पुणे जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 26 places visit to in Pune District

मंडळी भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक,सांस्कृतिक जिल्हा आहे. या जिल्ह्याबद्दल एक म्हण प्रसिद्ध आहे ती म्हणजे ‘पुणे तिथे काय उणे’ आणि ही म्हण पुणे जिल्ह्याला तंतोतंत बरोबर जुळते.सुसंस्कृत, देखणे, दैदिप्यमान, संस्कृतीरक्षक असा पुणे जिल्हा मुळा मुठा नदीच्या काठावर वसलेला असून भारतातील हा आठव्या क्रमांकाचा तर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. Top 26 places visit to in Pune District

या जिल्ह्यामध्ये 14 तालुके असून येथील पुणे विद्यापीठ हे जगप्रसिद्ध आहे. अनेक साधु संत आणि शूरवीरांचे जन्मस्थान या जिल्ह्यांमध्ये आहे. या जिल्ह्यातील भीमा नदी सर्वात मोठी असून घोड नदी, निरा नदी , पवना नदी, मांडवी, मीना,इंद्रायणी नदी, कऱ्हा, कुकडी, मुळा, मुठा या नद्या वहातात.

या जिल्ह्यामध्ये बाजरी, तांदूळ,गहू,ज्वारी, हरभरा,ऊस ही प्रमुख पिके घेतली जातात. तसेच या जिल्ह्यामध्ये अष्टविनायकातील आठ गणपती पैकी पाच गणपती या जिल्ह्यामध्ये असून अनेक धार्मिक सांस्कृतिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत.

Table of Contents

पुणे जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-

1) भीमाशंकर-

Top 26 places visit to in Pune District


Bhimashankar Jyotirlinga हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये असलेले महत्वाचे धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भगवान शंकराचे ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर हे ठिकाण घनदाट जंगलांनी वेढलेले आणि निसर्गरम्य वातावरण असलेले सुंदर ठिकाण असून महाराष्ट्रातील प्रमुख भीमा नदीचा उगम या ठिकाणाहूनच होतो. हे अभयारण्य ‘शेकरू’ साठी प्रसिद्ध असून या ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आढळून येतात.

हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून येथील सभा मंडप व कळस सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजाराम महाराज या ठिकाणी दर्शनाला नेहमी येत असत. तसेच भीमाशंकर जवळ अंजनी माता मंदिर, नागफणी पॉईंट, हनुमान तलाव आणि गुप्त भीमाशंकर हे ठिकाणे पाहायला मिळतात. पुणे शहरापासून भीमाशंकर हे ठिकाण 110 किलोमीटर अंतरावर आहे.

2) शिवनेरी किल्ला-


Shivneri Fort हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळील एक ऐतिहासिक गिरीदुर्ग प्रकारातील महत्त्वाचा किल्ला आहे. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला असल्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात या किल्ल्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. शिवनेरी किल्ला त्रिकोणी आकाराचा असून या किल्ल्याला सात दरवाजे आहेत.

किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर असून बाल शिवाजी व जिजामाता यांच्या प्रतिमा आहेत. तसेच किल्ल्यावर मशीद,प्रार्थनास्थळ व इतर इमारती पाहायला मिळतात. भारत सरकारने 1909 मध्ये हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. पुण्यापासून हा किल्ला 105 किलोमीटर अंतरावर आहे.

3) शनिवार वाडा-


Shaniwar Wada हे पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. सन 1736 मध्ये पहिला बाजीराव पेशवा यांनी हा शनिवार वाडा बांधला. हा राजवाडा म्हणजे मराठ्यांच्या वैभवशाली साम्राज्याचे प्रतीक मानले जाते. महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात.

या वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा नावाने ओळखले जाते. व इतर दरवाजे खिडकी,गणेश, मस्तानी, जंभळ या नावाने ओळखले जातात. तसेच या ठिकाणी गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे आहेत. अलीकडच्या काळात या ठिकाणी पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो दररोज आयोजित केला जातो.

1928 मध्ये आगीमुळे हा वाडा नष्ट झाला. सध्या फक्त या ठिकाणी तटबंदी असणाऱ्या भक्कम भिंती आणि दरवाजा शिल्लक आहे.

4) सिंहगड किल्ला-


Sinhagad Fort हा पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोणजे गावातील एक ऐतिहासिक किल्ला असून समुद्रसपाटीपासून 4400 फूट उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर सरदार तानाजी मालुसरे यांना याच ठिकाणी मुघल सत्तेशी लढताना वीरमरण आले. त्याना ही बातमी शिवाजी महाराजांना कळताच त्यांनी ‘गड आला पण माझा सिंह गेला’ हे उद्गार काढले होते. त्यानंतर शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा बदलून सिंहगड हे नाव ठेवले. पुणे शहरापासून हा किल्ला 40 किलोमीटर अंतरावर आहे.

Visit our website: allindiajourney.com

5) लाल महाल-


Lal Mahal हे पुणे जिल्ह्यातील पुण्याच्या मध्यभागावर जिजामाता उद्यानात असलेले ऐतिहासिक स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण या लाल महालातच गेले. याच लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे शिवाजी महाराजांनी छाटली होती. शिवकाळातील लाल महाल सध्या अस्तित्वात नाही. परंतु 1988 मध्ये पुणे महानगरपालिकेने ही वास्तू नव्याने उभारली आहे.

त्यामध्ये जिजाऊ मासाहेब व छत्रपती शिवाजी महाराजांची शिल्पे उभारण्यात आली आहेत. या महालाच्या बाजूला शनिवार वाडा व कसबा गणपती ही ठिकाणी आहेत.

6) आगाखान पॅलेस-


Agakhan Palace हे पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाण आहे.मोहम्मद शाह यांनी 1897 मध्ये ही वास्तू दुष्काळग्रस्त भागातील लोकांना रोजगार देण्यासाठी बांधली. 1942 च्या चले जाव चळवळीमध्ये महात्मा गांधी व त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांना या ठिकाणी नजर कैदेत ठेवण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व आहे.

पूर्वी या इमारतीला येरवडा पॅलेस म्हणून ओळखले जात होते. ही भव्य वास्तू ब्रिटिश, इटालियन, फ्रेंच आणि मुस्लिम शैलीत बांधलेली असून 72 मीटर लांब व 21 मीटर रुंद आहे. नऊ एकर मध्ये असलेल्या या पॅलेस चा बांधकामाचा खर्च त्यावेळी बारा लाख रुपये आला होता.

7) विश्रामबाग वाडा –


Vishrambag Wada हा पुणे जिल्ह्यातील मराठा साम्राज्यातील दोनशे वर्ष जुना पेशवे कालीन एक ऐतिहासिक वाडा आहे. हा वाडा 1807 मध्ये दुसरा बाजीराव पेशवे यांनी साडेतीन लाख रुपये खर्च करून बांधला. पेशव्यांची मालकी असलेला हा वाडा ब्रिटिशांनी पुणे महानगरपालिकेला विकला.

या वाड्यामध्ये मराठा साम्राज्याची कला आणि संस्कृती दाखवणारे प्रदर्शन आहे. सध्या या वाड्यात टपाल कार्यालय, पुणे नगरपालिकेच्या कचेऱ्या आणि मराठा साम्राज्यातील वस्तुसंग्रहालय आहे. पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

8) मोरगाव मयुरेश्वर मंदिर –


Morgaon Mayureshwar Temple हे पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकापैकी एक असलेले ठिकाण आहे. अष्टविनायकातील हा मोरगावचा मयुरेश्वर पहिला गणपती म्हणून ओळखला जातो. मोरेश्वराचे हे मंदिर प्रशस्त गढी सारखे असून आदिलशाही कालखंडात बहामनी काळात हे मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधलेले असल्याचे सांगितले जाते. गावाच्या मध्यावर असलेले हे मंदिर काळ्या दगडात बांधलेले असून मंदिराच्या चारही बाजूंनी मनोरे आहेत.

व त्या काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून मंदिराच्या बाजूने 50 फूट उंच संरक्षक भिंत आहे. येथील मयुरेश्वराची आकर्षक मूर्ती, बैठी व पूर्वाभिमुख असून डाव्या सोंडेची आहे. आणि डाव्या व उजव्या बाजूला रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत. व पुढील बाजूस मयूर व मूषक विराजमान आहेत. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे. पुण्यापासून हे ठिकाण 64 किलोमीटर अंतरावर आहे.

9) खडकवासला धरण-


Khadvasla Dam हे पुणे जिल्ह्यातील मुठा नदीवर बांधलेलेएक महत्त्वाचे धरण आहे. हे धरण 1870 मध्ये दुष्काळात पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने ब्रिटिशांनी बांधले आहे. या धरणाची उंची 32. 90 मीटर असून लांबी 1539 मीटर एवढी आहे. तसेच या धरणाची पाणी साठवण क्षमता 86 दशलक्ष घनमीटर एवढी आहे.

हे धरण सिंहगड रस्त्यालगत असून या धरणाला पुण्याची चौपाटी असेही म्हटले जाते. या धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंचनासाठी वापर केला जातो. पर्यटकांसाठी ही एक प्रेक्षणीय ठिकाण आहे.खडकवासला धरण हे पुण्यापासून सुमारे २० किमी अंतरावर आहे.

10) राजगढ किल्ला-


Rajgad Fort हा पुणे जिल्ह्यातील डोंगर प्रदेशातील गिरीदुर्ग प्रकारातील ऐतिहासिक किल्ला आहे. पूर्वी हा किल्ला मुरुंबदेव नावाने ओळखला जात होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीच्या काळात 26 वर्ष हा मराठी साम्राज्याची राजधानी होता. त्यानंतर रायगड किल्ल्याला राजधानी बनवण्यात आले. तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या खजिन्यातून राजगड किल्ल्याची मजबूत बांधणी केली होती.

या किल्ल्यावर सुवेळा माची, पद्मावती तलाव, रामेश्वर मंदिर,राजवाडा,सदर, पाली दरवाजा, गुंजवणी दरवाजा, पद्मावती मंदिर, संजीवनी माची ही ठिकाणे पाहायला मिळतात. पुण्यापासून हे ठिकाण 48 किलोमीटर अंतरावर आहे.

11) लोणावळा-


Lonavla हे पुणे जिल्ह्यातील सह्याद्री डोंगर रांगांमध्ये व समुद्रसपाटीपासून 630 मीटर उंचीवर असलेले अत्यंत प्रेक्षणीय, ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी मिळणारी लोणावळा चिक्की जगप्रसिद्ध आहे.या निसर्ग रम्य थंड हवेच्या ठिकाणी आणि अनेक डोंगर,तलाव, धबधबे,आणि किल्ले आहेत.

बारमाही या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या ठिकाणी भुशी डॅम, लोहगड किल्ला,टायगर पॉईंट, विसापूर किल्ला, पवना तलाव, कार्ला आणि भाजा लेणी, राजमाची किल्ला, नागफणी,कुणे धबधबा,सुनील शेट्टीचे मेण संग्रहालय आणि सनसेट पॉइंट ही निसर्गरम्य पर्यटन स्थळे आहेत.

याशिवाय या ठिकाणी अनेक सेलिब्रिटींचे रो हाऊसेस व बंगले आहेत. लोणावळा हे पर्यटनाचे उत्तम ठिकाण आहे. लोणावळा हे ठिकाण पुण्यापासून 63 किलोमीटर तर मुंबईपासून 96 किलोमीटर अंतरावर आहे.

12) खंडाळा-


Khandala हे पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत व समुद्रसपाटीपासून 630 मीटर उंचीवर असलेले अत्यंत निसर्गसंपन्न व थंड हवेचे ठिकाण आहे. लोणावळा व खंडाळा हे जुळे हिल स्टेशन समजले जाते. प्रसिद्ध लेखक आणि संगीत दिग्दर्शक नितीन राईकवर यांनी हिंदी सिनेमात “आती क्या खंडाळा” या गाण्यांमध्ये खंडाळा शहराचे नाव उज्वल केले आहे.

या ठिकाणी अनेक प्रेक्षणीय स्थळे असून येथे नैसर्गिक तळी, नयनरम्य निसर्ग, किल्ले, तलाव आणि विविध वनस्पतींनी समृद्ध असा हा भाग आहे. या ठिकाणी तिकोना, लोहगड,विसापूर हे किल्ले आहेत. इतिहास प्रेमी आणि गिर्यारोहकांचे हे अत्यंत प्रेक्षणीय ठिकाण आहे.

तसेच या ठिकाणी राजमाची पॉईंट,सनसेट पॉईंट, थ्री टायर्ड,ताम्हिणी घाट,कुणे धबधबा,टायगर लीप /वाघदरी,अमृतांजन पॉइंट याशिवाय खंडाळ्यामध्ये पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेले कामशेत हे ठिकाण आहे. पुण्यापासून हे ठिकाण 150 किलोमीटर अंतरावर तर लोणावळ्यापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे.

13)सारसबाग -पेशवे पार्क-


Sarasbag हे पुणे जिल्ह्यातील पुणेच्या मध्यावर व स्वारगेट जवळ 25 एकर मध्ये पसरलेले प्रसिद्ध उद्यान असून पर्यटकांचे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पूर्वी या ठिकाणी तलाव होता त्यामध्ये सारस पक्षी सोडले जायचे 1750 मध्ये श्रीमंत श्री नानासाहेब पेशवे यांनी ही सारसबाग बांधली त्यामुळे या ठिकाणाला सारसबाग हे नाव पडले. त्यानंतर 1784 मध्ये श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या तलावाच्या मध्यभागी गणपतीचे मंदिर बांधले.

तेव्हापासून हे उद्यान ‘तळ्यातिल गणपती’ नावाने ओळखले जाते. या बागेमध्ये चालण्यासाठी प्रशस्त रस्ते, हिरवीगार झाडे,लहान मुलांसाठी खेळणी, आणि एक लहान रेल्वे (फुलराणी )आहे. आणि सारसबागेच्या शेजारी महानगरपालिकेद्वारे सात एकर मध्ये व्यवस्थापित केलेले पेशवे पार्क ( ऊर्जा पार्क)आहे.

सारसबागेचे अनेक मालिकांमध्ये चित्रीकरण केले आहे. येथे जवळच पर्वती टेकडी, पेशवे पार्क, आणि पुणे विद्यापीठाजवळची विविध प्रेक्षणीय ठिकाणी आहेत.

14) पानशेत धरण-


Panshet Dam हे पुणे जिल्ह्यातील आंबी नदीवर बांधलेले अत्यंत महत्त्वाचे धरण आहे. या धरणाला तानाजी सागर धरण म्हणून हे ओळखले जाते. या धरणाने पुणे शहराला पाणीपुरवठा केला जातो. तसेच सिंचन आणि विद्युत निर्मितीसाठी या धरणातील पाण्याचा उपयोग केला जातो. 1961 मध्ये या धरणाला भगदाड पडल्यामुळे पुण्यात मोठा पूर आला होता. त्यावेळी पुणे शहराचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

हा धरण परिसर घनदाट जंगलांचा असून या ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, रंगीबिरंगी फुलपाखरे, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी,नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. तसेच या ठिकाणी पोहण्यासाठी संधी दिली जाते. या धरण परिसरात जवळपास अनेक पर्यटन स्थळे आहेत. पुण्यापासून हे धरण 50 किलोमीटर अंतरावर आहे.

15) पाताळेश्वर लेणी-


Pataleshwar Cave ही पुणे जिल्ह्यातील जंगली महाराज रोडवर शिवाजीनगर भागात वसलेले एक ऐतिहासिक, प्राचीन व धार्मिक तीर्थस्थळ आहे. पाताळेश्वर गुहा मंदिराचे तांदळाच्या एका दाण्यावर 5000 अक्षरे कोरलेली आहेत व त्याची गिनीज वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे.आठव्या शतकामध्ये राष्ट्रकूट राजवटीच्या काळात या लेण्या जमिनीमध्ये खोदुन बनवलेले आहेत.

या लेण्यांमध्ये एक गुहा स्वरूप शिवमंदिर आहे.पौराणिक महत्त्व असलेल्या या लेण्यांमध्ये शिवालयाचे बांधकाम अखंड एकाच दगडामध्ये कोरलेले असून या पाताळेश्र्वर लेण्याला मोठे प्रांगण आहे. व प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदीमंडप आहे. या नंदीमंडपाचे छत मोठे, जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे.

आणि या नंदी मंडपाला दगडी खांब आहेत. या लेण्यांमध्ये गारवा आणि शांतता अनुभवायला मिळते.पुण्यातील पाताळेश्वर गुहा मंदिर हे फक्त स्थापत्यशास्त्राचा चमत्कारच नाही तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. पुणे रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण पाच किलोमीटर अंतरावर आहे.

16) पर्वती-


Parvti हे पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य व जुना वारसा असलेले ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून ही टेकडी 2100 फूट उंच असून टेकडीवर जाण्यासाठी 103 पायऱ्या चढाव्या लागतात.पर्वताई देवीच्या नावावरून या ठिकाणाला पर्वती हे नाव पडले आहे. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान नानासाहेब पेशवे यांनी तावरे पाटील यांच्याकडून ही जागा खरेदी करून या ठिकाणी देवदेवेश्वर, कार्तिकेय, विष्णू,राम, विठ्ठल,सूर्य आणि भवानी ही मंदिरे बांधली आहेत.

तसेच या टेकडीवर नानासाहेब पेशव्यांचे स्मारक व पेशवे संग्रहालय आहे. आणि पायथ्याला प्राचीन लेण्या आहेत. व्यायामासाठी आणि थंड हवा खाण्यासाठी बरेच लोक सकाळच्या वेळी या ठिकाणी भेट देतात.

17) दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर –


Dagadusheth Halwai Ganapati Temple हे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक तीर्थस्थळ आहे. हे मंदिर शंभर वर्ष जुने असून या मंदिराची स्थापना श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी केलेली आहे. दगडूशेठ हलवाई हे इंग्रजांच्या काळात प्रसिद्ध मिठाईवाले होते. त्यावेळी आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांचा मुलगा मरण पावला.मुलाच्या दुःखाने त्यांची पत्नी आणि ते खूप व्यतीथ झाले होते. दगडूशेठ हलवाई यांचे गुरु माधवराव यांनी त्यांना धीर देत दत्त आणि गणपतीच्या मूर्तीची पूजा स्वतःच्या मुलाप्रमाणे करायला सांगितली.

दगडूशेठ हलवाई यांनी तेव्हापासून ही पूजा केली.या मंदिरातील गणपतीची मूर्ती 2.2 मीटर उंच असून 1 मीटर रुंद आहे. या मूर्तीला 40 किलो सोन्याने सजवलेले असून मंदिरात दररोज पूजा, अभिषेक अथर्वशीर्ष आणि गणेशाची आरती केली जाते.गणेशोत्सवादरम्यान मंदिरावर रोषणाई केली जाते. थायलंडमधील फुकेत या ठिकाणी या मंदिराची प्रतिकृती बांधण्यात आली आहे.

18) तुळशीबाग-


Tulshibag हे पुणे जिल्ह्यातील महात्मा फुले मंडई जवळील एक प्रसिद्ध गजबजलेले बाजारपेठेचे ठिकाण आहे. 1795 मध्ये माधवराव पेशव्यांनी या ठिकाणी श्री राम मंदिर बांधले. त्यावेळी मंदिराच्या भोवती पूजेचे साहित्य आणि इतर वस्तू विकत घेण्यासाठी दुकानांना प्रोत्साहन दिले तीच ही तुळशीबाग.

या ठिकाणी स्वयंपाकघरातील वस्तूंपासून, कपडे, सौंदर्यप्रसाधने, खेळणी,दागिने, गृहपयोगी वस्तू, लहान मुलींची भातुकलीची खेळणी अशा अनेक गोष्टींची बाजारपेठ म्हणून तुळशीबाग ओळखली जाते. तुळशीबाग ही बाजीराव रोड – शिवाजी रोड, मंडई – लक्ष्मी रोड यांच्या मध्यभागी वसलेली आहे.

19) केळकर संग्रहालय-


Raja Dinker Kelkar Museaum हे पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आहे. 1990 मध्ये पद्मश्री डॉ. दिनकर गंगाधर केळकर यांनी हे संग्रहालय उभारले. या संग्रहालयात जुन्या काळातील 25 हजार पेक्षा जास्त वस्तूंच्या जतन करण्यात आले आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे अत्तरदाणी,दिवे, अडकित्ते, गंजीफा, सोंगट्या, फुंकणी,शस्त्रे, पानदाने, पेटारे, दरवाजे, मूर्ती, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या गणपतीच्या तोफा आहेत.

व कोरीव काम केलेले राजवाड्याचे दरवाजे, उत्कृष्ट मातीची भांडी संग्रह, टेराकोटा, तांबे आणि पितळापासून बनवलेली भांडी संग्रहालयात भगवान गणेश, भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या मूर्ती देखील आहेत.अशा अनेक प्रकारच्या वस्तू या संग्रहालयात पाहायला भेटतात. तसेच कोथरूड मधील मस्तानीचा हुबेहूब महाल या संग्रहालयात उभा करण्यात आला आहे.

20) देहू आणि आळंदी-


Dehu And Alandi ही पुणे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील महत्वाची धार्मिक स्थळे आहेत. ही दोन्ही ठिकाणी इंद्रायणी नदीच्या काठी असून देहू हे ठिकाण तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे. तर आळंदी हे ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी स्थान आहे. संत तुकारामांची कर्मभूमी असलेल्या देहू गावामध्ये तुकाराम बीज ला मोठा उत्सव साजरा केला जातो. तसेच आळंदी या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधी जवळ एक प्राचीन पवित्र वृक्ष आहे.

आख्यायिकेनुसार, ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेताना त्यांची काठी या वृक्षाच्या ठिकाणी रोवली होती, ज्यातून हा वृक्ष उगवला. या वृक्षाला ‘खंडू चक्का’ असे म्हणतात. दरवर्षी आषाढी एकादशीला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरपूरला जाते. पुणे शहरापासून देहू आणि आळंदी ही ठिकाणी 22 किलोमीटर अंतरावर आहेत.

21) प्रति तिरुपती बालाजी –


Prati Tirupati Balaji Temple हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्याच्या परिसरात केतकावळे या ठिकाणी व्यंकटेश्वरा हॅचरीज ट्रस्टने बांधलेले आंध्र प्रदेश मधील प्रति तिरुपती बालाजीचे मंदिर आहे. हे मंदिर केतकावळे येथील डोंगराच्या पायथ्याशी असून तिरुमला- तिरुपती येथील मंदिराची प्रतिकृती आहे.येथील मंदिराची वास्तू कला आकर्षक व भव्य असून मंदिर परिसर शांत व आध्यात्मिक ऊर्जा देणारा आहे. पुणे शहरापासून हे ठिकाण 45 किलोमीटर अंतरावर आहे.

22) चतुःश्रृंगी मंदिर-


Chattushringi Temple हे पुणे जिल्ह्यातील सेनापती बापट रस्त्यालगत एका टेकडीवर आहे. ही देवी पुणे शहराचे ग्रामदेवता आहे. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेल्याचे सांगितले जाते. या देवीला महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, अंबरेश्वरी या नावाने ही ओळखले जाते.

मंदिरात जाण्यासाठी 100 पायऱ्या चढून जावे लागते. हे ठिकाण जागृत देवस्थान असून नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती आहे. दरवर्षी नवरात्रीमध्ये या डोंगराच्या पायथ्याशी भक्तांचा मेळा भरतो. या मंदिर परिसरात दुर्गादेवी गणेश आणि वेताळ मंदिर आहे.

23) महात्मा फुले संग्रहालय-


Mahatma Phule Museaum हे पुणे जिल्ह्यातील घोले रोडवर शिवाजीनगर भागातील एक महत्त्वाचे संग्रहालय आहे. या संग्रहालयाला पूर्वी ‘रे म्यूझियम’ या नावाने ओळखले जात होते. 1890 मध्ये या संग्रहालयाची स्थापना झाली. या संग्रहालयात प्राणी, पक्षी, कीटक, साप,मासे यांच्या विविध प्रजातींचा संग्रह शेती, वनीकरण,भूशास्त्र आणि खनिजे, हस्तकला आणि कॉटेज उद्योग,छायाचित्रे, आलेख, मॉडेल्स, यंत्र,मुघल आणि मराठा काळातील शस्त्रे इ. गोष्टी पाहायला मिळतात. पर्यटन या ठिकाणाला मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

24) एकमुखी दत्त मूर्ती नारायणपूर –


Eikmuhki Datta Mandir Narayanpur हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेले जागृत धार्मिक स्थळ आहे. या मंदिरातील सर्वांग सुंदर दत्तमूर्ती एक मुखी असून षडभूज आहे. मूर्ती समोर संगमरवरी पादुका आहेत.या ठिकाणी अनेक दु:खी, पिडीत व बाधीत भक्तांच्या समस्यांचे निराकरण झालेले आहे. म्हणून भाविकांची या जागृत स्थानावर गाढ श्रद्धा आहे.

या मंदिरात श्री सदगुरु नारायण महाराज उर्फ आण्णा यांचे प्रवचन ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. तसेच गुरुवार आणि दत्त जयंतीला या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.सासवड पासून हे ठिकाण सहा किलोमीटर अंतरावर आहे.

25) जेजुरी-


Jejuri हे पुणे जिल्ह्यातील पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. मल्हारी मार्तंड खंडोबाचे हेमाडपंती शैलीत बांधलेले हे मंदिर जेजुरीच्या उंच डोंगरावर आहे. खंडोबा हे शिवाचे रूप आहे असे समजले जाते.हे देवस्थान जागृत असून या ठिकाणी महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे ते श्रद्धास्थान कुलदैवत आणि रक्षक आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी शेकडोच्या वर पायऱ्या चढून जावे लागते.

या ठिकाणी जेजुरीचे सोने म्हणजे हळदीच्या भंडाऱ्याचा वर्षाव देवावर केला जातो. तसेच दसऱ्याच्या वेळी या ठिकाणी तलवारी उचलण्याची स्पर्धा असते. सोमवती अमावस्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. चंपाषष्ठीला या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरते.पुण्यापासून हे ठिकाण 50 किलोमीटर अंतरावर आहे.

26) पवना तलाव-

Pawna Lake हे पुणे जिल्ह्यातील लोणावळ्या पासून जवळ असलेले एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. हा तलाव मावळ तालुक्यातील पवना नदीवरच्या 1973 मध्ये बांधलेल्या पवना धरणाच्या बॅकवॉटरने तयार झालेला कृत्रिम तलाव आहे. या तलावाला पवना धरण जलाशय आणि पवना तलाव म्हणून ओळखले जाते.

येथील परिसरात लोणावळा हिल स्टेशन,लोहगड , तिकोना आणि तुंग हे किल्ले, कृषी पर्यटन, पवना नदी किनारी टेन्ट ची सुविधा,पिकनिक आणि कॅम्पिंग साईट असल्यामुळे मुंबई पुणे सह इतर ठिकाणच्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. लोणावळ्यापासून हे ठिकाण 25 किलोमीटर अंतरावर आहे.

visit the travel blog

1) पुणे जिल्ह्यातील पर्वती हे ठिकाण समुद्रसपाटीपासून किती फूट उंचीवर आहे?

पुणे जिल्ह्यातील पर्वती हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 2100 फूट उंचीवर आहे.

2) खडकवासला धरण हे पुणे जिल्ह्यातील कोणत्या नदीवर बांधलेले महत्त्वाचे धरण आहे?

खडकवासला धरण हे पुणे जिल्ह्यातील मुठा नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे.

3)पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या तालुक्यात आहे ?

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खेड तालुक्यात आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top