वृक्ष, औषधी वनस्पती आणि पाणथळ जागा आहेत.

19) कर्नाळा पक्षी अभयारण्य-


Karnala Bird Sanctuary हे रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात निसर्गरम्य ठिकाणी पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे-कल्हाया व रानसई -चिंचवण गावांच्या हद्दीत असलेले पक्षी अभयारण्य आहे. या अभयारण्यात दुसरे आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला. या अभयारण्यत दरवर्षी शंभर ते दीडशे प्रकारचे पक्षाचे जाती आढळून येतात.

या अभयारण्यात व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फलाय कॅचर,भोरडया, तांबट, कोतवाल,पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ याशिवाय अनेक प्रकारचे पक्षी आढळून येतात. तसेच या ठिकाणी समुद्रसपाटीपासून 445 मीटर उंचीवर असलेला कर्नाळा किल्ला आहे.

या किल्ल्याकडे जाणारी वाट कठीण व अवघड आहे.ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी हा किल्ला मोठे आकर्षण आहे. या अभयारण्यात जाताना गारमाळ या ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. हे अभयारण्य पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. मुंबईपासून हे ठिकाण 62 किलोमीटर अंतरावर आहे.

20) बिर्ला मंदिर अलिबाग-


Birla Temple हे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामध्ये साळव गाव या ठिकाणी प्रसिद्ध बिर्ला गणेश मंदिर आहे. बिर्ला उद्योग समूहाने या मंदिराची स्थापना केली आहे.हे मंदिर शुद्ध दुधाळ पांढऱ्या संगमरवरात दगडात बांधलेले असून या मंदिरापासून बारा किलोमीटर अंतरावर फणसाड अभयारण्य आहे. तसेच अलिबाग मधील सर्वोत्तम मंदिरांपैकी हे एक मंदिर असून या ठिकाणी भाविकांना अध्यात्म आणि शांती भेटते. अलिबाग पासून हे मंदिर 20 किलोमीटर अंतरावर आहे.

21) शिवथरघळ-


शिवथरघळ हे रायगड जिल्ह्यातील वाघजाईदरीच्या कुशीत व महाड तालुक्यात वरंधा घाटामध्ये असलेले अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ आहे. ही एक गुहा असून या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी यांनी 1649 मध्ये ‘दासबोध’ हा ग्रंथ लिहिला. रामदास स्वामींनी त्यांचे शिष्य कल्याण स्वामी यांच्याकडून हा ग्रंथ स्वतः सांगून लिहून घेतला. दासबोध ग्रंथामुळे या गुहेला ऐतिहासिक महत्त्व आहे. या घळीला ‘सुंदर मठ’ या नावानेही ओळखले जाते.

ही गुहा चहुबाजूनी हिरव्यागार डोंगरदर्‍यांनी वेढलेली असून काळ नदीचे या ठिकाणी उगम स्थान आहे. तसेच या ठिकाणी एक सुंदर धबधबा आहे. रायगड जिल्ह्यातील महाड पासून हे ठिकाण 30 किलोमीटर अंतरावर आहे.

Visit the travel blog

1) माथेरान हे ठिकाण समुद्रसपाटीपासून किती 800 मीटर उंच पठारावर आहे.

माथेरान हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंच पठारावर आहे.

2) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्यावर कधी सत्याग्रह केला होता.

20 मार्च 1927 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या असंख्य अनुयायांसोबत पाण्यासाठी चवदार तळ्यावर सत्याग्रह केला होता.

3) रायगड जिल्ह्यातील पद्मदुर्ग किल्ला कोणी बांधला?

रायगड जिल्ह्यातील पद्मदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top